शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीकरांचे घरफाळा बजेट यंदा कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या थकीत रकमेसह वाढीव बिले दिल्याने मिळकतधारकांतून संताप व्यक्त होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या थकीत रकमेसह वाढीव बिले दिल्याने मिळकतधारकांतून संताप व्यक्त होत आहे. त्यापाठोपाठ जानेवारी, फेब्रुवारीमध्ये चतुर्थ वार्षिक कर आकारणीची दहा टक्के वाढीव रकमेनुसार घरफाळ्याची बिले नागरिकांना दिली जाणार आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षात मिळकतधारकांचे नगरपालिकेच्या घरफाळा, पाणीपट्टीसाठीचे बजेट कोलमडणार आहे.

नियमानुसार नगरपालिकेला प्रत्येक चार वर्षांनंतर मिळकतींची मोजणी करून चतुर्थ वार्षिक कर आकारणी किमान दहा टक्के वाढीव दराने करावी लागते. याआधी सन २०१६-१७ साली मोजणी झाली होती. त्यानंतर लॉकडाऊनमुळे एक वर्ष अंतर पडले. त्यामुळे यंदा मोजणी सुरू केली. या मोजणीचा १ ते १३ वॉर्डांतील पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यामध्ये २४ हजार मिळकतींची मोजणी झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील १४ ते २६ वॉर्डांतील मोजणी सुरू झाली असून, त्यातील सहा हजार मिळकतींची मोजणी झाली आहे. आजतागायत शहरातील ३० हजार मिळकतींच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील अद्याप २२ हजार मिळकतींची मोजणी बाकी आहे. ती साधारण दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर हरकती, सूचना व सुनावणी होऊन नवीन दहा टक्के वाढीव बिले जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागू केली जातील. मार्च २०२२ पर्यंत त्याची वसुली नगरपालिकेला करावी लागणार आहे. एकूणच घरफाळा व घनकचरा व्यवस्थापन अशी दोन्ही वाढीव बिले या आर्थिक वर्षातच आल्याने सामान्य मिळकतधारकांचे बजेट कोलमडणार आहे.

चौकटी

वसुलीसाठी तारेवरची कसरत

महापूर, लॉकडाऊन, महापूर अशा आपत्तींमुळे वस्त्रोद्योगासह सर्वच व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच महागाईने जगणे मुश्कील बनले आहे आणि पुन्हा वाढीव करामुळे आणखी एक अडचण वाढणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या करवसुली विभागाला वसुलीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मोजणीसाठी ८८ जणांचे पथक

शहरातील एकूण ५८ हजार मिळकतींच्या मोजणीसाठी ४४ क्लार्क व ४४ कर्मचारी असे ८८ जणांचे पथक कार्यरत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यातील काही कर्मचारी अन्य कामांकडे वर्ग झाल्याने मोजणीच्या कामात व्यत्यय येतो. सण संपल्यानंतर पुन्हा नियमित काम सुरू होते.