शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारक संकटात

By admin | Updated: September 1, 2014 23:50 IST

कापड गाठी वाहतुकीचा संप : सहाशे ट्रक माल पडून

घन:शाम कुंभार -यड्राव -इचलकरंजी व परिसरातील उत्पादन होणारे कापड राजस्थानमधील पाली व जोधपूर येथे मोठ्या प्रमाणात जाते. त्या कापडकाठी वाहतुकीचे दर वाढवून घेण्यासाठी येथील वाहतूक कंपन्यांनी वाहतूक बंद केली आहे. यामुळे सुमारे पंधरा दिवसांपासून सहाशे ट्रक माल पडून राहिल्याने यंत्रमागधारक आर्थिक संकटात सापडला आहे. यामध्ये क्लॉथ मर्चट असोसिएशन व वाहतूक कंपनीमध्ये समन्वय होत नसल्याने यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.इचलकरंजी व परिसरामध्ये केंब्रिक व मलमलचे सुमारे सव्वा कोटी मीटर कापडाचे उत्पादन होते. हे कापड पुढील प्रक्रियेसाठी राजस्थानमधील पाली व जोधपूर येथे मोठ्या प्रमाणात जाते. एका ट्रकमधून अडीचशे गाठीची वाहतूक होते. याप्रमाणे दररोज चाळीस ट्रक पाली-जोधपूरकडे जातात. इचलकरंजी येथील सात ते आठ वाहतूकदार कंपन्यांच्या माध्यमातून कापड गाठीची वाहतूक केली जाते.पाली येथे कापडगाठी पोहोचल्यावर प्रती गाठ २८० रुपये असे वाहतूक भाडे आहे, ते भाडे चारशे दहा रुपये मिळावे, अशी वाहतूक कंपनीची मागणी आहे. भाडेवाढ देण्यास पाली येथील ग्राहक तयार नसल्याने वाहतूकदारांनी कापडगाठी वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पाली-जोधपूर कापडगाठी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अंदाजे सहाशे ट्रक कापड पडून राहिले आहे. परिणामी यंत्रमागधारकांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत असून इचलकरंजीच्या आर्थिक व्यवहारावर विपरीत परिणाम होत आहे. क्लॉथ मर्चंट असोसिएशन व वाहतूकदार कंपनी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही. याचा फटका सर्वसामान्य यंत्रमागधारकांना बसत आहे. पर्यायाने अडत्यास कमी दरात कापड विक्री करून स्वत:च्या कारखान्यातील कापडगाठींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होत आहे.यंत्रमाग व कापड यावर निर्भर असलेल्या इचलकरंजीचा हा मुख्य उद्योग आहे. उत्पादित झालेला माल संबंधित व्यापाऱ्यांना पोहोचला तर पुढच्या मालाचा उठाव होणार यासाठी वाहतूक दर योग्य तो ठरविण्यासाठी उत्पादक व वाहतूकदार यांच्यामध्ये समन्वय होणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी यड्राव, खोतवाडी, तारदाळ परिसरातील यंत्रमागधारकांनी पुढाकार घेतला आहे. प्रकाश तांबेकर, दीपक मगदूम, सचिन मगदूम ही मंडळी यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कमी दराने कापडाची विक्री कापड तागे उचल झाल्याशिवाय पेमेंट येत नाही. त्यामुळे सुताचे पैसे देता येत नाहीत. कापड उचल होत नसल्याने ते ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. यामुळे अडत्यांना कमी दरात कापड विक्री करून नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते वाहतुकीचा प्रश्न मिटल्यास सुटतील, असे यड्राव-खोतवाडी असोसिएशनचे प्रकाश तांबेकर यांनी सांगितले.