शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रेंदाळ-यळगूडची शेकडो कुटुंबे येणार रस्त्यावर

By admin | Updated: October 8, 2015 00:33 IST

दोनशे एकर जागा करणार संपादित : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राची उभारणी; ग्रामस्थांची आज बैठक

हुपरी : रेंदाळ-यळगूड (ता. हातकणंगले) येथे सुमारे दोनशेंहून अधिक एकरांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे परिसरातील सुमारे दोनशेंहून अधिक शेतकरी, धनगर बांधव, दगड खाण व क्रशर व्यवसायिक तसेच परिसरातील शेकडो रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी, या प्रशिक्षण केंद्रामुळे शेकडो कुटुंबाच्या मुळावरच घाला घातला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय राखील पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. त्यासाठी सांगली-कोल्हापूर रोडवरील शिरोळ तालुक्यातील मजले-तमदलगे गावा दरम्यानची सुमारे २४० एकर जमीन संपादित करण्यात आली होती. या केद्रापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असणारा सुमारे शंभर फुटी रस्ता करण्यासाठी स्थानिक गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार होत्या. त्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवून न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेथे प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारची वस्तुस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने आता आपला निर्णय बदलून रेंदाळ-यळगूड गावादरम्यानच्या शासकीय गायरानाकडे आपला मोर्चा वळविला असून, त्यासाठी सुमारे दोनशेंहून अधिक एकर जागा संपादित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या या जागेच्या सभोवती सुमारे दोनशेंहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. चार ते पाच क्रशर चालकांनी लाखो रुपये रक्कम घेऊन ‘प्लॅन्ट’ उभारले आहेत. अनेक वडर बांधव खाण खुदाईद्वारे दगड फोडण्याचा व्यवसाय करून कुटुंबांचा चरितार्थ चालवितात. तसेच परिसरामध्ये शेकडो कुंटुंबे वास्तव्य करून आहेत. या सर्व घटकांच्या कुटुंबांच्या मुळावरच घाला घालणारा प्रकार येथील जमीन संपादित झाल्यास होणार आहे. येथील वस्तुस्थितीचा अभ्यास न करता व या प्रशिक्षण केंद्र उभारणीचा गावाला काहीही फायदा मिळणार नसतानाही केवळ दोन-चारजणांच्या विचार मंथनातून जमीन देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीही अन्यायग्रस्त ग्रामस्थांच्या पाठीमागे उभे राहण्याचे सोडून महसुली अधिकाऱ्यांनाच साथ देत असल्याचे पाहून ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशिक्षण केंद्रासाठी संपादित केली जाणारी जमीन शासकीय गायरान आहे. त्यामुळे प्रशिक्षण केंद्र उभारणीमध्ये बहुतेक काही अडचणी येणार नाहीत. ज्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, त्या विचार विनिमय, चर्चा करून सोडविल्या जातील. या केंद्राच्या उभारणीमुळे गावातील भौतिक सुविधा चांगल्या प्रकारच्या मिळतील. छोटे-मोठे उद्योगधंदे उभारण्यास चालना मिळणार आहे. कोणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. - दीपक शिंदे, तहसीलदार अन्याय होऊ देणार नाही : पाटीलयाबाबात उपसरपंच अभिषेक पाटील म्हणाले, याप्रश्नी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी तहसीलदार दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ८) ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये सर्व बाजूंनी विचार केला जाणार असून, यावेळी उपस्थित होणाऱ्या ग्रामस्थांच्या मागण्या, समस्या, अडचणींवरती उपाय शोधले जाणार आहेत. यावेळी जो काय निर्णय होईल त्यानुसार कार्यवाही होणार आहे. आम्ही मात्र ग्रामस्थांच्या बाजूनेच उभे राहणार असून, कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.