शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील टोळ्या ‘मोका’टच!

By admin | Updated: July 25, 2016 00:57 IST

शहरात दहशत : माळी टोळीप्रमाणे मुसक्या आवळण्याची गरज

अतुल आंबी ल्ल इचलकरंजी शहापूर, तारदाळ व खोतवाडी या ग्रामीण परिसरासह औद्योगिक वसाहतीत खंडणी, खून, अपहरण यासह गंभीर गुन्हे करून दहशत पसरविणाऱ्या अमोल माळीच्या टोळीवर इचलकरंजी पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. या कारवाईचे नागरिकांतून स्वागतच होत आहे. मात्र, शहरातील अवैध व्यवसायाच्या माध्यमातून आपली दहशत पसरविणाऱ्या टोळ्या अद्याप मोकाटच आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमोल माळी याच्यासह आठजणांच्या टोळीवर शहापूर पोलिसांनी मोका (संघटित गुन्हेगारी) कायद्यांतर्गत कारवाई केली. गंभीर दहा गुन्ह्यांत सहभाग असल्याने मोकाअंतर्गत कारवाई करणे पोलिसांना शक्य झाले. मात्र, अन्य गुन्हेगारांची परिस्थिती वेगळीच आहे. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनीच कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. कारण अनेक मोठ्या गुन्हेगारांनी प्रत्येक गुन्ह्यावेळी सहकारी बदलले आहेत. तर गंभीर गुन्ह्यांमध्ये काही वर्षांचे अंतर टाकले आहे. त्यामुळे असे गुन्हेगार मोका कायद्याच्या तडाख्यात सापडण्यापासून बचावतात. वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात देशातील अनेक राज्यांतून नागरिक याठिकाणी व्यवसायासाठी येऊन रहिवाशी झाले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांबरोबर अशा काही प्रवृत्तीही शहरात आल्या. त्यांनी स्थानिक गुंडांबरोबर हातमिळवणी करून आपले साम्राज्य निर्माण केले. अवैध व्यवसाय, त्यातून मिळणारा पैसा या माध्यमातून तरुणांना भुरळ घालून आपल्या जाळ्यात ओढले. कमी श्रमातून मिळणारा अधिक पैसा, भुरटा रूबाब या भूलभुलय्यात अडकून असे तरुण काहीही करायला तयार असतात. कायद्याचा व पोलिसांचा धाक कमी झाल्यानेच अशी गुन्हेगारी फोफावते. चिल्लर फाळकूटदादाही एखाद्या पोलिसाबरोबर सलगी करून रूबाबात फिरतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सरकार बदलते, मंत्री बदलतात, पोलिस अधिकारीही बदलतात. मात्र, शहरातील गुंड, गुन्हेगार तसेच राहतात. या गुन्हेगारांना गजाआड करून सर्वसामान्य जनतेला कोणाकडून न्याय मिळणार का? वर्षानुवर्षे आपले साम्राज्य प्रस्थापित करून उजळ माथ्याने मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न जनतेतून व्यक्त होत आहे. ‘मोका’ कायद्यातील तरतूद ‘मोका’ कायद्याच्या तरतुदीनुसार दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येऊन सलग तीन वर्षांच्या कालावधीत पैसे मिळविण्याच्या उद्देशाने केलेले गंभीर गुन्हे दाखल झाल्यास मोका अंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे शहरातील काही नामी गुन्हेगार याच्या तडाख्यात सापडण्यापासून बचावतात. अनेक गुन्हेगारांना नगरसेवकपदाची स्वप्ने ४इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने अनेक गुन्हेगारी जगतातील गुंडांना नगरसेवक बनण्याची स्वप्ने पडत आहेत. त्या पद्धतीने भागात ‘फिल्डिंग’ लावण्याचे कामही काहीजणांनी सुरू केले आहे. ४अवैध मार्गाने पैसे कमवायचे आणि राजकारणात येऊन ‘व्हाईट कॉलर’ बनून आपली प्रतिमा उजळ करण्याचा हा प्रयत्न आहे. यांना जनतेशिवाय आता रोखणार तरी कोण? शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रवृत्तींना मते देऊन नेता बनवू नका, असा संदेश देण्यास सुरुवात केली आहे. जनतेने डोळसपणे मतदान केल्यास अशा प्रवृत्ती ठेचल्या जातील.