शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इचलकरंजीच्या नगराध्यक्षांना अभय

By admin | Updated: June 19, 2015 00:36 IST

सुरेश हाळवणकर यांची माहिती : मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त

इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना शहर विकास आघाडीचा पाठिंबा कायम आहे, असे म्हणत आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. पवार यांच्या जागी ‘आयएएस’ दर्जाचा मुख्याधिकारी इचलकरंजी नगरपालिकेस द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.आठवड्यांच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आमदार हाळवणकर यांनी नगराध्यक्षा बिरंजे यांना अभय दिले. ते म्हणाले, पालिकेतील विकासकामे, पारदर्शीपणा आणि नागरी सेवा-सुविधांसाठी ‘शविआ’ ने त्यांना पाठिंबा दिला आहे; पण काही गैरव्यवहार दिसल्यास तो ‘शविआ’ हाणून पाडेल. त्यासाठी उदाहरण देताना कूपनलिकांवर पाणबुडे पंप व पाण्याच्या टाक्या बांधण्याच्या निविदेत भ्रष्टाचार दिसताच ती निविदा ‘शविआ’ ने हाणून पाडल्याचे आमदार हाळवणकर यांनी स्पष्ट केले.मुख्याधिकारी पवार यांचा प्रशासनावर वचक नसल्याने नगरपालिकेच्या कामकाजामध्ये वारंवार गोंधळ उडत आहे. कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी नगरपालिकेमध्ये बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रामध्ये कुणीतरी पाणी ओतले; पण त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी ‘नागरिकांची सनद (सिटीजन चार्टर)’ नगरपालिकेने स्वीकारला असली, तरी त्याची प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नाही. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी आयएएस दर्जाचा मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही कॅमेरे न बसविण्याचे गौडबंगालशहरातील काही प्रमुख ठिकाणी, तसेच नगरपालिका कार्यालयात पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार होते. मात्र, फक्त घोषणा करून कॅमेरे न बसविण्यामागे कोणते गौडबंगाल आहे, असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला. ते म्हणाले, नगरपालिका कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास गैरव्यवहारांना आळा बसेल. हाणामारी होणार नाही. ज्यामुळे नगरपालिकेची पर्यायाने शहराची प्रतिष्ठा वाढेल म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे मी माझ्या आमदार फंडातून बसविणार आहे.मक्तेदार नगरसेवकांमुळे दर्जाहीन कामेनगरपालिकेमध्ये मूठभर नगरसेवक हे मक्तेदार झाले आहेत. त्यांनी त्यांच्या सग्या-सोयऱ्यांच्या नावावर मक्ता घेतल्याने पालिकेची कामे दर्जाहीन होत असून, बिले मंजूर करून घेण्यासाठी दबाव टाकला जातो. प्रसंगी वाद घालत हाणामारी केली जाते. शिवीगाळ व धक्काबुक्की होण्यासारख्या प्रसंगाने इचलकरंजी नगरपालिकेचे सभागृह बदनाम होत आहे. म्हणून मुख्याधिकाऱ्यांना अशा नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यास सांगितले आहे. मात्र, त्यांच्याकडून हे काम होत नसल्याचे निदर्शनास येत आहे, असाही आरोप हाळवणकरांनी पत्रकारांशी बोलताना केला.