शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीची सामाजिक बांधीलकी धोक्यात

By admin | Updated: November 24, 2014 23:05 IST

ऊठसूट बंद : मूठभर हुल्लडबाज तरुण

तानाजी घोरपडे - हुपरी --सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणिवा तसेच हुपरी पोलिसांची निष्क्रियता व कर्तव्याचा त्यांना पडलेला विसर यामुळे शहरामध्ये वारंवार बंदच्या घटना हुल्लडबाज तरुणांकडून घडवून आणल्या जात आहेत. परिणामी, शहरातील व्यवसाय बंद राहिल्याने व्यवसाय व एस.टी. बस बंद राहत असल्याने प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार अक्षरश: वैतागून गेला आहे. शहरामध्ये विविध कारणांनी वेळोवेळी पुकारण्यात येणारा बंद कायमस्वरुपी थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस खाते, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व जाणकारांनी एकत्रित येण्याची गरज आहे.देशात कोठेही अप्रिय घटना घडली की त्याची खातरजमा करून न घेता विविध पक्ष, संघटना यांच्याकडून शहरामध्ये निषेधाच्या नावाखाली वेळोवेळी बंद पुकारण्यात येतो. बंद काळात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून सनदशीर मार्गाने आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचे असताना अतिउत्साही हुल्लडबाज तरुणांकडून अश्लील भाषेत लाखोली वाहणे, वाहनधारकांना मानसिक त्रास देणे, एस.टी. बसेसवर दगडफेक करून आर्थिक मालमत्तेचे नुकसान करणे, अशा घटना घडवून आणल्या जातात. यातून वादविवादाचे प्रसंग घडले आहेत. एखाद्या अप्रिय घटनेचा निषेध करण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतानाही शहर बंद ठेवून आपल्या संघटनेची किती दहशत आहे, हे दाखविण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अतिरेक होऊ लागला आहे. या बंदमुळे व्यापारी, नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक यांना कशा प्रकारच्या मानसिक, शारीरिक व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते, याची जाणीव या बंद समर्थकांना नाही, हेच यातून दिसते. शहरात बंद पुकारून आपली ताकद व दहशत किती आहे, याचे मूल्यमापन करण्याची जणू फॅशनच होऊन बसल्याचे चित्र आहे. सामाजिक व राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी विसरलेले सामाजिक बांधीलकीचे भान, त्यांच्यातील लोप पावत चाललेल्या सामाजिक जाणिवा तसेच हुपरी पोलिसांची त्यांच्या कर्तृत्वाने खालावलेली प्रतिमा, निष्क्रियता, त्यांना पडलेला आपल्या कर्तव्याचा विसर, समाजापेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत, अशी त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली चुकीची समजूत, अशा अनेक कारणांमुळे हुल्लडबाजांवर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी, ज्येष्ठांची आदरयुक्त भीती, पोलिसांची व कायद्याचा वचक त्यांच्यासमोर निष्प्रभ ठरत आहे. शहरामध्ये वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदला पोलीस खाते, सामाजिक व राजकीय चळवळीतील ज्येष्ठ व जाणकारांनी अतिशय कडक व शिस्तप्रिय अशी भूमिका घेऊन रौप्यनगरीची परंपरा जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा, शहरातील सामाजिक, व्यावसायिक, संस्कृती लोप पावून सामाजिक जाणिवा नसलेले एक रुक्ष शहर, अशी प्रतिमा या रौप्यनगरीची झाल्याचे चित्र आपल्याला पहावयास मिळाल्याशिवाय राहणार नाही.पोलीस उपअधीक्षक चैतन्या एस. यांच्याशी संपर्क साधून याप्रश्नी पोलीस प्रशासनाकडून काही ठोस उपाययोजना केली जाणार आहे काय ? यासाठी प्रयत्न केले असता ते आता दौऱ्यासाठी गेल्याचे त्यांच्या पी.ए.नी सांगितले. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.