शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भाऊ नाही तर मी कशाला जगू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:17 IST

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित्रण व्हिडिओ कॉलद्वारे मित्रांना पाठवून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे आपली जीवनयात्रा संपविली आणि ...

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित्रण व्हिडिओ कॉलद्वारे मित्रांना पाठवून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे आपली जीवनयात्रा संपविली आणि अपघातग्रस्त सूरजचाही मृत्यू झाला. नियतीच्या या धक्क्याने कदम कुटुंबाचे अस्तित्वच संपुष्टात आले. जिवाला चटका लावणाऱ्या लागोपाठ दोन भावांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.चिकोडी तालुक्यातून सात ते आठ वर्षांपूर्वी कदम कुटुंबीय कामासाठी इचलकरंजी परिसरात आले होते. दोन भाऊ, एक बहीण व वडील असा छोटा परिवार. बहिणीचे नांदणी येथील श्रवण जोगदंडे यांच्याशी विवाह झाला होता. दरम्यानच्या काळात कदम यांच्या वडिलांचे छत्र हरपल्याने ते पोरके झाले होते.नांदणी येथील त्यांच्या बहिणीचा संसार फुलत असतानाच तिचा दोन वर्षांपूर्वी बाळंतपणातच मृत्यू झाला होता. हा आघातही कदम बंधूंच्यावर होता. थोरला बंधू आकाश कदम हातकणंगले परिसरात काम करीत असल्याने तो खोतवाडी येथे भाड्याने राहत होता, तर सूरज कदम हा नांदणीमध्येच स्वतंत्र राहत होता.सूरज हा जयसिंगपूरला मोटारसायकलीवरून येत असताना दोन दिवसांपूर्वी अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याची अवस्था पाहून तो वाचू शकणार नाही, असा समज मोठा भाऊ आकाशला झाल्याने तो नाराज झाला. वडील गेले, बहीण गेली, भाऊही गेला तर मी राहून काय करू, असे मित्रांना म्हणाला आणि खोतवाडी येथील आपल्या खोलीत गेला. तेथे आकाश गेल्यावर त्याने आत्महत्या करण्यासाठी केलेली तयारी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या मित्रांना दाखविली. मित्रांनी आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्याने तिथे मित्र पोहोचूपर्यंत त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. दुसºया दिवशी अपघातग्रस्त असलेला भाऊ सूरज याचाही मृत्यू झाला. वडिलांचे निधन, बहिणीचा मृत्यू व दोन भावांचाही झालेला घात यामुळे कदम कुटुंबच संपून गेले.