शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जयसिंगपूरचे ‘आनंदी जीवन’ भागवते अनाथांची भूक

By admin | Updated: May 18, 2016 00:19 IST

संजय भोसले यांचा पुढाकार : सामाजिक संस्थेकडून मोफत अन्नछत्र, गेल्या दीड वर्षापासून उपक्रम

जयसिंगपूर : कोणीही भुकेने उपाशी राहू नये, या हेतूने येथील आनंदी जीवन सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने गोरगरीब, अनाथ, अपंग, मनोरुग्ण, गरजू पेशंट यांच्यासाठी एक मोफत अन्नछत्र सरू केले आहे़ याचा वसा येथील संजय भोसले यांनी घेतला असून हा उपक्रम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे़ त्यामुळे जयसिंगपूर शहरात अशा संस्थांचे कौतुक होत आहे़समाजामध्ये अनेक लोक गरिबीच्या विळख्यात पडले आहेत़ वाढती महागाई ही सर्वसामान्य व निराधार व्यक्तींना घातक बनली आहे़ या अनुषंगाने शहरात रस्त्यावर भीक मागणारे लोक अनेक आहेत़ मात्र, यांना दोनवेळचे जेवण मिळावे या हेतूने आनंदी जीवन सामाजिक बहुद्देशीय सामाजिक संस्था कार्यरत आहेत़ या संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांची परिस्थितीही मध्यमवर्गीय आहे़ त्यांनी गरिबीची जाणीव लक्षात घेऊन गेल्या दीड वर्षापासून मोफत अन्नछत्र सुरू केले आहे़ सांगली-कोल्हापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ हे अन्नछत्र सुरू केले आहे़ या अन्नछत्राचा दिवसभरात अनेक गोरगरीब, भिकारी, निराधार, मनोरुग्ण, अपंग असे लोक याचा लाभ घेत आहेत़ आनंदी जीवन ही संस्था गोरगरिबच्यिंा जीवनाला आनंद देण्याबरोबर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च चालविते, विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देणे, गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणे, निराधार व गरीब लोकांना वैद्यकीय सेवा देणे तसेच भिकारी लहान मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करून त्यांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांना आर्थिक बाजूने साहाय्य करून शिक्षणाची सोय उपलब्ध केली जात आहे़ तसेच अंत्यविधीचे साहित्यही गरीब व्यक्तींना पुरविण्याचे काम या संस्थद्वारे होत आहे़ (प्रतिनिधी)आनंदी जीवन संस्थद्वारे अनाथ व गोरगरीब जनतेला आनंदी बनविण्याचे काम ही संस्था करीत असून, जयसिंगपूर शहरातून अनेकांना आधार देण्याचे काम करीत आहे़ यातून एक सामाजिक उपक्रम करीत असून, दानशूर लोकांनी पुढे येऊन या संस्थेला मदत करण्याची गरज आहे़ यातूनच खरे सूख लागेल़- संजय भोसले, अध्यक्ष, आनंदी जीवन संस्था