शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कोल्हापूरच्या प्रश्नांचा केंद्राकडे पाठपुरावा करू

By admin | Updated: June 5, 2016 01:05 IST

रामविलास पासवान यांची ग्वाही : सरकारचे काम तळागाळापर्यंत पोहोचवा; भाजप-लोकजनशक्ती पक्षाचा मेळावा

कोल्हापूर : केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्य लोकांसाठी विविध योजना राबवून खऱ्या अर्थाने विकासाला चालना दिली आहे. केंद्र सरकारचे काम समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी केले. कोल्हापूरची विमानसेवा, पासपोर्ट कार्यालय, सर्किट बेंच, आदी प्रश्नांबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. भाजप व लोकजनशक्ती पक्षांच्या कार्यकर्त्यांचा केशवराव भोसले नाट्यगृहात शनिवारी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावावर ज्यांनी ६० वर्षे राज्य केले त्या कॉँग्रेसनेच आंबेडकरांना अपमानित केल्याचा आरोप करत मंत्री पासवान म्हणाले, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे देशभरात पसरलेले वारे कमी होईल, याची भीती होती. पण, आक्रमक कामाने मोदी यांची लोकप्रियता वाढत आहे. पाच दिवसांत पाच देशांचा दौरा करण्याचे काम केवळ नरेंद्र मोदीच करू शकतात. मोदी म्हणजे काम आणि काम म्हणजे मोदी, अशी प्रतिमा जनतेमध्ये झाली आहे. ‘पंतप्रधान सडक योजना’, ‘शेतकरी विमा योजना’ यांसह विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाला आधार दिलाच, त्याचबरोबर ज्या कॉँग्रेसने ६0 वर्षे आंबेडकरांना अपमानित केले, त्या आंबेडकरांना केंद्रातील भाजप सरकारने खऱ्या अर्थाने गौरवित केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार भूपेंद्र यादव, केंद्रीय लघुउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह, महेश जाधव, आमदार अमल महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी बाबा देसाई, संभाजी जाधव, बाबासाहेब भोसले, भगवान काटे, सत्यजित कदम, उत्तम कांबळे, रवी गुरूड, आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.