शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सूत्रधार शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:29 IST

कागल : कागल नगरपालिका इमारतीला आग लागण्याची घटना अत्यंत दुर्दैवी होती. कोणाला तरी बदनाम करण्याच्या हेतूने ही आग लावली गेली. ज्याने हे कृत्य केले त्याच्यापर्यंत कागल पोलीस पोहोचले. या आरोपीच्या आणि घटनेच्या मागचा सूत्रधार कोण...? याचा शोध पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील घेत होते. हा तपास अंतिम टप्प्यात आला असतानाच त्यांची ...

ठळक मुद्देआगीच्या दुर्घटनेनंतर कागल नगरपालिका इमारतीच्या पुनर्बांधणीस प्रारंभ

कागल : कागल नगरपालिका इमारतीला आग लागण्याची घटना अत्यंत दुर्दैवी होती. कोणाला तरी बदनाम करण्याच्या हेतूने ही आग लावली गेली. ज्याने हे कृत्य केले त्याच्यापर्यंत कागल पोलीस पोहोचले. या आरोपीच्या आणि घटनेच्या मागचा सूत्रधार कोण...? याचा शोध पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील घेत होते. हा तपास अंतिम टप्प्यात आला असतानाच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. हा प्रकार संशयास्पद आहे. त्यामुळे नगरपालिका इमारतीला आग लावणाऱ्या खºया सूत्रधाराचा शोध लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिला.

आगीच्या घटनेत जळालेल्या कागल नगरपालिका इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रारंभ शुक्रवारी शहरातील सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माणिक माळी होत्या. यावेळी मुख्याधिकारी टीना गवळी, युवराज पाटील, प्रकाश गाडेकर, रमेश तोडकर, प्रवीणसिंह भोसले, चंद्रकांत गवळी, संजय चितारी, नितीन दिंडे, ज्येष्ठ नागरिक व्ही. आर. देशपांडे, पी. बी. घाटगे, प्रभाकर बन्ने, शामराव पाटील, आदी मान्यवर हजर होते.

आपल्या भाषणात आ. मुश्रीफ पुढे म्हणाले की, नगरपालिकेची देखणी इमारत जाळली. तपासी अधिकारी बदलला म्हणून हा तपास थांबणार नाही. आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. पूर्वीच्यापेक्षाही देखणी इमारत उभी करू. नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व रस्ते डांबरीकरण केले आहेत. शहरात रमाई आवास योजनेतून २५४ लोकांना प्रत्येकी अडीच लाख रुपये मंजूर झाले आहेत. नवीन घरकुलांचे वाटपही लवकरच करणार आहोत. यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले की, नगरपालिका इमारत आगीच्या विषयावर काहींनी गैरसमज पसरविले. गावभर चर्चा झाल्या.

आमदार मुश्रीफ यांनी या घटनेचा तपास लवकर लावावा यासाठी तर प्रयत्न केलेच. पण जळालेली इमारत नव्याने उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी मंजूर करून आणला आहे. स्वागत उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी, तर आभार सौरभ पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सर्व नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.म्हणून पाऊस. ....हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच पाऊस सुरू होता. अशा पावसातच भाषणे झाली. याचा संदर्भ घेत आमदार मुश्रीफ म्हणाले की, नगरपालिका इमारतीला पुन्हा आग लागू नये आणि लागलीच तर ती विझून जाईल हे सांगण्यासाठी पावसानेही हजेरी लावली आहे. विघ्नसंतोषी लोकांना नियतीचा हा संदेश आहे.समरजितसिंह घाटगेंना इशारा अन् विनंती...आमदार मुश्रीफ म्हणाले की, नगरपालिकेने शासनाकडे मागितलेली जागा पुणे ‘म्हाडा’ने घेतली आहे. तेथे घरकुले बांधली जाणार आहेत. पण यासाठी केवळ एकच अर्ज आला आहे. कारण हे घरकुल दहा लाखाला कोण घेणार? आणि आम्ही कागलच्या बाहेरील कोणाला येथे येऊही देणार नाही. माझी समरजित घाटगेंना विनंती आहे की, त्यांनी ही जागा नगरपालिकेकडे सुपूर्द करावी. आम्ही तेथे चार पाच हजार घरे बांधून दाखवितो. तीही अगदी अल्प किमतीत.