शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

इचलकरंजीत पाण्यावरुन राजकारण पेटले

By admin | Updated: April 25, 2016 00:59 IST

पालिका निवडणुकीचे वेध : हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठी जमावबंदीची मागणी; गळती, चोरीमुळे पाणीटंचाई वाढली

इचलकरंजी : पाणीटंचाईमुळे हैराण झालेले नागरिक आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आल्याने या समस्येचे गांभीर्य वाढले आहे. शनिवारी दिवसभर आंदोलन करूनही पाण्याबाबत ठोस निर्णय मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय स्टंट असल्याची चर्चा आहे.शहरास पंचगंगा व कृष्णा अशा दोन्ही नद्यांतून पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यामध्ये पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्यानंतर फक्त कृष्णा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो. कृष्णा नदीवर असलेल्या ५४० अश्वशक्तीच्या दोन्ही पंपामार्फत पाणी उपसा केल्यानंतर शहरास दररोज सुमारे ३२ दशलक्ष लिटर पाणी मिळते. मात्र, या योजनेवर असलेली गळती आणि चोरीमुळे दहा दशलक्ष लिटर पाणी कमी मिळते. शहराच्या जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत २२ दशलक्ष लिटर इतकेच पाणी पोहचते.सध्या पंचगंगा नदीतसुद्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे तेथून १२५ अश्वशक्तीच्या पंपाद्वारे दहा दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा होतो. अशा प्रकारे कृष्णा व पंचगंगा या दोन्ही नद्यांमार्फत दररोज ३२ दशलक्ष लिटर मिळालेले पाणी शुद्ध करून शहरवासीयांना पुरविले जाते. त्यामुळे शहरास चार ते पाच दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होतो. अशा स्थितीत कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्यामुळे मजरेवाडी (ता.शिरोळ) येथील जॅकवेलच्या इंटकवेलचा व्हॉल्व्ह उघडा पडल्याने तेथील दोन्ही पाणी उपसा पंप बंद पडले. परिणामी पंचगंगा नदीमधून येणाऱ्या अवघ्या दहा दशलक्ष पाण्यावर शहराची गरज भागत नसल्याने कमालीची पाणीटंचाई नागरिकांना भेडसावत आहे.दोन्ही नद्यांमध्ये पाणी असूनसुद्धा प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणी मिळत नसल्याची भावना जनमानसांत पसरली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी रास्ता रोकोसारखी आंदोलने झाली. त्यापैकी शनिवारी मंगळवार पेठेतील संतप्त महिला-पुरूष नागरिकांनी दुपारी जुन्या नगरपालिकेजवळ रास्ता रोको केला. तेव्हा पालिकेच्या प्रशासनाकडून सायंकाळी पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, सायंकाळीसुद्धा पाणी मिळाले नसल्याने सहा वाजेपर्यंत वाट पाहणाऱ्या नागरिकांनी पुन्हा नारायण टॉकीजजवळ रास्ता रोको केला. सुमारे तासभर चाललेल्या रास्ता रोकोस नगरपालिकेकडून कोणताही अधिकारी किंवा पदाधिकारी त्याठिकाणी गेला नसल्याने संतप्त झालेले नागरिक जनता चौकात आले व तेथे रास्ता रोको केला.या आंदोलनास रात्री आठ वाजल्यानंतर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार या दोघी सामोरे गेल्या. कृष्णा नदीतील पाणीटंचाईमुळे सोमवारपर्यंत नळाला पाणी येणार नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी या जमावाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेले नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी दोघींना घेराव घालून ढकलाढकली केली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तेथे उपस्थित असलेले माजी नगरसेवक सागर चाळके यांनी या दोघींना एका कापड दुकानात जाऊन थांबण्यास सांगितले. तरीसुद्धा नागरिकांनी दुकानासमोर बसून जोरदारपणे निदर्शने केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर जमाव शांत झाला असला तरी त्यांनी पुन्हा या दोघींच्या गाड्यांनासुद्धा घेराव घातला.पालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांत असल्यामुळे नगरसेवकपदासाठी इच्छुकांकडून अशी आंदोलने केली जात आहेत, ही राजकीय स्टंटबाजी असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने अशा राजकीय स्टंटबाजी आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या हुल्लडबाजीला आळा बसण्यासाठी जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवावा, अशी मागणी जाणकारांकडून होत आहे; अन्यथा अशा हुल्लडबाज आंदोलनांतून काही अगळीक झाल्यास त्याचे गांभीर्य अधिक वाढेल. (प्रतिनिधी)आजपासून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठामजरेवाडी (ता. शिरोळ) येथे शनिवारी दुपारपासून कृष्णा नदीच्या डोहात यारीच्या सहाय्याने २२५ अश्वशक्तीचा सबमर्सिबल पंप सोडण्याचे काम सुरू झाले आहे. सुमारे साडेपाच टन वजनाचा हा अवजड पंप रात्री डोहात स्थापित होईल. त्याच्या विजेच्या केबल व पाण्याची दाबनलिका जोडून या पंपाची रविवारी उशिरा चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी झाल्यास आज, सोमवारपासून पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे होऊ लागेल. त्यानंतर तीन दिवसांतून एक वेळ असे जून महिन्यापर्यंत पाणी शहरवासीयांना मिळेल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ यांनी दिली. त्याचप्रमाणे कर्नाटकला एक टीएमसी पाणी देण्यासाठी कोयना धरणातून सोडलेले पाणीसुद्धा कृष्णा नदीपात्रामध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.