शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत कचराप्रश्नी उद्रेक

By admin | Updated: September 18, 2016 01:11 IST

पाच तास तणाव : मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मृत डुकरे टाकली; आंदोलकांना घेतले ताब्यात; आंदोलक, प्रशासनाचा मोर्चा-प्रतिमोर्चा

इचलकरंजी : तीन ते चार महिन्यांपासून शहरातील कचरा उठाव व स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या नागरिकांचा शनिवारी उद्रेक झाला. नगरसेविका मंगल मुसळे व त्यांचे पती बंडोपंत मुसळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी एका ट्रॉलीतून आणलेली मृत डुकरे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या दालन, टेबल व आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कार्यालयाच्या दारात टाकलीे. आणलेला कचरा पालिकेच्या प्रवेशद्वारात ओतला. या प्रकाराने नगरपालिकेत सर्वत्र दुर्गंधी पसरली.अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे नगरपालिकेत खळबळ माजली. हा प्रकार नगरपालिकेतील सर्व विभागांत समजताच कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन केले. मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून बंडोपंत मुसळे यांच्यासह पंधराजणांना ताब्यात घेतले . तर बंडोपंत मुसळे यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या वादग्रस्त कामाची चौकशी करण्याचा तक्रारी अर्ज दिला. दरम्यान मुसळेंसह आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे समजताच दत्तनगर व गणेशनगर परिसरातील नागरिकांनी नगरसेविका मंगल मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चाच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासन यांचा निषेध नोंदविला. असा हा गोंधळ सुमारे पाच तास सुरू होता.गणेशनगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ते व गटारी यांची साफसफाई झालेली नाही. ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलला नसल्याने त्या-त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून मृत झालेली डुकरे नगरसेविका मंगल मुसळे व त्यांचे पती बंडोपंत यांनी पालिकेला कळवूनसुद्धा ती उचलण्यात आली नव्हती. अशा प्रकारांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मुसळे यांच्यासह पालिकेवर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांनी येताना एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये कचरा व मृत झालेली तीन डुकरे नगरपालिकेत आणली. ट्रॉलीतील कचरा पालिकेच्या प्रवेशद्वारातच टाकला.त्यानंतर एक डुकर आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कार्यालयाच्या दारात टाकले. आणि या आंदोलनकर्त्यांनी राहिलेली दोन डुकरे घेऊन आपला मोर्चा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाकडे वळविला. त्यातील एक डुकर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात टाकले, तर एक डुकर मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले. अचानक घडत असलेला हा प्रकार पाहून मुख्याधिकारी डॉ. रसाळ खुर्चीवरून उठले. आणि त्यांनी मुसळे यांना संबोधत आंदोलनाची पद्धत चुकीचे असल्याचे सुनावले. तेव्हा मुसळे व मुख्याधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी शिवराळ आरोपांचा वापर करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यातच उर्वरित आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार करीत मुख्याधिकाऱ्यांना भंडावून सोडले. परिणामी, दालनातील वातावरण तंग बनले.नगरपालिका कार्यालयात सुटलेली दुर्गंधी आाणि घडलेला प्रकार समजताच पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी एकत्र आले. घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत काम बंद आंदोलन सुरू केले. कामगारांच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह एकत्र येऊन नगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद केले. अशा प्रकारचे आंदोलन, उडालेला गोंधळ हा प्रकार सुमारे दोन तास सुरू होता. प्रवेशद्वारात एकत्र आलेल्या कामगार संघटनांनी झालेल्या प्रकाराचा निषेध करीत पालिका कार्यालय बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला. त्याचप्रमाणे कार्यालयात टाकलेली डुकरे आंदोलनकर्त्यांनीच उचलावीत, अशी भूमिका घेतली. त्यामुळे वातावरणातील तणावात आणखीनच भर पडली. मृत डुकरांमुळे सुटलेल्या दुर्गंधीमुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचारी तोंडाला रुमाल बांधून वावरत होते.दरम्यान, पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह आलेल्या पोलिसांनी मुसळे यांच्यासह अन्य मोर्चेकरी आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपमुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यावर चालत जाऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदविला. त्याठिकाणी असलेल्या पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्याकडे आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान बंडोपंत मुसळे यांच्यासह पंधराजणांना ताब्यात घेतल्याची माहिती समजताच दत्तनगर व गणेशनगर परिसरातील महिला व पुरुष नागरिकांनी नगरसेविका मंगल मुसळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चाच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासन यांचा निषेध नोंदविला. (प्रतिनिधी)समझोत्याचा प्रयत्नहा गोंधळ घडत असतानाच माजी आमदार अशोकराव जांभळे, सागर चाळके, बांधकाम समितीचे सभापती लतीफ गैबान, नगरसेवक भाऊसाहेब आवळे, प्रकाश मोरबाळे, आदींनी पालिका प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी तक्रार देण्याची भूमिका कायम ठेवली.