शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

वन्यप्राण्यांकडून शेकडो एकरांतील पिके फस्त

By admin | Updated: October 6, 2015 00:22 IST

प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी : पिकांचे पंचनामे करा; चिमणे-चव्हाणवाडी येथील घटना

रवींद्र येसादे - उत्तूर  जोमकाईदेवी येथील डोंगराच्या पलीकडील बाजूस चिमणे (ता. आजरा) येथील म्हसोबा परिसरात वनगायींचा कळप, गवे, रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांनी शेकडो एकरांतील पिके फस्त झाल्याने चव्हाणवाडी-चिमणे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने वन्यप्राण्यांचा, तर महसूल विभागाने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.अधिक माहिती अशी, म्हसोबा परिसरात चिमणे, चव्हाणवाडी, बेलेवाडी (ता. आजरा) परिसरातील क्षेत्र येते. भात, भुईमूग, नाचणा, जोंधळा, आदी पिके घेतली जात आहेत. जोमकाईदेवीच्या डोंगरात वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. गेली आठ दिवस गवे व वनगायी शेतातील पिके फस्त करीत आहेत. सायंकाळी आठ वाजल्यापासून पहाटेपर्यंत हे प्राणी फिरत असतात.रानडुक्कर व साळिंदर हे प्राणी भुईमुगाचे नुकसान करीत आहेत. काढणी योग्य पिके झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याअगोदरच वन्यप्राणी फडशा पाडत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. भात पिकात तर धुडगूस घातला जात आहे. त्यामुळे हे पीकही शेतकऱ्याला घेता येत नाही.अगोदरच दुष्काळाच्या झळांशी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यातच वन्यप्राण्यांच्या शिरकाव वाढल्याने शेतीतील पीक असून, नसल्यासारखे शेतकऱ्यांना झाले. वर्षभर मशागत करून शेवटी शेतकऱ्याला काहीच मिळाले नाही, अशी दयनीय अवस्था झाली आहे.नुकसानग्रस्त परिसरातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. प्राण्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मानवी वस्तीत या प्राण्यांचा हल्ला होऊ शकतो. रात्रीचे शेतातील जाणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे.नासधूस अधिकवन्यप्राण्यांकडून पिके खाण्यापेक्षा नासधूस मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बांध पाडणे, झाडे पाडणे, आदी प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नुकसान वाढले आहे.मदत नको, बंदोबस्त कराशेतकऱ्यांना जुजबी मदत देण्यापेक्षा वनक्षेत्र मालकी क्षेत्र यामध्ये वनविभागाने मोठी चर मारावी. त्यामुळे वन्यप्राणी मालकी क्षेत्रात येणार नाहीत. तुमची मदत नको, मात्र बंदोबस्त करा, अशी मागणी चिमणे येथील महादेव आजगेकर यांनी केली आहे.