शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

इचलकरंजीत आज मराठा जागरण फेरी

By admin | Updated: October 13, 2016 02:02 IST

वैद्यकीय मदतीसाठी ८० पथके : फेरीमध्ये सव्वा लाख लोक सहभागी होण्याचा अंदाज; संयोजक, पोलिस प्रशासनाची नियोजन बैठक

इचलकरंजी : इचलकरंजीत आज, गुरुवारी आयोजित केलेल्या मराठा क्रांती जनजागरण फेरीसाठी बुधवारी मराठा सांस्कृतिक भवनामध्ये संयोजक व पोलिस प्रशासन यांची व्यापक बैठक झाली. फेरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, आवश्यकता भासल्यास तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध होण्याकरिता दोन हजार युवक व पाचशे युवतींची ८० पथके स्थापन केली. फेरीच्या अंतिम टप्प्यात राजाराम स्टेडियमवर येणाऱ्या महिला-पुरुषांसाठी ४०० महिला व पुरुषांचे पथक नेमण्यात आले.इचलकरंजीतील मराठा क्रांती जनजागरण फेरीमध्ये एक लाख लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे फेरीमध्ये गोंधळ उडू नये, अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याकरिता, तसेच नियंत्रण ठेवणे व गरजूंना ताबडतोब वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी दोन हजार युवक व पाचशे युवतींची ८० पथके नेमण्यात आली. ही पथके मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी थांबून वरीलप्रमाणे काम करतील. मोर्चाच्या मार्गावर प्रत्येक चौकात रुग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक ठेवणार आहे.राजर्षी शाहू पुतळ्यापासून निघणारा हा मोर्चा शिवाजी पुतळा, जनता चौक, महात्मा गांधी पुतळा, सुंदर बाग, शाहू कॉर्नर मार्गे जनता चौक, बंगला रोडवरून राजाराम स्टेडियममध्ये स्थिरावणार आहे. सुरुवातीला शालेय विद्यार्थिनी-युवती, त्यानंतर महिला, त्यानंतर शालेय विद्यार्थी-युवक, पुरुष आणि अखेरीस विविध राजकीय पक्षांचे नेते असा फेरीचा क्रम राहणार आहे. फेरी राजाराम स्टेडियमच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारातून स्टेडियममध्ये प्रवेश करेल. विद्यार्थिनी, युवती व महिलांना मैदानात आणि त्यानंतर येणाऱ्या पुरुषांना स्टेडियमच्या गॅलरीमध्ये शिस्तबद्धरीत्या बसविण्यात येईल. प्रांत कार्यालयातील प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यासाठी दहा युवतींचे एक पथक तहसीलदार वैशाली राजमाने यांच्याबरोबर प्रांत कार्यालयात जाईल. दरम्यानच्या काळात मैदानामध्ये एक युवती मराठा क्रांती मोर्चावरील कविता वाचन करेल. दुसरी युवती भाषण करेल, तर तिसरी युवती आभार मानेल. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन फेरीची सांगता होईल.फेरीत सहभागी झालेले लोक पुढे निघून गेल्यानंतर पथकातील स्वयंसेवकांकडून मोर्चाच्या मार्गावरील सर्व प्रकारचा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल. त्याचप्रमाणे स्टेडियम रिकामे झाल्यानंतर स्टेडियम आणि स्टेडियमच्या परिसरामध्ये झालेला कचरा मोर्चाचे संयोजक व स्वयंसेवकांकडून स्वच्छ केला जाईल, असे बुधवारच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)जागरण फेरीची आचारसंहिताजागरण फेरीचे आयोजक - मराठा मंडळाचे अध्यक्ष सुनील शेलार यांनी बुधवारच्या बैठकीमध्ये आचारसंहितेचे वाचन केले. आचारसंहितेतील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले.जनजागरण फेरी एका संवेदनशील प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी असल्यामुळे तिला उत्सवी स्वरूप प्राप्त करू न देता ही मूक फेरी असल्याचे काटेकोर पालन करावे. फेरीमध्ये फक्त भगवे झेंडेच राहतील. फेरीमधील फलकांवर कोणत्याही राजकीय नेत्याची छबी असता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचीच छायाचित्रे फलकावर असावीत. कोणत्याही संघटना किंवा संस्थांच्या नावाचे फलक असणार नाहीत. फेरीला येताना आणि परत जाताना शांतपणा व शिस्तीचे पालन करावे. फेरी कोणत्याही समाजाच्या विरोधात नसल्यामुळे अन्य समाज दुखावेल, अशा कोणत्याही स्वरूपाच्या घोषणा फलकांवर असू नयेत, आदींचा उल्लेख फेरीच्या आचारसंहितेमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.वारणा, मुस्लिम समाज, जनता बॅँकेतर्फे पाणी वितरणइचलकरंजीतील मराठा क्रांती जनजागरण फेरीमध्ये वारणा उद्योग समूहाकडून २०० मिलि स्वच्छ पाण्याचे तीन लाख पाऊच वितरित करण्यात येणार आहेत. फेरी स्टेडियममध्ये आल्यानंतर इचलकरंजीतील समस्त मुस्लिम समाजाकडून दहा टन केळी व स्वच्छ पाण्याचे एक लाख पाऊचचे वाटप करण्यात येणार आहे. या वाटपासाठी मुस्लिम समाजाकडून २५० युवकांची वेगवेगळी चार पथके तयार करण्यात आली आहेत, तर कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बॅँकेकडून शाहू पुतळा येथे (ज्या ठिकाणी फेरीची सुरुवात होणार आहे) स्वच्छ पिण्याचे पाणी दिले जाणार आहे.