शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी नगरपालिकेचा प्रस्ताव रखडला

By admin | Updated: June 5, 2015 00:20 IST

समिती संघर्षाच्या तयारीत : दुसऱ्यांदा पाठविला प्रस्ताव; परिसराचा विकास खुंटण्याची शक्यता

तानाजी घोरपडे -हुपरी -राज्य शासनाचा लालफितीतील नियोजनशून्य भोंगळ कारभार, लोकप्रतिनिधींची उदासीनता व अक्षम्य दुर्लक्ष यामुळे रौप्यनगरी हुपरी ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्याची गेल्या ३५ वर्षांपासूनची मागणी अद्यापही शासनदरबारी धूळ खात पडली आहे. नागरिकांना अनेक प्रकारच्या नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, या निमशहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शासन या ठिकाणी नगरपालिकेची कधी स्थापना करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, रौप्यनगरीवासीयांचे नगरपालिकेबाबतचे असणारे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आता ‘नगरपालिका कृती समिती’च्या माध्यमातून शासनाशी न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरील लढाई लढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नगरपालिकेबाबतच्या रौप्यनगरीवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. रौप्यनगरी अशी संपूर्ण देशात ख्याती असणाऱ्या व जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या हुपरीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यापुढेही दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. चांदी व्यवसायाबरोबरच शहरालगत असणाऱ्या जवाहर साखर कारखाना, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, अनेक सूतगिरण्या आदी लहान-मोठ्या उद्योग उभारणीमुळे सध्या लोकसंख्या ५५ हजारांपेक्षा जास्त झाल्याचे वास्तव आहे. या ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या ग्रामपंचायतीस इतक्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या लोकसंख्येस सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे अशक्य झाले आहे. जिल्हा परिषद व आमदार विकास निधीतूनच आवश्यक रस्ते व गटर्स बांधण्यात येत आहेत. या विकासकामांचा दर्जाही कोण तपासत नसल्याने एक वर्षातच रस्ते उखडले जात आहेत. गटर्स ढासळत आहेत. परिणामी शहवासीयांनी नागरी समस्यांची ओरड कायमचीच बनून गेली आहे. या ठिकाणी जर नगरपालिका अस्तित्वात आली तर शासनाच्या कास्टर योजना, नगरोत्थान योजना, मागासवर्गीय कल्याण योजना आदींसाठी राज्य व केंद्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होऊ शकतो. यातून शहरामध्ये अनेक प्रकारचे नागरी विकासकामे उभारून शहराचा सर्वांगीण विकास घडू शकतो. मात्र, शासनाचा लालफितीचा नियोजनशून्य भोंगळ कारभार व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे रौप्यनगरीवासीयांची नगरपालिकेची मागणी मृगजळच ठरत आहे. हुपरी नगरपालिकेच्या मंजुरीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने ३१ आॅक्टोबर २0१४ मध्ये हुपरी पालिका स्थापन करण्याचा आदेश राज्य शासनाला दिला होता. मात्र, शासनाने त्याची पूर्तता केली नाही. म्हणून न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा दाखल केला. मात्र, शासनाने माफीनामा देऊन वेळ मारुन नेली. यात पालिकेची स्थापना रखडली. म्हणून आता तिसऱ्यांदा याचिका दाखल केली आहे. १0 जूनला त्याची सुनावणी आहे. - अशोक खाडे, प्रमुख, नगरपालिका कृती समितीहुपरी पालिका स्थापन करण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधी वेळकाढूपणा करत आहेत. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हुपरी पालिका होणे गरजेचे आहे. पालिकेसाठी नगर विकास मंत्रालयाकडे दुसऱ्यांदा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यासाठी न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढत आहोत. - अहमद नदाफ, निमंत्रक, नगरपालिका कृती समितीग्रा.पं.चा महसूल अपुरा पडतोचांदी व्यवसायाबरोबरच शहरालगत असणाऱ्या जवाहर साखर कारखाना, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, अनेक सूतगिरण्या आदी लहान-मोठ्या उद्योग उभारणीमुळे सध्या लोकसंख्या ५५ हजारांपेक्षा जास्त आहे. ग्रामपंचायतीकडे जमा होणारा सुमारे अडीच कोटी रूपये महसूल हा कर्मचारी पगार व पाणीपुरवठ्याच्या वीजबिलासाठीच खर्च होत असल्याने इतर सुविधांसाठी ग्रामपंचायतीकडे पैसाच शिल्लक राहत नाही.