शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

इचलकरंजीतील पंचगंगेचा पूर ओसरू लागला

By admin | Updated: July 17, 2016 01:00 IST

सुमारे ८०० व्यक्तींना स्थलांतरित केले होते.

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीचा पूर ओसरू लागला असून दिवसभरामध्ये पाण्याची पातळी १ फूट १० इंचाने उतरली. दरम्यान, नगरपालिकेने पूरग्रस्तांसाठी उघडलेल्या सहा छावण्यांपैकी दोन छावण्यांतील कुटुंबे त्यांच्या घराकडे परतली. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्पुरता का होईना सुटकेचा श्वास सोडला.गेले चार दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी पंचगंगा नदीच्या पुराच्या पातळीत वाढ होत होती. त्यामुळे नगरपालिकेने पूरग्रस्त झालेल्या कुटुंबांसाठी सहा ठिकाणी छावण्या उघडल्या होत्या. या छावण्यांमध्ये १६८ कुटुंबांतील सुमारे ८०० व्यक्तींना स्थलांतरित केले होते. शुक्रवारी (दि. १५) पुराची पातळी स्थिरावली असली तरी ती उतरत नसल्यामुळे पालिका प्रशासन आणि पूरग्रस्तांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शुक्रवारी (दि. १५) मध्यरात्रीपर्यंत पुराचे पाणी ओसरू लागले.दिवसभरामध्ये १ फूट १० इंच पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत नगरपालिका गेस्ट हाऊस व सिकंदर दर्गा याठिकाणी असलेल्या छावण्यांमधील ४२५ नागरिक त्यांच्या घराकडे परतले. मात्र, अद्यापही चार छावण्यांमध्ये ८९ कुटुंबे राहत आहेत. पूर ओसरण्याची अशीच स्थिती राहिली तर येत्या दोन दिवसांत उर्वरित कुटुंबेसुद्धा त्यांच्या घरी परततील. (प्रतिनिधी)जीर्ण इमारतींबाबत आता कडक भूमिकागावभाग-माणगावकर बोळातील पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोघांचा मृत्यू झाल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने शनिवारी जीर्ण झालेल्या इमारतींबाबत कडक भूमिका घेतली. दिवसभरात १५ जुन्या इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शनिवारी दिवसभरात गावभागातील सहा घरांच्या भिंती ढासळण्याच्या स्थितीत असल्यामुळे त्यामधील रहिवाशांना घराबाहेर काढले. त्या इमारतींच्या भिंती जेसीबी व आपत्कालीन पथकाने पाडल्या. इमारतींच्या भिंती उतरवत असताना त्याठिकाणी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, नगर अभियंता संजय बागडे, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे शिवाजी जगताप, वाहन विभागाचे संजय कांबळे, आदी अधिकारी जातीने लक्ष ठेवून होते. यापुढे नगरपालिका प्रशासन जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींच्या विरोधात कडक भूमिका घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.