शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

वारणा पाणी योजनेसाठी इचलकरंजीत आज बंद, मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:46 IST

इचलकरंजी : शासनाने इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून मंजूर केलेली नळ पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी व पिण्यासाठी हक्काचे पाणी द्यावे, या मागणीसाठी इचलकरंजीत आज, सोमवारी बंद व सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी मोठे आंदोलन होत आहे.इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे शहर असल्याने येथे प्रामुख्याने कामगार व यंत्रमागधारक यांच्यामध्ये आपल्या हक्कासाठी ...

इचलकरंजी : शासनाने इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून मंजूर केलेली नळ पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी व पिण्यासाठी हक्काचे पाणी द्यावे, या मागणीसाठी इचलकरंजीत आज, सोमवारी बंद व सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी मोठे आंदोलन होत आहे.इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे शहर असल्याने येथे प्रामुख्याने कामगार व यंत्रमागधारक यांच्यामध्ये आपल्या हक्कासाठी झालेला संघर्ष अनेकवेळा नागरिकांनी अनुभवला आहे. मोर्चा, प्रतिमोर्चा, उपोषण, उद्योग बंद, शहर बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने येथे झाली आहेत. पंचगंगा नदी दूषित झाल्याने कृष्णा नदीतून शासनाने नळ योजना कार्यान्वित करावी, यासाठी २५ वर्षांपूर्वी व्यंकोबा मैदानात पाणी परिषदही झाली आहे. कोल्हापूर शहराप्रमाणेच काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी मिळावे, यासाठी नगरपालिकेने केलेली मागणी ही योजना किफायतशीर होणार नाही, या कारणास्तव शासनाने फेटाळली. मात्र, त्याचवेळेला इचलकरंजीसाठी किफायतशीर नळ योजना देण्यासाठी शासनाकडून जीवन प्राधिकरणामार्फत सर्वेक्षण झाले. नोव्हेंबर सन २०१५ मध्ये जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांच्या पथकाने सर्वेक्षण करून दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीतून पाणी योजना राबविण्यासाठी शिफारस केली.त्याप्रमाणे जून २०१६ मध्ये शहरास ६८.६८ कोटी रुपयांच्या वारणा नळ योजनेला मान्यता मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ एप्रिल २०१७ रोजी या योजनेचे ई भूमिपूजन केले.इचलकरंजी शहराने पाणी योजना राबविल्यास वारणा नदीच्या काठावरील गावांना पाणी कमी पडेल. ज्यामुळे शेतीतील पिकांना पाणीटंचाई भासेल, अशा समजातून वारणा काठावरील गावांनी इचलकरंजीच्या या योजनेस विरोध केला आहे. प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या पातळीवर झालेल्या सात बैठकांतून तोडगा निघाला नाही. २ मे रोजी नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी दानोळी येथे गेलेल्या प्रशासन व पोलीस यंत्रणेला जोरदार विरोध झाला.अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजीकरांना शासनाने मंजूर केलेले पिण्याचे आरक्षित पाणी मिळावे, त्यासाठी नळ योजना युद्धपातळीवर राबवावी, यासाठी इचलकरंजीमध्ये आता सर्वपक्षीय आंदोलन उभे राहू लागले आहे.त्याचाच एक टप्पा म्हणून आज, सोमवारी शहर बंद ठेवून सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केला आहे.१ टीएमसी पाण्यासाठी होणारा विरोध अनाकलनीयवारणा धरण प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३४.३६ टीएमसी आहे. त्यापैकी २७.५० टीएमसी जलसाठा उपयुक्त आहे. त्यामध्ये १०.८१ टीएमसी पाणी पिण्यासाठी व उद्योगासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. तर शेती सिंचनासाठी १६.६९ टीएमसी पाणी आरक्षित आहे. सध्या वारणा काठावरील सर्व गावे आणि इचलकरंजीसाठी आरक्षित असलेल्या एक टीएमसी पाण्यासह ५.३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित असून, अद्यापही ५.४६ टीएमसी पाणी शिल्लक आहे. म्हणजे शेती सिंचनासाठी १६.६९ टीएमसी पाणी व पिण्यासाठी आरक्षित असलेल्या पाण्यापैकी ४.४६ टीएमसी पाणी शिल्लक असतानाही इचलकरंजीला केवळ एक टीएमसी पाणी देण्यासाठी झालेला विरोध अनाकलनीय आहे.