शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! ’ राजू शेट्टी यांचे ट्विट : वेगळ्या राजकीय वाटेने जाण्याचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! इसके बाद खेल भी मेरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘हारा नहीं हूँ मैं... बस, खेल समझ रहा था...! इसके बाद खेल भी मेरा होगा और खिलाडी भी मेरा होगा!' असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेले ट्विट चांगलेच चर्चेचे ठरले आहे. भाजपची संगत सोडली. आता महाविकास आघाडीतूनही बाहेर पडून ‘एकला चलो रे’चा मार्ग ते निवडतात की काय, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनता काय कौल देते, ते पाहून पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घेणार असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

भाजपला विरोध म्हणून त्यांनी महाविकास आघाडीशी संगत केली; परंतु त्या सरकारकडूनही लोकांच्या प्रश्र्नांना न्याय देण्याची भूमिका दिसत नसल्याचा अनुभव येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागला. आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेट्टी यांचे राजकारणही सार्वजनिक चारित्र्य जपणारे आहे. त्यामुळे ज्या आघाडीला आपण पाठिंबा दिला, त्यांच्या कृत्यांची घाण आपल्या अंगावर उडू नये, अशाही भावना संघटनेतून व्यक्त होत आहेत.

शेट्टी म्हणाले, लोकसभेमध्ये झालेला पराभव सर्वांनाच धक्कादायक होता. पराभवानंतर राज्यभर फिरून लोकांच्या भावना समजून घेतल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना सामान्यांचे प्रश्न घेऊन लढणारी संघटना आहे. सामान्यांच्या प्रश्नांचे भांडवल करण्यात विरोधी पक्षाला रस आहे. मात्र मूलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी रस नाही. सातबारा कोरा केल्याशिवाय अमक्याची अवलाद नाही, अशा गप्पा ठोकल्या जातात. पेट्रोल, डिझेल, गॅसची महागाई प्रचंड वाढली आहे. याबद्दल महाविकास आघाडीला काही सोयरसुतक नाही. दिल्लीमध्ये शेतकरी कायद्याविरोधात गेल्या चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्याचेही महाविकास आघाडीतील घटक पक्षांना काही देणेघेणे नाही. महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल माफ करण्याचे सूतोवाच केले. मात्र, सध्या वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्याचा फटका दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना बसत आहे. याचे काहीच गांभीर्य महाविकास आघाडी सरकारला नाही.

२२ जवान मारले त्याबद्दल बोला...

राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय धुळवड सुरू आहे. शेतकऱ्यांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न कुठे दिसत नाहीत. भाजपला कंगना राणावत, सुशांत राजपूत, अर्णब गोस्वामी या विषयांत रस आहे. अंबानी यांच्या घरासमोरील जिलेटिन कांड्यांचा स्फोट होणार नाही, हे माहीत असूनही चर्चा सुरू आहे. नक्षलवाद्यांनी २२ जवान मारले त्याबद्दल बोलायला कोणीही तयार नाही, अशी नाराजी शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.