शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

भाऊ नाही तर मी कशाला जगू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:17 IST

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित्रण व्हिडिओ कॉलद्वारे मित्रांना पाठवून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे आपली जीवनयात्रा संपविली आणि ...

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित्रण व्हिडिओ कॉलद्वारे मित्रांना पाठवून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे आपली जीवनयात्रा संपविली आणि अपघातग्रस्त सूरजचाही मृत्यू झाला. नियतीच्या या धक्क्याने कदम कुटुंबाचे अस्तित्वच संपुष्टात आले. जिवाला चटका लावणाऱ्या लागोपाठ दोन भावांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.चिकोडी तालुक्यातून सात ते आठ वर्षांपूर्वी कदम कुटुंबीय कामासाठी इचलकरंजी परिसरात आले होते. दोन भाऊ, एक बहीण व वडील असा छोटा परिवार. बहिणीचे नांदणी येथील श्रवण जोगदंडे यांच्याशी विवाह झाला होता. दरम्यानच्या काळात कदम यांच्या वडिलांचे छत्र हरपल्याने ते पोरके झाले होते.नांदणी येथील त्यांच्या बहिणीचा संसार फुलत असतानाच तिचा दोन वर्षांपूर्वी बाळंतपणातच मृत्यू झाला होता. हा आघातही कदम बंधूंच्यावर होता. थोरला बंधू आकाश कदम हातकणंगले परिसरात काम करीत असल्याने तो खोतवाडी येथे भाड्याने राहत होता, तर सूरज कदम हा नांदणीमध्येच स्वतंत्र राहत होता.सूरज हा जयसिंगपूरला मोटारसायकलीवरून येत असताना दोन दिवसांपूर्वी अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याची अवस्था पाहून तो वाचू शकणार नाही, असा समज मोठा भाऊ आकाशला झाल्याने तो नाराज झाला. वडील गेले, बहीण गेली, भाऊही गेला तर मी राहून काय करू, असे मित्रांना म्हणाला आणि खोतवाडी येथील आपल्या खोलीत गेला. तेथे आकाश गेल्यावर त्याने आत्महत्या करण्यासाठी केलेली तयारी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या मित्रांना दाखविली. मित्रांनी आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्याने तिथे मित्र पोहोचूपर्यंत त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. दुसºया दिवशी अपघातग्रस्त असलेला भाऊ सूरज याचाही मृत्यू झाला. वडिलांचे निधन, बहिणीचा मृत्यू व दोन भावांचाही झालेला घात यामुळे कदम कुटुंबच संपून गेले.