शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शुभेच्छा फलकावरून इचलकरंजीत तणाव

By admin | Updated: June 23, 2015 00:58 IST

दोन्ही गटांकडून घोषणाबाजी : जवाहरनगर परिसरात काही काळ जमावबंदी

इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरातील मराठा चौकात लावलेल्या शुभेच्छा फलकावरून सोमवारी सायंकाळी दोन गटांत पुन्हा वाद उफाळून आला. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी जवाहरनगर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला. रात्री ती शिथिल करण्यात आली. याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्रभर शहरात पोलीस गाड्या गस्त घालत होत्या.जवाहरनगर परिसरातील मराठा चौकालगत प्रार्थनास्थळ आहे. एका समाजाचा पवित्र महिना सुरू झाल्याने काही नागरिकांनी या महिन्याच्या शुभेच्छांचा फलक या चौकात उभारला. गुरुवारी रात्री तो अज्ञातांनी फाडला. यामुळे शुक्रवारी सकाळी एका समाजाच्या नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून बंदोबस्ताची मागणी केली. त्यानुसार बंदोबस्त नेमला होता. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाऱ्यामुळे हा फलक थोडा वाकल्याने पुन्हा गैरसमज निर्माण झाला. त्यातच विनापरवाना हा फलक लावल्याने तो काढून घ्यावा, अशी तक्रार नगरपालिकेकडे आली. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी हा फलक काढण्यासाठी आले. तेथे नागरिक व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्यात परवाना घेऊन फलक लावण्याबाबत चर्चा सुरू झाली. यावेळी परिसरातील दोन्ही समाजाचे तरुण जमले. त्यांनी परस्परविरोधी घोषणाबाजी सुरू केल्याने तणाव वाढला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बाजूंनी चर्चा व वादविवाद होऊन वाद निवळला. शिवसेनेचे मलकारी लवटे यांनी पोलिसांशी बोलणी झाली असून, विनापरवाना फलक लावला जाणार नाही, असे सांगत कार्यकर्त्यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळात नव्याने शुभेच्छा फलक तयार करून पोलीस बंदोबस्तात उभारण्यात आला. त्यानंतर पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली.फलक उभारण्याचे काम पुन्हा सुरू झाल्याचे समजताच गेलेले कार्यकर्ते पुन्हा एकत्र जमू लागले. त्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी ज्यादा कुमक मागवून जमावाला पांगविले. यावेळी १४४ कलम जारी करून जमावबंदी लागू केली. पोलिसांनी स्ट्रायकिंग फोर्ससह मोठा पोलीस बंदोबस्त ठावला आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक महंमद मकानदार, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, शिवाजी कणसे, सतीश पवार, डी. एल. सुरवसे यांच्यासह अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. (वार्ताहर)...तर वाद वाढला नसता !पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही बाजूच्या नागरिकांना समजावून सलोख्याने तोडगा काढला असता, तर वाद एवढा विकोपाला गेला नसता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.एक तासासाठी जमावबंदीदरम्यान, इचलकरंजीत केवळ एक तासासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. आता तेथील परिस्थिती शांत आहे, असे रात्री उशिरा जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी कोल्हापुरात पत्रकारांना सांगितले.