शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीच्या विद्यार्थिनीची मुंबईत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा (वय २०, रा. इचलकरंजी) असे तिचे नाव असून आत्महत्येपूर्वी तिने मित्राला व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज करून आपल्या कृत्याबाबत कल्पना दिली होती. या प्रकाराने महाविद्यालयात शोककळा पसरली आहे.भाग्यलक्ष्मी मुठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भाग्यलक्ष्मी गौतमचंद मुठा (वय २०, रा. इचलकरंजी) असे तिचे नाव असून आत्महत्येपूर्वी तिने मित्राला व्हॉटस्अ‍ॅपवर मेसेज करून आपल्या कृत्याबाबत कल्पना दिली होती. या प्रकाराने महाविद्यालयात शोककळा पसरली आहे.भाग्यलक्ष्मी मुठा ही मुळची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीची असून महापालिकेच्या नायर वैद्यकीय दंत महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती. मात्र अभ्यासक्रम अवघड जात असल्याने गेल्या काही दिवसांपासून ती अस्वस्थ होती. पालकांनी शिक्षणासाठी मोठा खर्च केल्याने महाविद्यालय मधेच सोडल्यास घरच्यांची बेअबु्र होईल, अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे मंगळवारी दुपारी हॉस्टेलच्या खोलीमध्ये कोणी नसताना तिने पंख्याला ओढणी अडकवून गळफास लावून घेतला. एकच्या सुमारास तिच्या खोलीतील मैत्रिण तिथे आली असता हा प्रकार उघडकीस आला. मैत्रिणीने आरडाओरड करत इतरांना कळविले. भाग्यलक्ष्मीला केईएम रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.पोलिसांना घटनास्थळी ‘सुसाईड नोट’ आढळली नाही. मात्र आत्महत्येच्या थोड्या वेळापूर्वी तिने ‘रेडिओलॉजिस्ट’विभागात शिकत असलेल्या आपल्या मित्राला व्हॉटस्अ‍ॅपवर त्याबाबत मॅसेज केल्याचे आढळून आल्याचे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप उगले यांनी सांगितले. याबाबत हॉस्टेलमधील तिचे अन्य सहकारी, मित्र मंडळीकडे चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.तो मेसेज शेवटचा ठरला...भाग्यलक्ष्मीने मनातील भावना मित्राला व्हॉटस्अ‍ॅपद्वारे बोलून दाखवली होती. त्या मेसेजमध्ये तिने बीडीएसचे शिक्षण अवघड जात असून घरच्यांनी शिक्षणासाठी खुप खर्च केल्याने सोडू शकत नसल्याचे स्पष्टपणे लिहिले होते. यामुळे निराश असून जीवनाचा अंत करावासा वाटतो, मला सगळ्यांनी माफ करावे, असेही स्पष्ट केले होते. त्यावर मित्राने तिला मेसेज पाठवत समजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मित्राच्या मेसेजकडे दुर्लक्ष करत भाग्यलक्ष्मीने आयुष्याचा शेवट करुन घेतला.....................................