शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

इचलकरंजीत पाण्यावरुन राजकारण पेटले

By admin | Updated: April 25, 2016 00:59 IST

पालिका निवडणुकीचे वेध : हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठी जमावबंदीची मागणी; गळती, चोरीमुळे पाणीटंचाई वाढली

इचलकरंजी : पाणीटंचाईमुळे हैराण झालेले नागरिक आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याने या समस्येचे गांभीर्य वाढले आहे. शनिवारी दिवसभर आंदोलन करूनही पाण्याबाबत ठोस निर्णय मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय स्टंट असल्याची चर्चा आहे.शहरास पंचगंगा व कृष्णा अशा दोन्ही नद्यांतून पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यामध्ये पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्यानंतर फक्त कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो. कृष्णा नदीवर असलेल्या ५४० अश्वशक्तीच्या दोन्ही पंपामार्फत पाणी उपसा केल्यानंतर शहरास दररोज सुमारे ३२ दशलक्ष लिटर पाणी मिळते. मात्र, या योजनेवर असलेली गळती आणि चोरीमुळे दहा दशलक्ष लिटर पाणी कमी मिळते. शहराच्या जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत २२ दशलक्ष लिटर इतकेच पाणी पोहचते.सध्या पंचगंगा नदीतसुद्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे तेथून १२५ अश्वशक्तीच्या पंपाद्वारे दहा दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. अशा प्रकारे कृष्णा व पंचगंगा या दोन्ही नद्यांमार्फत दररोज ३२ दशलक्ष लिटर मिळालेले पाणी शुद्ध करून शहरवासीयांना पुरविले जाते. त्यामुळे शहरास चार ते पाच दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होतो. अशा स्थितीत कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील जॅकवेलच्या इंटकवेलचा व्हॉल्व्ह उघडा पडल्याने तेथील दोन्ही पाणी उपसा पंप बंद पडले. परिणामी पंचगंगा नदीमधून येणाऱ्या अवघ्या दहा दशलक्ष पाण्यावर शहराची गरज भागत नसल्याने कमालीची पाणीटंचाई नागरिकांना भेडसावत आहे.दोन्ही नद्यांमध्ये पाणी असूनसुद्धा प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणी मिळत नसल्याची भावना जनमानसांत पसरली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी रास्ता रोकोसारखी आंदोलने झाली. त्यापैकी शनिवारी मंगळवार पेठेतील संतप्त महिला-पुरूष नागरिकांनी दुपारी जुन्या नगरपालिकेजवळ रास्ता रोको केला. तेव्हा पालिकेच्या प्रशासनाकडून सायंकाळी पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, सायंकाळीसुद्धा पाणी मिळाले नसल्याने सहा वाजेपर्यंत वाट पाहणाऱ्या नागरिकांनी पुन्हा नारायण टॉकीजजवळ रास्ता रोको केला. सुमारे तासभर चाललेल्या रास्ता रोकोस नगरपालिकेकडून कोणताही अधिकारी किंवा पदाधिकारी त्याठिकाणी गेला नसल्याने संतप्त झालेले नागरिक जनता चौकात आले व तेथे रास्ता रोको केला.या आंदोलनास रात्री आठ वाजल्यानंतर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार या दोघी सामोरे गेल्या. कृष्णा नदीतील पाणीटंचाईमुळे सोमवारपर्यंत नळाला पाणी येणार नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी या जमावाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेले नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी दोघींना घेराव घालून ढकलाढकली केली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तेथे उपस्थित असलेले माजी नगरसेवक सागर चाळके यांनी या दोघींना एका कापड दुकानात जाऊन थांबण्यास सांगितले. तरीसुद्धा नागरिकांनी दुकानासमोर बसून जोरदारपणे निदर्शने केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर जमाव शांत झाला असला तरी त्यांनी पुन्हा या दोघींच्या गाड्यांनासुद्धा घेराव घातला.पालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांत असल्यामुळे नगरसेवकपदासाठी इच्छुकांकडून अशी आंदोलने केली जात आहेत, ही राजकीय स्टंटबाजी असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने अशा राजकीय स्टंटबाजी आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या हुल्लडबाजीला आळा बसण्यासाठी जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवावा, अशी मागणी जाणकारांकडून होत आहे; अन्यथा अशा हुल्लडबाज आंदोलनांतून काही अगळीक झाल्यास त्याचे गांभीर्य अधिक वाढेल. (प्रतिनिधी)आजपासून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठामजरेवाडी (ता. शिरोळ) येथे शनिवारी दुपारपासून कृष्णा नदीच्या डोहात यारीच्या सहाय्याने २२५ अश्वशक्तीचा सबमर्सिबल पंप सोडण्याचे काम सुरू झाले आहे. सुमारे साडेपाच टन वजनाचा हा अवजड पंप रात्री डोहात स्थापित होईल. त्याच्या विजेच्या केबल व पाण्याची दाबनलिका जोडून या पंपाची रविवारी उशिरा चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यास आज, सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे होऊ लागेल. त्यानंतर तीन दिवसांतून एक वेळ असे जून महिन्यापर्यंत पाणी शहरवासीयांना मिळेल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ यांनी दिली. त्याचप्रमाणे कर्नाटकला एक टीएमसी पाणी देण्यासाठी कोयना धरणातून सोडलेले पाणीसुद्धा कृष्णा नदीपात्रामध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.