शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

इचलकरंजीत छेडछाडीने मुली हैराण

By admin | Updated: June 30, 2016 01:07 IST

कोपऱ्या-कोपऱ्यांवर टोळकी : पोलिसांकडून जरब बसविण्याची मागणी

इचलकरंजी : इचलकरंजी शहरात शाळकरी मुली व महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली आहे. शहरातील काही ठरावीक ठिकाणी टोळक्यांनी अड्डे बनविल्याने मुली त्रस्त झाल्या आहेत. पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक व शाळांच्या शिक्षकांकडून होऊ लागली आहे.कोल्हापूर येथील बोंद्रेनगरातील पल्लवी बोडेकर हिने छेडछाडीला कंटाळून केलेली आत्महत्या आणि इचलकरंजीतील पारीक कॉलनीत मुलीच्या दारात टोळक्याने रात्री घातलेला हैदोस या घटनांमुळे मुलींच्या छेडछाडीचा आणि एकतर्फी प्रेमातून सतावण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इचलकरंजीत हायस्कूल व महाविद्यालयांची संख्या लक्षणीय असून, आसपासच्या खेडेगावांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येतात. हायस्कूल किंवा महाविद्यालयांशी काहीही संबंध नसलेली टोळकी परिसरात उभी असतात. शाळा भरण्याच्या वेळी किंवा शाळा सुटण्याच्या वेळी अचूकपणे वेळ पाळणाऱ्या आणि मुलींची छेड काढणाऱ्या या टोळक्यांची दांडगाई वाढली आहे. मुली जवळ येताच चित्रविचित्र आवाज काढणे, चित्रपटांतील प्रसिद्ध गाण्यांवर हावभाव करणे किंवा काही ठरावीक अभिनेत्रींच्या नावाने मोठ्याने हाका मारणे, असे प्रकार केले जात आहेत.अशा प्रकारांबाबत शाळेत शिक्षकांना किंवा नातेवाइकांना सांगितले तर घरातील मंडळी सोडण्यासाठी शाळेपर्यंत येतात. त्यामुळे वादावादीच्या घटना होण्याची भीती असते. तसेच अशा घटनांमुळे कदाचित शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागेल, अशीही भीती वाटत असल्याने मुली नातेवाइकांकडे त्याबाबत कोणतीही वाच्यता करीत नाहीत. त्याचप्रमाणे शाळेमध्ये शिक्षकांनाही सांगितले जात नाही. यातूनच सडकसख्याहरी टोळक्यांची मुजोरी वाढली आहे. इचलकरंजी शहरात अशी नेमकी ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी ते सडकसख्याहरी उभे राहिलेले आढळतात. त्यामध्ये जुने शिवाजीनगर पोलिस ठाणे, झेंडा चौक, नारायण टॉकीज परिसर, शाहू पुतळा ते जुना कोल्हापूर नाका, विक्रमनगरमधील काही भाग, शहापूर आगार परिसर, जय सांगली नाका, आदी ठिकाणांचा समावेश आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला पोलिसांनी संबंधित परिसरांमध्ये गस्त ठेवावी. त्याचबरोबर काही महिला पोलिसांची समावेश असलेली पथके नेमून त्या टोळक्यांवर अचानकपणे वारंवार कारवाई करावी. ज्यामुळे या सडकसख्याहरी टोळक्यांना जरब बसेल, अशी मागणी पालक व शिक्षकांतून होत आहे. (प्रतिनिधी)सडकसख्याहरींना पालकांसमक्ष समज द्यावीटोळक्यांवर कारवाई करताना पकडलेल्या सडकसख्याहरींना पोलिस ठाण्यामध्ये नेऊन तेथे त्यांच्या पालकांना बोलावून पालकांसमक्ष त्यांना समज देण्यात यावी. असा प्रकार कोल्हापूर येथील राजवाडा पोलिसांनी केला होता. त्यामुळे अशा टोळक्यांना आळा बसेल, अशीही चर्चा पालकांमध्ये आहे.