शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 00:46 IST

महावितरणने वीजपुरवठा तोडला : चार लाख बावीस हजार रूपयांचे वीज बिल थकीत

हुपरी : हुपरी नळपाणी पुरवठा योजनेकडील चार लाख बावीस हजार रुपये थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने योजनेचा वीजपुरवठा तोडल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने एक महिन्याच्या कालावधीत तीनवेळा योजनेचा वीजपुरवठा तोडल्यामुळे रौप्यनगरीची वरचेवर नाचक्की होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अशा प्रकारच्या बेफिकीर व गलथान कारभाराचा त्रास मात्र सर्वसामान्य शहरवासीयांना भोगावा लागत आहे. याचे ग्रामपंचायत प्रशासनास कसलेही सोयरसुतक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.दरम्यान, सव्वा चार लाख रुपये थकीत वीजबिलाच्या रकमेपैकी ग्रामपंचायत प्रशासनाने दोन लाख रुपये रक्कम जमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम भरून घेण्यास स्पष्टपणे नकार दिल्याच समजते. परिणामी वीज बिल भरण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी यावे लागले.हुपरी शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणारी योजना दूधगंगा नदीवरून कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेचे महिन्याला सरासरी दोन लाख रुपयांचे बिल येत असते. वार्षिक सुमारे तीन कोटींचा महसूल शहरातून गोळा करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व श्रीमंत ग्रामपंचायतीला ही वीज बिलाची रक्कम वेळेत भरणे अशक्य झाले आहे. वीज बिलाची रक्कम वेळेत भरली जात नसल्याने योजनेचा वीजपुरवठा अनेकवेळा तोडला जातो. अशा प्रकारची नामुष्की रौप्यनगरीवर वारंवार येते. याच कारणातून वर्षातून अनेकवेळा शहराचा पाणीपुरवठा बंद पडतो. याप्रश्नी शहरवासीयांतून उठाव होऊ लागताच कशी तरी तरतूद करून वीज बिलाची रक्कम भरून पूर्ववत वीजपुरवठा जोडून पाणीपुरवठा सुरू केला जातो. अशी घटना नेहमीच पहावयास मिळते. मात्र, अशी घटना पुन्हा घडू नये याबाबतची खबरदारी कुणाकडूनही घेतली जात नाही. ये रे माझ्या मागल्या.. अशी वस्तुस्थिती पुन्हा पहावयास मिळाल्याशिवाय राहत नाही. शहरामध्ये सर्वच पक्षांचे मोठमोठे पदाधिकारी वास्तव्यास आहेत. मात्र, यापैकी एकही पदाधिकारी किंवा राजकीय पक्ष शहरवासीयांना पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचे साधे सौजन्य दाखवत नाही. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास केवळ आम्हीच करीत आहोत, असा टेंभा मिरविणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर कुणाचाही वचक राहिलेला नाही असे चित्र नेहमीच अनुभवण्यास व पहावयास मिळत असते.‘यापुढे पाणीपुरवठा खंडित होणार नाही’सरपंच दीपाली शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, थकबाकी भरण्यासाठी रकमेची तजवीज केली आहे. ही रक्कम महावितरणमध्ये भरून पूर्ववत वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे प्रकार वारंवार घडून पाणीपुरवठा खंडित होऊ नये याची खबरदारी प्रशासन यापुढे घेत आहे.