शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी व परिसरातील यंत्रमागधारक संकटात

By admin | Updated: September 1, 2014 23:50 IST

कापड गाठी वाहतुकीचा संप : सहाशे ट्रक माल पडून

घन:शाम कुंभार -यड्राव -इचलकरंजी व परिसरातील उत्पादन होणारे कापड राजस्थानमधील पाली व जोधपूर येथे मोठ्या प्रमाणात जाते. त्या कापडकाठी वाहतुकीचे दर वाढवून घेण्यासाठी येथील वाहतूक कंपन्यांनी वाहतूक बंद केली आहे. यामुळे सुमारे पंधरा दिवसांपासून सहाशे ट्रक माल पडून राहिल्याने यंत्रमागधारक आर्थिक संकटात सापडला आहे. यामध्ये क्लॉथ मर्चट असोसिएशन व वाहतूक कंपनीमध्ये समन्वय होत नसल्याने यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.इचलकरंजी व परिसरामध्ये केंब्रिक व मलमलचे सुमारे सव्वा कोटी मीटर कापडाचे उत्पादन होते. हे कापड पुढील प्रक्रियेसाठी राजस्थानमधील पाली व जोधपूर येथे मोठ्या प्रमाणात जाते. एका ट्रकमधून अडीचशे गाठीची वाहतूक होते. याप्रमाणे दररोज चाळीस ट्रक पाली-जोधपूरकडे जातात. इचलकरंजी येथील सात ते आठ वाहतूकदार कंपन्यांच्या माध्यमातून कापड गाठीची वाहतूक केली जाते.पाली येथे कापडगाठी पोहोचल्यावर प्रती गाठ २८० रुपये असे वाहतूक भाडे आहे, ते भाडे चारशे दहा रुपये मिळावे, अशी वाहतूक कंपनीची मागणी आहे. भाडेवाढ देण्यास पाली येथील ग्राहक तयार नसल्याने वाहतूकदारांनी कापडगाठी वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून पाली-जोधपूर कापडगाठी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अंदाजे सहाशे ट्रक कापड पडून राहिले आहे. परिणामी यंत्रमागधारकांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत असून इचलकरंजीच्या आर्थिक व्यवहारावर विपरीत परिणाम होत आहे. क्लॉथ मर्चंट असोसिएशन व वाहतूकदार कंपनी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही. याचा फटका सर्वसामान्य यंत्रमागधारकांना बसत आहे. पर्यायाने अडत्यास कमी दरात कापड विक्री करून स्वत:च्या कारखान्यातील कापडगाठींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होत आहे.यंत्रमाग व कापड यावर निर्भर असलेल्या इचलकरंजीचा हा मुख्य उद्योग आहे. उत्पादित झालेला माल संबंधित व्यापाऱ्यांना पोहोचला तर पुढच्या मालाचा उठाव होणार यासाठी वाहतूक दर योग्य तो ठरविण्यासाठी उत्पादक व वाहतूकदार यांच्यामध्ये समन्वय होणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी यड्राव, खोतवाडी, तारदाळ परिसरातील यंत्रमागधारकांनी पुढाकार घेतला आहे. प्रकाश तांबेकर, दीपक मगदूम, सचिन मगदूम ही मंडळी यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कमी दराने कापडाची विक्री कापड तागे उचल झाल्याशिवाय पेमेंट येत नाही. त्यामुळे सुताचे पैसे देता येत नाहीत. कापड उचल होत नसल्याने ते ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. यामुळे अडत्यांना कमी दरात कापड विक्री करून नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते वाहतुकीचा प्रश्न मिटल्यास सुटतील, असे यड्राव-खोतवाडी असोसिएशनचे प्रकाश तांबेकर यांनी सांगितले.