शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

इचलकरंजीतील पंचगंगेचा पूर ओसरू लागला

By admin | Updated: July 17, 2016 01:00 IST

सुमारे ८०० व्यक्तींना स्थलांतरित केले होते.

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीचा पूर ओसरू लागला असून दिवसभरामध्ये पाण्याची पातळी १ फूट १० इंचाने उतरली. दरम्यान, नगरपालिकेने पूरग्रस्तांसाठी उघडलेल्या सहा छावण्यांपैकी दोन छावण्यांतील कुटुंबे त्यांच्या घराकडे परतली. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्पुरता का होईना सुटकेचा श्वास सोडला.गेले चार दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी पंचगंगा नदीच्या पुराच्या पातळीत वाढ होत होती. त्यामुळे नगरपालिकेने पूरग्रस्त झालेल्या कुटुंबांसाठी सहा ठिकाणी छावण्या उघडल्या होत्या. या छावण्यांमध्ये १६८ कुटुंबांतील सुमारे ८०० व्यक्तींना स्थलांतरित केले होते. शुक्रवारी (दि. १५) पुराची पातळी स्थिरावली असली तरी ती उतरत नसल्यामुळे पालिका प्रशासन आणि पूरग्रस्तांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शुक्रवारी (दि. १५) मध्यरात्रीपर्यंत पुराचे पाणी ओसरू लागले.दिवसभरामध्ये १ फूट १० इंच पाण्याची पातळी कमी झाली. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत नगरपालिका गेस्ट हाऊस व सिकंदर दर्गा याठिकाणी असलेल्या छावण्यांमधील ४२५ नागरिक त्यांच्या घराकडे परतले. मात्र, अद्यापही चार छावण्यांमध्ये ८९ कुटुंबे राहत आहेत. पूर ओसरण्याची अशीच स्थिती राहिली तर येत्या दोन दिवसांत उर्वरित कुटुंबेसुद्धा त्यांच्या घरी परततील. (प्रतिनिधी)जीर्ण इमारतींबाबत आता कडक भूमिकागावभाग-माणगावकर बोळातील पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोघांचा मृत्यू झाल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने शनिवारी जीर्ण झालेल्या इमारतींबाबत कडक भूमिका घेतली. दिवसभरात १५ जुन्या इमारतींच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शनिवारी दिवसभरात गावभागातील सहा घरांच्या भिंती ढासळण्याच्या स्थितीत असल्यामुळे त्यामधील रहिवाशांना घराबाहेर काढले. त्या इमारतींच्या भिंती जेसीबी व आपत्कालीन पथकाने पाडल्या. इमारतींच्या भिंती उतरवत असताना त्याठिकाणी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, नगर अभियंता संजय बागडे, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे शिवाजी जगताप, वाहन विभागाचे संजय कांबळे, आदी अधिकारी जातीने लक्ष ठेवून होते. यापुढे नगरपालिका प्रशासन जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींच्या विरोधात कडक भूमिका घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.