शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील गोसावी झोपडपट्टीचे रूपडे पालटणार

By admin | Updated: April 26, 2017 00:48 IST

वसाहतीवरील आरक्षण रद्द : मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा ७०० कुटुंबांना लाभ

इचलकरंजी : शहरातील गोसावी झोपडपट्टीच्या जागेवर असलेले कन्या शाळा विस्तारीकरण व क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. झोपडपट्टीचे आहे त्याच जागी पुनर्वसन करण्यासही मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळातील या निर्णयाचा लाभ सुमारे ७०० कुटुंबांना होणार आहे.येथील टेलिफोन भवनसमोर गोसावी झोपडपट्टी नावाची वसाहत १०५०२ चौरस मीटर जागेवर वसली आहे. या झोपडपट्टीत बहुतांशी गोसावी समाजाची घरे असून, गेली ७० वर्षे ते येथील रहिवाशी आहेत. सन १९८१ मध्ये झालेल्या नगर नियोजन व विकास आराखड्यात झोपडपट्टीच्या जागेवर कन्या शाळा विस्तार व क्रीडांगण असे आरक्षण पडले. हे आरक्षण रद्द व्हावे आणि त्याच ठिकाणी झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करावे, यासाठी १९९९ पासून तत्कालीन नगरसेवक वसंत माळी हे शासन दरबारी प्रयत्न करीत होते.मात्र या जागेवर असलेले आरक्षण रद्द करावे व आहे त्याच ठिकाणी झोपडपट्टीचे पुनर्वसन करावे, अशा आशयाचा प्रस्ताव २०१० मध्ये नगरविकास मंत्रालयाने फेटाळला होता. परिणामी, गोसावी समाजाच्या या झोपडपट्टीवर टांगती तलवार कायम होती. त्यामुळे अज्ञानी व भंगार गोळा करून उपजीविका करणाऱ्या या झोपडपट्टीवासीयांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा करण्यात आला.पालिकेच्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने मंजुरी द्यावी, यासाठी नगरसेवक माळी, आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरदार प्रयत्न केले. यामध्ये माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अखेर या प्रयत्नांना मंगळवारी यश मिळाले. मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत गोसावी समाजाच्या झोपडपट्टीचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करून त्याठिकाणचे कन्या शाळा विस्तार व खेळाचे मैदान हे आरक्षण उठविण्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत झोपडपट्टीवासीयांनी फटाक्यांची आतषबाजी करून व साखर वाटून केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पाटील व आमदार हाळवणकर यांचे अभिनंदन करणाऱ्या घोषणा झोपडपट्टीवासीयांनी दिल्या. यावेळी बोलताना माजी नगरसेवक माळी म्हणाले, १८ वर्षे केलेल्या प्रयत्नांना आज यश प्राप्त झाले असून, अशा प्रकारे झोपडपट्टीच्या जागेवरील आरक्षण शासनाने रद्द करण्याची पहिलीच घटना आहे. (प्रतिनिधी)गोसावी समाज हा गरीब व काबाडकष्ट करून जगणारा असून, त्या जागेवर गेली ७० वर्षे ते राहत होते. त्यांच्या डोक्यावर असलेली आरक्षणाची टांगती तलवार दूर करण्यात यश आले. आता पंतप्रधान आवास योजनेतून त्यांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. त्यांचे राहणीमान उंचावे, यासाठी अन्य सेवा-सुविधाही त्यांना पुरविल्या जातील.- सुरेश हाळवणकर, आमदार