शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इचलकरंजी पालिकेची सभा ‌ठरली वादळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST

नगरसेवकांचा आरोप आरोप-प्रत्यारोपांमुळे गोंधळ लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहापूर येथील सीईटीपी प्रकल्प, सारण गटारीची साफसफाई, नगरपालिका शाळेतील मुलांना ...

नगरसेवकांचा आरोप

आरोप-प्रत्यारोपांमुळे गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहापूर येथील सीईटीपी प्रकल्प, सारण गटारीची साफसफाई, नगरपालिका शाळेतील मुलांना साहित्य वाटप, जागेवरील आरक्षण, शहीद भगतसिंग उद्यानातील बुलेट ट्रेन, जलशुद्धीकरण केंद्राजवळील कापड विक्रीची गाळे, ठेकेदारांच्या कामांना देण्यात येणारी मुदतवाढ या विषयावरून सर्वसाधारण सभेत बुधवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यातील अनेक कामे ही बोगस असून, पालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची टीका काही नगरसेवकांनी केली.

श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित सर्वसाधारण सभा झाली.

अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या. सभेच्या सुरूवातीस नगरसेविका सायली लायकर यांनी लक्षवेधीमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापने बंद ठेवली आहेत. त्यामुळे व्यापाºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पालिकेने लवकर दुकाने सुरू करण्याची मागणी केली. बिग बाजारजवळ गटारी तुंबत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी करण्यात आल्या नाहीत. सदरचे काम त्वरित करावे, अशी मागणी नगरसेवक इकबाल कलावंत व रवींद्र माने यांनी केली. येत्या सोमवारपर्यंत यावर ठोस निर्णय न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कलावंत यांनी दिला.

सध्या शहरात गॅस पाईपलाईन जोडण्यासाठी खुदाई करताना पाण्याची पाईपलाईन तोडली जाते. तसेच खुदाई करताना नकाशा न घेताच काम सुरू असते. अशा प्रकारामुळे शहराचे वाटोळे होईल, असा आरोप पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे व सुनील पाटील यांनी केला. ताराराणीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी कायद्याने दर महिन्याला सभा घेण्याचे बंधनकारक आहे.

मात्र, २८ फेब्रुवारी २०२१ नंतर तब्बल चार महिन्यांनंतर ही सभा घेण्यात आली. यामुळे नगरपालिकेच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे मत मांडले. नगरसेवक बावचकर यांनी ऐनवेळच्या विषयांमध्ये ५ पैकी ३ विषय आर्थिक धोरणाचे आहेत. त्यामुळे ते रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार ते तीन विषय रद्द केले.

चौकटी

भगतसिंग उद्यानातील रेल्वे गेली कुठे?

दोन वर्षांपूर्वी भगतसिंग उद्यानात सुमारे एक कोटी २२ लाख रुपये खर्च करून विकासकामे केली होती. त्यातील रेल्वे काही दिवसातच बंद पडली. त्यानंतर आता पुन्हा नव्याने प्रस्ताव आणल्याने जुन्या रेल्वेचे काय झाले, असा सवाल बावचकर यांनी केला.

सीईटीपी प्रकल्पाला विरोध

शहापूर परिसरात प्रस्तावित असलेल्या सीईटीपी प्रकल्पाला परिसरातील नगरसेवकांनी विरोध केला. परंतु १५ विरुद्ध १८ मताने तो विषय मंजूर करण्यात आला, तर दोन सदस्य तटस्थ राहिले.