शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

हुपरीचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 00:46 IST

महावितरणने वीजपुरवठा तोडला : चार लाख बावीस हजार रूपयांचे वीज बिल थकीत

हुपरी : हुपरी नळपाणी पुरवठा योजनेकडील चार लाख बावीस हजार रुपये थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने योजनेचा वीजपुरवठा तोडल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने एक महिन्याच्या कालावधीत तीनवेळा योजनेचा वीजपुरवठा तोडल्यामुळे रौप्यनगरीची वरचेवर नाचक्की होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अशा प्रकारच्या बेफिकीर व गलथान कारभाराचा त्रास मात्र सर्वसामान्य शहरवासीयांना भोगावा लागत आहे. याचे ग्रामपंचायत प्रशासनास कसलेही सोयरसुतक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.दरम्यान, सव्वा चार लाख रुपये थकीत वीजबिलाच्या रकमेपैकी ग्रामपंचायत प्रशासनाने दोन लाख रुपये रक्कम जमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम भरून घेण्यास स्पष्टपणे नकार दिल्याच समजते. परिणामी वीज बिल भरण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी यावे लागले.हुपरी शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणारी योजना दूधगंगा नदीवरून कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेचे महिन्याला सरासरी दोन लाख रुपयांचे बिल येत असते. वार्षिक सुमारे तीन कोटींचा महसूल शहरातून गोळा करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व श्रीमंत ग्रामपंचायतीला ही वीज बिलाची रक्कम वेळेत भरणे अशक्य झाले आहे. वीज बिलाची रक्कम वेळेत भरली जात नसल्याने योजनेचा वीजपुरवठा अनेकवेळा तोडला जातो. अशा प्रकारची नामुष्की रौप्यनगरीवर वारंवार येते. याच कारणातून वर्षातून अनेकवेळा शहराचा पाणीपुरवठा बंद पडतो. याप्रश्नी शहरवासीयांतून उठाव होऊ लागताच कशी तरी तरतूद करून वीज बिलाची रक्कम भरून पूर्ववत वीजपुरवठा जोडून पाणीपुरवठा सुरू केला जातो. अशी घटना नेहमीच पहावयास मिळते. मात्र, अशी घटना पुन्हा घडू नये याबाबतची खबरदारी कुणाकडूनही घेतली जात नाही. ये रे माझ्या मागल्या.. अशी वस्तुस्थिती पुन्हा पहावयास मिळाल्याशिवाय राहत नाही. शहरामध्ये सर्वच पक्षांचे मोठमोठे पदाधिकारी वास्तव्यास आहेत. मात्र, यापैकी एकही पदाधिकारी किंवा राजकीय पक्ष शहरवासीयांना पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचे साधे सौजन्य दाखवत नाही. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास केवळ आम्हीच करीत आहोत, असा टेंभा मिरविणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर कुणाचाही वचक राहिलेला नाही असे चित्र नेहमीच अनुभवण्यास व पहावयास मिळत असते.‘यापुढे पाणीपुरवठा खंडित होणार नाही’सरपंच दीपाली शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, थकबाकी भरण्यासाठी रकमेची तजवीज केली आहे. ही रक्कम महावितरणमध्ये भरून पूर्ववत वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे प्रकार वारंवार घडून पाणीपुरवठा खंडित होऊ नये याची खबरदारी प्रशासन यापुढे घेत आहे.