शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

इचलकरंजीत वीस तास वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:04 IST

इचलकरंजी : शनिवारी (दि. २७) रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील दक्षिण परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून विद्युत तारा ...

इचलकरंजी : शनिवारी (दि. २७) रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील दक्षिण परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळून विद्युत तारा तुटणे, वीज खांब वाकणे व पडणे, तसेच अनेक घरांवरील पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले. वादळी वाºयाबरोबर गायब झालेला वीजपुरवठा तब्बल वीस तासांनंतर सुमारे ६० टक्के परिसरात सुरू झाला होता. यामध्ये महावितरण कंपनीचे सुमारे ४० लाख, तर झाडे पडून व पत्रे उडाल्याने झालेले नुकसान सुमारे एक कोटी रुपये असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.गेल्या काही दिवसांच्या असह्य उकाड्यानंतर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहराच्या दक्षिण बाजूकडून आलेल्या वादळी वाºयामुळे गावभागापासून मंगळवार पेठ तसेच तांबे माळ परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली, तर काही झाडांच्या फांद्या पडून वीजवाहिन्या तुटल्या. याचा परिणाम म्हणून शहरातील सुमारे तीस टक्के भागामधील वीजपुरवठा खंडित झाला.दक्षिण परिसरातून अचानकपणे आलेल्या सोसाट्याच्या वाºयाचा झोत शहरात शिरला. त्यामुळे नदीवेस नाका परिसर, गणपती मंदिर परिसर, मरगुबाई मंदिर, लक्ष्मी दड्ड, नरसोबा कट्टा, आंबी गल्ली, कागवाडे मळा, दातार मळा, तांबे माळ, रिक्रिएशन हॉल-मंगळवार पेठ, ब्लड बॅँक, नाट्यगृह परिसर अशा व्यापक भागांमध्ये अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, तर काही झाडे उन्मळून पडली. या प्रकारामध्ये गावातील अनेक ठिकाणच्या वीजवाहिन्या तुटल्या, तर दहा ठिकाणी विजेचे खांब आणि शेतीतील चौदा विजेचे खांब उखडले. याशिवाय सुमारे ४२ ठिकाणी विजेचे खांब वाकले.आवाडे मळा परिसरात असलेल्या महावितरण कंपनीच्या उपकेंद्रातही ११ केव्हीए विद्युत वाहिनीवर दोन झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे उच्चदाबाची वाहिनीसुद्धा बंद पडली. सुमारे अर्धा तासांनंतर वारे व किरकोळ पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. अधिकारी व कर्मचाºयांनी नियोजन करून आवाडे मळ्यातील उपकेंद्रामध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर शहरात विविध ठिकाणी तुटलेल्या विद्युत वाहिन्या जोडण्याचे काम सुरू केले. रात्री तीन वाजेपर्यंत विजेचा पुरवठा करणारे दहा फिडर सुरू करण्यात आले होते. सकाळ झाल्यानंतर सुमारे १५० कर्मचारी वीजवाहिन्या जोडणे, खांब उभा करणे, तसेच झाडांच्या पडलेल्या फांद्या बाजूला करणे, त्याचबरोबर उन्मळून पडलेली झाडे तोडून दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. रविवारी सायंकाळी आपद्ग्रस्त परिसरामधील विद्युत वाहिन्या दुरुस्त करून सुमारे ७० टक्के परिसरातील वीजपुरवठा सुरू केला होता.