शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ नाही तर मी कशाला जगू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:17 IST

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित्रण व्हिडिओ कॉलद्वारे मित्रांना पाठवून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे आपली जीवनयात्रा संपविली आणि ...

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित्रण व्हिडिओ कॉलद्वारे मित्रांना पाठवून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे आपली जीवनयात्रा संपविली आणि अपघातग्रस्त सूरजचाही मृत्यू झाला. नियतीच्या या धक्क्याने कदम कुटुंबाचे अस्तित्वच संपुष्टात आले. जिवाला चटका लावणाऱ्या लागोपाठ दोन भावांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.चिकोडी तालुक्यातून सात ते आठ वर्षांपूर्वी कदम कुटुंबीय कामासाठी इचलकरंजी परिसरात आले होते. दोन भाऊ, एक बहीण व वडील असा छोटा परिवार. बहिणीचे नांदणी येथील श्रवण जोगदंडे यांच्याशी विवाह झाला होता. दरम्यानच्या काळात कदम यांच्या वडिलांचे छत्र हरपल्याने ते पोरके झाले होते.नांदणी येथील त्यांच्या बहिणीचा संसार फुलत असतानाच तिचा दोन वर्षांपूर्वी बाळंतपणातच मृत्यू झाला होता. हा आघातही कदम बंधूंच्यावर होता. थोरला बंधू आकाश कदम हातकणंगले परिसरात काम करीत असल्याने तो खोतवाडी येथे भाड्याने राहत होता, तर सूरज कदम हा नांदणीमध्येच स्वतंत्र राहत होता.सूरज हा जयसिंगपूरला मोटारसायकलीवरून येत असताना दोन दिवसांपूर्वी अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याची अवस्था पाहून तो वाचू शकणार नाही, असा समज मोठा भाऊ आकाशला झाल्याने तो नाराज झाला. वडील गेले, बहीण गेली, भाऊही गेला तर मी राहून काय करू, असे मित्रांना म्हणाला आणि खोतवाडी येथील आपल्या खोलीत गेला. तेथे आकाश गेल्यावर त्याने आत्महत्या करण्यासाठी केलेली तयारी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या मित्रांना दाखविली. मित्रांनी आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्याने तिथे मित्र पोहोचूपर्यंत त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. दुसºया दिवशी अपघातग्रस्त असलेला भाऊ सूरज याचाही मृत्यू झाला. वडिलांचे निधन, बहिणीचा मृत्यू व दोन भावांचाही झालेला घात यामुळे कदम कुटुंबच संपून गेले.