शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील अवैध धंदे राजरोसपणे सुरूच !

By admin | Updated: February 7, 2017 00:46 IST

पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालावे : कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात विळख्यात

इचलकरंजी : जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या इचलकरंजीतील मटका, गावठी दारूअड्डे, अंदर-बाहर यासह अन्य आॅनलाईन पद्धतीचा मटका राजरोसपणे सुरू आहे. कोल्हापूर शहरातील मटक्यावर विशेष लक्ष केंद्रित करणाऱ्या जिल्हा पोलिसप्रमुखांनी आता इचलकरंजीकडेही लक्ष वळवावे, अशी मागणी होत आहे.शहरातील अवैध व्यवसायाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने देशातील अनेक राज्यांतून लोक या ठिकाणी कामानिमित्त येऊन राहिले आहेत. त्यामध्ये कामगारांची संख्याही लक्षणीय आहे. मटका, जुगार, दारू, गुटखा अशा अनेक व्यसनांना कामगार बळी पडतात. त्यामुळे अशा अवैध व्यावसायिकांना येथील ग्राहकांच्या संख्येमुळे बळ मिळते. त्यामुळे असे अवैध व्यावसायिक आवश्यकतेनुसार पोलिस खात्यातील अधिकाऱ्याशी जुळवून घेत मागणीप्रमाणे पुरवठा करतात. सण, उत्सव, अमावास्या, पौर्णिमा, मंदी अशा कोणत्याही गोष्टींचा या धंद्यांवर परिणाम होत नाही. अधिकारी बदलले की, त्याप्रमाणे नियोजन लावले जाते. एखादा अधिकारी कडक पद्धतीचा आला, तर त्याचे नियोजन लावायला थोडा वेळ जातो. त्यानंतर सर्व काही अलबेल पद्धतीने सुरू राहते, अशी इचलकरंजी शहराची पार्श्वभूमी आहे. तीन वर्षांपूर्वी शहरातील वाढलेली गुन्हेगारी व अवैध व्यावसायिकांचा सुळसुळाट थांबविण्यासाठी तत्कालीन अधिकारी एस. चैतन्य यांनी कारवायांचा धडाका लावून सर्व काही नियंत्रणात आणले होते. त्यावेळी शहरामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची स्थापना करण्यात आली होती. त्या शाखेच्या प्रमुखपदी मानसिंग खोचे या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. चैतन्य व खोचे यांनी नियोजनबद्ध फिल्डिंग लावत गुन्हेगारी व अवैध व्यावसायिकांची मक्तेदारी मोडीत काढली. अशा व्यावसायिकांच्या संपर्कात व संबंधित असलेल्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवत कारवाईची फिल्डिंग लावली जात होती. त्यामुळे सर्व काही मोडीत काढण्यात यश मिळाले होते. ते अधिकारी बदलून गेल्यानंतर काही काळ त्यांच्या नावाचा दबदबा शहरात टिकून होता.त्यानंतर काळ बदलला, अधिकारी बदलले आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती सुरू झाली. नवीन अधिकाऱ्यांनी मोडून पडत आलेला अवैध व्यवसाय पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची आलेली संधी सोडून दिली. काही वेळ निघून गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांचा दबदबा कमी झाला आणि पुन्हा अवैध व्यावसायिकांना उभारी मिळाली. प्रमुख अधिकाऱ्याचे नियोजन योग्य पद्धतीने लागल्याने सर्व व्यवसाय सुरळीतपणे सुरू झाले. या विळख्यात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात अडकत चालला असून, पगारात भागत नसल्याने सावकारांच्या जाळ्यात तो अडकत चालला आहे. अनेकांचे संसार मोडून पडत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी आता इचलकरंजीकडे लक्ष वळवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)नवीन अधिकारी नवीन कायदाअवैध व्यवसाय करणाऱ्या सर्वच व्यावसायिकांना अधिकारी बदलला की, कायदाही बदलतो याची अनेकवेळा प्रचिती आली आहे. तसेच त्यांचे नियोजन वाढवून लावावे लागते, याचीही जाणीव आहे. त्यामुळे कारवाया सुरू झाल्यानंतर असे व्यावसायिक फिल्डिंग लावण्यासाठी राजकीय, सामाजिक व्यक्तींना मध्ये घालून प्रयत्न करीत असतात. कारवाया थांबल्या की, जनतेला कायदा बदलल्याचे समजते.अनेक पोलिस कर्मचारी अवैध व्यवसायात भागीदारशहरातील पोलिस ठाण्यांमधील अनेक पोलिस कर्मचारी अशा अवैध व्यावसायिकांसोबत त्यांच्या व्यवसायात भागीदार बनले आहेत. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन लावणे हे एकच काम तशा पोलिसांना दिलेले असते. त्यांचा रूबाबही अधिकाऱ्यांप्रमाणेच असतो. पोलिस दलातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अन्य पोलिसांना याबाबत माहितीही असते. मात्र, साहेबांचे नियोजन लावणाऱ्याच्या विरोधात बोलणार कोण?