शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

सदाभाऊंची घराणेशाही मला मान्य नाही : शेट्टी

By admin | Updated: February 14, 2017 00:56 IST

संघटनेने ठरविले तर राज्यमंत्रिपद सोडावे लागेल

कोल्हापूर : गेली पंधरा वर्षे ‘शेतकरी संघटनेचा नेता’ म्हणून दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाहीविरुद्ध आम्ही डंका पेटविला आणि माझाच सहकारी पुन्हा त्याच वाटेने जाणार असेल तर ते माझ्या ‘इथिक्स’मध्ये बसत नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. लातूर येथे ते एका खासगी दूरचित्रवाहिनीशी बोलत होते. त्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हीच भूमिका पुन्हा स्पष्टपणे मांडली.कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हा सांगली जिल्ह्यातील बागणी (ता. वाळवा) जिल्हा परिषद मतदारसंघातून रयत विकास आघाडीतून निवडणुकीस उभा आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता शेट्टी म्हणाले, ‘काँग्रेसवाल्यांच्या घराणेशाहीविरुद्ध मी गेली पंधरा वर्षे डंका पेटवत आहे. आता ही सर्वच पक्षांतील अनेक नेत्यांची पोरंटोरं या निवडणुकीत उभी आहेत. नेत्यांनीच आपल्या पोरांना निवडणुकीत उभे केले तर पक्षासाठी, संघटनेसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, असा माझा सवाल आहे. त्यामुळे सदाभाऊंनी मुलाला निवडणुकीत उभे केले हे मला पटलेले नाही. काही ‘इथिक्स’ पाळून मी राजकारण करतो. त्यामध्ये हे माझ्या मनाला हे पटत नाही. सदाभाऊंनी आपल्या मुलाला उमेदवारी देऊन पक्षात घराणेशाही आणली. सत्तेचा मोह चांगला नाही. तो वेळीच आवरला नाही तर सदाभाऊंचा पाशा पटेल होईल.’खासदार शेट्टी म्हणाले,‘राज्यातील सरकारबद्दल लोकांत अस्वस्थता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सत्तेची समीकरणे बदलतील की काय अशी शक्यता वाटत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे मत प्रदर्शित होईल त्यावर भविष्यातील राजकारणाची दिशा निश्चित करू. आम्ही नेहमीच जनमताचा आदर केला आहे. त्यामुळे निकालाचे चिंतनही आम्ही जरूर करू. राज्यातील लोकशाही आघाडीचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी काही तात्त्विक मतभेद असतानाही त्यावेळी भाजपसोबत गेलो; परंतु हे सरकारच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार नसेल तर त्या अस्वस्थेचीही दखल घ्यावी लागेल. सदाभाऊ हे संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना राज्यमंत्रि-पदाची संधी दिली. त्यामुळे संघटनेने सत्तेबाबत वेगळा निर्णय घेतला तर तो त्यांनाही मान्य करावा लागेल.’