शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

इचलकरंजीतील गोसावी झोपडपट्टीचे रूपडे पालटणार

By admin | Updated: April 26, 2017 00:48 IST

वसाहतीवरील आरक्षण रद्द : मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा ७०० कुटुंबांना लाभ

इचलकरंजी : शहरातील गोसावी झोपडपट्टीच्या जागेवर असलेले कन्या शाळा विस्तारीकरण व क्रीडांगणाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. झोपडपट्टीचे आहे त्याच जागी पुनर्वसन करण्यासही मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळातील या निर्णयाचा लाभ सुमारे ७०० कुटुंबांना होणार आहे.येथील टेलिफोन भवनसमोर गोसावी झोपडपट्टी नावाची वसाहत १०५०२ चौरस मीटर जागेवर वसली आहे. या झोपडपट्टीत बहुतांशी गोसावी समाजाची घरे असून, गेली ७० वर्षे ते येथील रहिवाशी आहेत. सन १९८१ मध्ये झालेल्या नगर नियोजन व विकास आराखड्यात झोपडपट्टीच्या जागेवर कन्या शाळा विस्तार व क्रीडांगण असे आरक्षण पडले. हे आरक्षण रद्द व्हावे आणि त्याच ठिकाणी झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करावे, यासाठी १९९९ पासून तत्कालीन नगरसेवक वसंत माळी हे शासन दरबारी प्रयत्न करीत होते.मात्र या जागेवर असलेले आरक्षण रद्द करावे व आहे त्याच ठिकाणी झोपडपट्टीचे पुनर्वसन करावे, अशा आशयाचा प्रस्ताव २०१० मध्ये नगरविकास मंत्रालयाने फेटाळला होता. परिणामी, गोसावी समाजाच्या या झोपडपट्टीवर टांगती तलवार कायम होती. त्यामुळे अज्ञानी व भंगार गोळा करून उपजीविका करणाऱ्या या झोपडपट्टीवासीयांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा करण्यात आला.पालिकेच्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने मंजुरी द्यावी, यासाठी नगरसेवक माळी, आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरदार प्रयत्न केले. यामध्ये माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. अखेर या प्रयत्नांना मंगळवारी यश मिळाले. मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत गोसावी समाजाच्या झोपडपट्टीचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करून त्याठिकाणचे कन्या शाळा विस्तार व खेळाचे मैदान हे आरक्षण उठविण्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या निर्णयाचे स्वागत झोपडपट्टीवासीयांनी फटाक्यांची आतषबाजी करून व साखर वाटून केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पाटील व आमदार हाळवणकर यांचे अभिनंदन करणाऱ्या घोषणा झोपडपट्टीवासीयांनी दिल्या. यावेळी बोलताना माजी नगरसेवक माळी म्हणाले, १८ वर्षे केलेल्या प्रयत्नांना आज यश प्राप्त झाले असून, अशा प्रकारे झोपडपट्टीच्या जागेवरील आरक्षण शासनाने रद्द करण्याची पहिलीच घटना आहे. (प्रतिनिधी)गोसावी समाज हा गरीब व काबाडकष्ट करून जगणारा असून, त्या जागेवर गेली ७० वर्षे ते राहत होते. त्यांच्या डोक्यावर असलेली आरक्षणाची टांगती तलवार दूर करण्यात यश आले. आता पंतप्रधान आवास योजनेतून त्यांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल. त्यांचे राहणीमान उंचावे, यासाठी अन्य सेवा-सुविधाही त्यांना पुरविल्या जातील.- सुरेश हाळवणकर, आमदार