शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत यंत्रमागधारकांचे धरणे

By admin | Updated: July 28, 2016 00:52 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : वस्त्रोद्योगातील मंदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू

इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील मंदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी येथील प्रांत कार्यालय चौकात बुधवारपासून यंत्रमागधारकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह कारखानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाठिंबा दर्शविला.गेल्या वर्षापासून वस्त्रोद्योगाला मंदीचे ग्रहण लागले आहे. वीज आणि सूत दरातील सततची वाढ, तसेच कापडाला योग्य प्रमाणात नसलेली मागणी यामुळे यंत्रमागधारक नुकसान सोसून व्यवसाय चालवित आहे. यंत्रमाग व्यवसायाला शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीत घट झाल्याने यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. शहरातील बहुतांश यंत्रमागधारक आपले कारखाने आठवड्यातून काही वेळा बंद ठेवत आहेत. दरम्यान, हत्ती चौक परिसरातील यंत्रमागधारकाने कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जीवन बरगे, अमोद म्हेतर, रामचंद्र हावळ, जनार्दन चौगुले, रावसाहेब तिप्पे, बाळकृष्ण लवटे, गणेश शहाणे, सचिन भुते व फारुक शिरगावे यांनी बुधवारपासून प्रांत कार्यालय चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे. पाच दिवस हे आंदोलन सुरू राहणार असून, यातूनही शासनाने लक्ष न दिल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनास वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपनगराध्यक्ष महावीर जैन, सागर चाळके, कामगार नेते मिश्रीलाल जाजू, सदा मलाबादे, नरसिंह पारीक, संघटनेचे विश्वनाथ मेटे, विनय महाजन, नारायण दुरुगडे, प्रदीप धुत्रे यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि कारखानदारांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. (वार्ताहर)शासनाने वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था आणावीइचलकरंजी : राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणारा वस्त्रोद्योग मंदीच्या भयावह परिस्थितीतून जात आहे. त्याला सावरण्यासाठी राज्य शासनाने या उद्योगाकडे ताबडतोब लक्ष द्यावे. योग्य ती उपाययोजना करून या उद्योगाला ऊर्जितावस्था आणावी. जेणेकरून यंत्रमाग कारखानदारांबरोबर कामगारांचेसुद्धा जीवनमान उंचावेल, अशा आशयाचे पत्रक भारतीय कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सचिन खोंद्रे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.वस्त्रोद्योग मोडकळीस आल्यामुळे अनेक यंत्रमाग कारखानदार कर्जबाजारी झाले आहेत. अशा या यंत्रमागाची चाके मंदावली, तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठोपाठ यंत्रमागधारक व कामगार आत्महत्येस प्रवृत्त होतील. त्यामुळे विजेच्या दराची सवलत, वाढत जाणाऱ्या सुताचे भाव नियंत्रणात आणणे, तसेच कापड उत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी खेळत्या भांडवलावर अनुदान, अशा सवलती शासनाने ताबडतोब लागू कराव्यात, असेही या पत्रकात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)