शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

टोलप्रश्न सोडविण्यात मला ‘अत्यानंदच’

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

शरद पवार यांची भूमिका : पण, त्यासाठी आमचे सरकार यायला हवे

कोल्हापूर : बारामतीचा टोल रद्द झाला, कारण त्यांनी संबंधित रस्ते विकास कंपनीला नगरपालिकेच्या मालकीची २० एकर जागा दिली. जे रस्ते नगरपालिका अथवा महापालिकेने स्वत: ठराव करून केले आहेत, त्या रस्त्यांच्या खर्चाचे उत्तरदायित्व त्यांच्यावरच येते. त्यामुळे तसा काय तोडगा कोल्हापूरच्या टोलप्रश्नी काढता येईल का, याचा विचार जरूर करता येईल. या प्रश्नी लक्ष द्यायला मला आनंदच वाटेल. परंतु, त्यासाठी आमचे सरकार येऊन तसा अधिकार मिळाला तर अत्यानंद वाटेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना मांडली.टोलप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसने फारसे लक्ष दिले नाही. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोल पंचगंगा नदीत बुडविण्याची घोषणा केली; परंतु तो रद्द झालेला नाही. याबद्दल लोकांत नाराजी असून, त्यांनी आंदोलन सुरू केले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता पवार म्हणाले, ‘टोलविरोधी कृती समितीचे निवेदन दोनच दिवसांपूर्वी मला फॅक्सवर मिळाले. यापूर्वीही मी कोल्हापुरात बऱ्याचवेळा आलो. परंतु, या प्रश्नासंबंधी कृती समितीच्या प्रतिनिधींनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. त्यावेळी मी केंद्र सरकारच्या सत्तेत होतो, आता कुठेच नाही. तरीही कोणत्याही प्रश्नांची दखल घेण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यानुसार मी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना या टोलप्रश्नी माहिती देण्याची विनंती केली होती. त्यांनी आचारसंहिता संपल्यावरच याबाबत चर्चा करता येईल, असे सांगितल्याने आता काहीच करता येणार नाही. आचारसंहिता संपल्यावर कृती समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून या प्रश्नी तोडगा काढण्यात मलाही आनंदच वाटेल. त्यातही सरकार आमच्या पक्षाचे आल्यास अत्यानंदच वाटेल. एखाद्या प्रश्नाबद्दलचे समज-गैरसमज फार दिवस टिकत नाहीत. ते सोडवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यानुसार मुश्रीफ यांनी काही प्रयत्न केले. या प्रश्नाची सोडवणूक करायची झाल्यास सगळीच जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी भूमिका घेता येणार नाही. ज्यांनी हा टोल बसविला, त्यांना त्याचे उत्तरदायित्व स्वीकारावे लागेल.’ (प्रतिनिधी)टोलप्रश्नी बोलण्याचा पवार यांना अधिकार नाही : मंडलिकबारामती टोल रद्द केला, आता कोल्हापुरात मते मागू नकाकोल्हापूर : बारामती शहरांतर्गत टोलवसुली शरद पवार यांनी तत्काळ बंद केली. मात्र, कोल्हापूरच्या जनतेचा गेली साडेतीन वर्षे टोल विरोधात सुरू असलेला संघर्ष कसा दिसला नाही, असा सवाल माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. महिनाभरापूर्वी मिळालेल्या खात्यातही जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप मंडलिक यांनी पत्रकात केला.कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला फसविण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करू नये. त्यांचा ढोंगीपणा कोल्हापूरकर आता खपवून घेणार नाहीत. राज्यकर्त्यांविरोधात असलेला असंतोष येत्या निवडणुकीत उफाळून येईल. आघाडी सरकारला घरी बसविल्याखेरीज जनता स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही मंडलिक यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)