शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

हुपरीची सामाजिक बांधीलकी धोक्यात

By admin | Updated: November 24, 2014 23:05 IST

ऊठसूट बंद : मूठभर हुल्लडबाज तरुण

तानाजी घोरपडे - हुपरी --सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणिवा तसेच हुपरी पोलिसांची निष्क्रियता व कर्तव्याचा त्यांना पडलेला विसर यामुळे शहरामध्ये वारंवार बंदच्या घटना हुल्लडबाज तरुणांकडून घडवून आणल्या जात आहेत. परिणामी, शहरातील व्यवसाय बंद राहिल्याने व्यवसाय व एस.टी. बस बंद राहत असल्याने प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार अक्षरश: वैतागून गेला आहे. शहरामध्ये विविध कारणांनी वेळोवेळी पुकारण्यात येणारा बंद कायमस्वरुपी थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व जाणकारांनी एकत्रित येण्याची गरज आहे.देशात कोठेही अप्रिय घटना घडली की त्याची खातरजमा करून न घेता विविध पक्ष, संघटना यांच्याकडून शहरामध्ये निषेधाच्या नावाखाली वेळोवेळी बंद पुकारण्यात येतो. बंद काळात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून सनदशीर मार्गाने आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचे असताना अतिउत्साही हुल्लडबाज तरुणांकडून अश्लील भाषेत लाखोली वाहणे, वाहनधारकांना मानसिक त्रास देणे, एस.टी. बसेसवर दगडफेक करून आर्थिक मालमत्तेचे नुकसान करणे, अशा घटना घडवून आणल्या जातात. यातून वादविवादाचे प्रसंग घडले आहेत. एखाद्या अप्रिय घटनेचा निषेध करण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतानाही शहर बंद ठेवून आपल्या संघटनेची किती दहशत आहे, हे दाखविण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अतिरेक होऊ लागला आहे. या बंदमुळे व्यापारी, नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक यांना कशा प्रकारच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते, याची जाणीव या बंद समर्थकांना नाही, हेच यातून दिसते. शहरात बंद पुकारून आपली ताकद व दहशत किती आहे, याचे मूल्यमापन करण्याची जणू फॅशनच होऊन बसल्याचे चित्र आहे. सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, त्यांच्यातील लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणिवा तसेच हुपरी पोलिसांची त्यांच्या कर्तृत्वाने खालावलेली प्रतिमा, निष्क्रियता, त्यांना पडलेला आपल्या कर्तव्याचा विसर, समाजापेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत, अशी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली चुकीची समजूत, अशा अनेक कारणांमुळे हुल्लडबाजांवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी, ज्येष्ठांची आदरयुक्त भीती, पोलिसांची व कायद्याचा वचक त्यांच्यासमोर निष्प्रभ ठरत आहे. शहरामध्ये वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदला पोलीस खाते, सामाजिक व राजकीय चळवळीतील ज्येष्ठ व जाणकारांनी अतिशय कडक व शिस्तप्रिय अशी भूमिका घेऊन रौप्यनगरीची परंपरा जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा, शहरातील सामाजिक, व्यावसायिक, संस्कृती लोप पावून सामाजिक जाणिवा नसलेले एक रुक्ष शहर, अशी प्रतिमा या रौप्यनगरीची झाल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळाल्याशिवाय राहणार नाही.पोलीस उपअधीक्षक चैतन्या एस. यांच्याशी संपर्क साधून याप्रश्नी पोलीस प्रशासनाकडून काही ठोस उपाययोजना केली जाणार आहे काय ? यासाठी प्रयत्न केले असता ते आता दौऱ्यासाठी गेल्याचे त्यांच्या पी.ए.नी सांगितले. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.