शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत सर्वांचीच आंदोलने

By admin | Updated: September 20, 2016 23:47 IST

पालिका प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर : जिल्ह्यातील मोठ्या नगरपालिकेचे अब्रूचे धिंडवडे

इचलकरंजी : नियोजनाचा अभाव, कामकाजाचा उडालेला बोजवारा आणि नगरसेवकांपासून मक्तेदार व नागरिकांपर्यंत करावी लागत असलेली आंदोलने यामुळे येथील नगरपालिकेकडील प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. खराब रस्ते, अस्वच्छता, तसेच दवाखान्याकडे कुत्रे चावल्याची लस नसणे, अशा प्रकारांमुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नगरपालिकेचे अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.वास्तविक पाहता नगरपालिका ही संबंधित शहरातील रस्ते, पाणी, साफसफाई, दिवाबत्ती, अशा मूलभूत गरजांशी संबंधित असलेली स्वायत्त संस्था आहे. अशा स्वायत्त संस्थेला सरकारनेही अनुदान देऊ केले आहे. याशिवाय घरफाळा, बाजार कर, आदी कररूपी निधीचे संकलन करण्याची मुभा नगरपालिकांना आहे. यातूनच नगरपालिकेकडील विकासकामे व नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जातात. इचलकरंजीसारख्या नगरपालिकेचे वार्षिक आर्थिक अंदाजपत्रक सुमारे २५० कोटी रुपयांचे आहे.अशा स्थितीत नगरपालिकेकडून रस्त्यावरील खड्डे बुजविले जावेत, नियमितपणे रस्ते व गटारींची स्वच्छता व्हावी, पाणीपुरवठा वेळेत व पूर्ण दाबाने व्हावा, नगरपालिकेकडील दवाखान्याकडे असलेल्या विविध विभागांकडून चांगला औषधोपचार मिळावा, अशा मूलभूत सुविधा मिळण्याची अपेक्षा नागरिक करतात. मात्र, त्या पूर्ण होत नसल्यामुळे अनेकवेळा नागरिकांना व सामाजिक संघटनांना आंदोलने करावी लागतात. नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्याबद्दल पालिकेकडे सूचना दिल्या जातात. मात्र, त्या पुऱ्या होत नसल्यामुळे नागरिक, नगरसेवक व सामाजिक संस्थांना आंदोलने करावी लागत आहेत.या पार्श्वभूमीवर सातत्याने तक्रारी करून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही आणि कारवाई होत नाही म्हणून संयम तुटलेल्या नागरिकांवर शनिवारी मृत डुकरे नगरपालिकेमध्ये आणून आपला आक्रोश व्यक्त करण्याची पाळी आली. अशा या टोकाच्या भूमिकेने नगरपालिकेकडील प्रशासनाचा नियोजनाचा अभाव आणि त्यामुळे कारभाराचा उडालेला बोजवारा हा चव्हाट्यावर आला आहे. नगरपालिकेच्या आगामी निवडणुका अवघ्या अडीच महिन्यांवर आल्यामुळे आता तरी प्रशासनाने आपल्या कामकाजात सुधारणा करावी आणि नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा नियमितपणे पुरवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)सभेत प्रशासनाचे वाभाडे काढले जाईल; पण...शहरातील कचरा उठाव आणि सात वॉर्डांतील सफाईची निविदा काढण्याच्या प्रश्नावर नगरपालिकेची गुरुवारी विशेष सभा आयोजित केली आहे. सभेमध्ये दोन्ही कॉँग्रेस व शहर विकास आघाडी अशा सर्व नगरसेवकांकडून प्रशासनाचे वाभाडे काढले जातील; पण प्रशासनाच्या घोड्यावर ‘कमांड’ नसणे ही बाब सुद्धा राजकीय मंडळींना पर्यायाने नेतृत्वाला शोभा देत नाही, अशी नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.नगरपालिकेकडील सुरू असलेली भुयारी गटार योजना, नव्याने मंजूर झालेली वारणा नळ पाणी योजना, तसेच कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलण्याचा प्रस्ताव, अशा विविध कामांबरोबर कचरा उठाव, बांधकाम खात्याकडील कामे, आदी बाबींवर नगरपालिकेकडून सुमारे ७० कोटी रुपयांची देयके बाकी आहेत.यासाठी सुद्धा आता पालिका प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र, परस्परांवर कुरघोड्यांचे राजकारण करण्यासाठी धन्यता मानत असलेल्या लोकप्रतिनिधींमुळे पालिका प्रशासन मात्र गैरफायदा घेत मुर्दाड होत आहे. याकडे सुद्धा नेतेमंडळींनी लक्ष द्यावे, अशीही शहरात चर्चा आहे.