शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वारणा पाणी योजनेसाठी इचलकरंजीत आज बंद, मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:46 IST

इचलकरंजी : शासनाने इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून मंजूर केलेली नळ पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी व पिण्यासाठी हक्काचे पाणी द्यावे, या मागणीसाठी इचलकरंजीत आज, सोमवारी बंद व सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी मोठे आंदोलन होत आहे.इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे शहर असल्याने येथे प्रामुख्याने कामगार व यंत्रमागधारक यांच्यामध्ये आपल्या हक्कासाठी ...

इचलकरंजी : शासनाने इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून मंजूर केलेली नळ पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी व पिण्यासाठी हक्काचे पाणी द्यावे, या मागणीसाठी इचलकरंजीत आज, सोमवारी बंद व सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले आहे. शहराच्या इतिहासात प्रथमच पाण्यासाठी मोठे आंदोलन होत आहे.इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे शहर असल्याने येथे प्रामुख्याने कामगार व यंत्रमागधारक यांच्यामध्ये आपल्या हक्कासाठी झालेला संघर्ष अनेकवेळा नागरिकांनी अनुभवला आहे. मोर्चा, प्रतिमोर्चा, उपोषण, उद्योग बंद, शहर बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने येथे झाली आहेत. पंचगंगा नदी दूषित झाल्याने कृष्णा नदीतून शासनाने नळ योजना कार्यान्वित करावी, यासाठी २५ वर्षांपूर्वी व्यंकोबा मैदानात पाणी परिषदही झाली आहे. कोल्हापूर शहराप्रमाणेच काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी मिळावे, यासाठी नगरपालिकेने केलेली मागणी ही योजना किफायतशीर होणार नाही, या कारणास्तव शासनाने फेटाळली. मात्र, त्याचवेळेला इचलकरंजीसाठी किफायतशीर नळ योजना देण्यासाठी शासनाकडून जीवन प्राधिकरणामार्फत सर्वेक्षण झाले. नोव्हेंबर सन २०१५ मध्ये जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांच्या पथकाने सर्वेक्षण करून दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीतून पाणी योजना राबविण्यासाठी शिफारस केली.त्याप्रमाणे जून २०१६ मध्ये शहरास ६८.६८ कोटी रुपयांच्या वारणा नळ योजनेला मान्यता मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ एप्रिल २०१७ रोजी या योजनेचे ई भूमिपूजन केले.इचलकरंजी शहराने पाणी योजना राबविल्यास वारणा नदीच्या काठावरील गावांना पाणी कमी पडेल. ज्यामुळे शेतीतील पिकांना पाणीटंचाई भासेल, अशा समजातून वारणा काठावरील गावांनी इचलकरंजीच्या या योजनेस विरोध केला आहे. प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या पातळीवर झालेल्या सात बैठकांतून तोडगा निघाला नाही. २ मे रोजी नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी दानोळी येथे गेलेल्या प्रशासन व पोलीस यंत्रणेला जोरदार विरोध झाला.अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजीकरांना शासनाने मंजूर केलेले पिण्याचे आरक्षित पाणी मिळावे, त्यासाठी नळ योजना युद्धपातळीवर राबवावी, यासाठी इचलकरंजीमध्ये आता सर्वपक्षीय आंदोलन उभे राहू लागले आहे.त्याचाच एक टप्पा म्हणून आज, सोमवारी शहर बंद ठेवून सर्वपक्षीय मोर्चा आयोजित केला आहे.१ टीएमसी पाण्यासाठी होणारा विरोध अनाकलनीयवारणा धरण प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३४.३६ टीएमसी आहे. त्यापैकी २७.५० टीएमसी जलसाठा उपयुक्त आहे. त्यामध्ये १०.८१ टीएमसी पाणी पिण्यासाठी व उद्योगासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. तर शेती सिंचनासाठी १६.६९ टीएमसी पाणी आरक्षित आहे. सध्या वारणा काठावरील सर्व गावे आणि इचलकरंजीसाठी आरक्षित असलेल्या एक टीएमसी पाण्यासह ५.३५ टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित असून, अद्यापही ५.४६ टीएमसी पाणी शिल्लक आहे. म्हणजे शेती सिंचनासाठी १६.६९ टीएमसी पाणी व पिण्यासाठी आरक्षित असलेल्या पाण्यापैकी ४.४६ टीएमसी पाणी शिल्लक असतानाही इचलकरंजीला केवळ एक टीएमसी पाणी देण्यासाठी झालेला विरोध अनाकलनीय आहे.