शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

टोलप्रश्न सोडविण्यात मला ‘अत्यानंदच’

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

शरद पवार यांची भूमिका : पण, त्यासाठी आमचे सरकार यायला हवे

कोल्हापूर : बारामतीचा टोल रद्द झाला, कारण त्यांनी संबंधित रस्ते विकास कंपनीला नगरपालिकेच्या मालकीची २० एकर जागा दिली. जे रस्ते नगरपालिका अथवा महापालिकेने स्वत: ठराव करून केले आहेत, त्या रस्त्यांच्या खर्चाचे उत्तरदायित्व त्यांच्यावरच येते. त्यामुळे तसा काय तोडगा कोल्हापूरच्या टोलप्रश्नी काढता येईल का, याचा विचार जरूर करता येईल. या प्रश्नी लक्ष द्यायला मला आनंदच वाटेल. परंतु, त्यासाठी आमचे सरकार येऊन तसा अधिकार मिळाला तर अत्यानंद वाटेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना मांडली.टोलप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसने फारसे लक्ष दिले नाही. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोल पंचगंगा नदीत बुडविण्याची घोषणा केली; परंतु तो रद्द झालेला नाही. याबद्दल लोकांत नाराजी असून, त्यांनी आंदोलन सुरू केले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता पवार म्हणाले, ‘टोलविरोधी कृती समितीचे निवेदन दोनच दिवसांपूर्वी मला फॅक्सवर मिळाले. यापूर्वीही मी कोल्हापुरात बऱ्याचवेळा आलो. परंतु, या प्रश्नासंबंधी कृती समितीच्या प्रतिनिधींनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. त्यावेळी मी केंद्र सरकारच्या सत्तेत होतो, आता कुठेच नाही. तरीही कोणत्याही प्रश्नांची दखल घेण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यानुसार मी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना या टोलप्रश्नी माहिती देण्याची विनंती केली होती. त्यांनी आचारसंहिता संपल्यावरच याबाबत चर्चा करता येईल, असे सांगितल्याने आता काहीच करता येणार नाही. आचारसंहिता संपल्यावर कृती समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून या प्रश्नी तोडगा काढण्यात मलाही आनंदच वाटेल. त्यातही सरकार आमच्या पक्षाचे आल्यास अत्यानंदच वाटेल. एखाद्या प्रश्नाबद्दलचे समज-गैरसमज फार दिवस टिकत नाहीत. ते सोडवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यानुसार मुश्रीफ यांनी काही प्रयत्न केले. या प्रश्नाची सोडवणूक करायची झाल्यास सगळीच जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी भूमिका घेता येणार नाही. ज्यांनी हा टोल बसविला, त्यांना त्याचे उत्तरदायित्व स्वीकारावे लागेल.’ (प्रतिनिधी)टोलप्रश्नी बोलण्याचा पवार यांना अधिकार नाही : मंडलिकबारामती टोल रद्द केला, आता कोल्हापुरात मते मागू नकाकोल्हापूर : बारामती शहरांतर्गत टोलवसुली शरद पवार यांनी तत्काळ बंद केली. मात्र, कोल्हापूरच्या जनतेचा गेली साडेतीन वर्षे टोल विरोधात सुरू असलेला संघर्ष कसा दिसला नाही, असा सवाल माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. महिनाभरापूर्वी मिळालेल्या खात्यातही जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप मंडलिक यांनी पत्रकात केला.कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला फसविण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करू नये. त्यांचा ढोंगीपणा कोल्हापूरकर आता खपवून घेणार नाहीत. राज्यकर्त्यांविरोधात असलेला असंतोष येत्या निवडणुकीत उफाळून येईल. आघाडी सरकारला घरी बसविल्याखेरीज जनता स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही मंडलिक यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)