शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

वन्यप्राण्यांकडून शेकडो एकरांतील पिके फस्त

By admin | Updated: October 6, 2015 00:22 IST

प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी : पिकांचे पंचनामे करा; चिमणे-चव्हाणवाडी येथील घटना

रवींद्र येसादे - उत्तूर  जोमकाईदेवी येथील डोंगराच्या पलीकडील बाजूस चिमणे (ता. आजरा) येथील म्हसोबा परिसरात वनगायींचा कळप, गवे, रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांनी शेकडो एकरांतील पिके फस्त झाल्याने चव्हाणवाडी-चिमणे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने वन्यप्राण्यांचा, तर महसूल विभागाने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.अधिक माहिती अशी, म्हसोबा परिसरात चिमणे, चव्हाणवाडी, बेलेवाडी (ता. आजरा) परिसरातील क्षेत्र येते. भात, भुईमूग, नाचणा, जोंधळा, आदी पिके घेतली जात आहेत. जोमकाईदेवीच्या डोंगरात वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. गेली आठ दिवस गवे व वनगायी शेतातील पिके फस्त करीत आहेत. सायंकाळी आठ वाजल्यापासून पहाटेपर्यंत हे प्राणी फिरत असतात.रानडुक्कर व साळिंदर हे प्राणी भुईमुगाचे नुकसान करीत आहेत. काढणी योग्य पिके झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याअगोदरच वन्यप्राणी फडशा पाडत असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. भात पिकात तर धुडगूस घातला जात आहे. त्यामुळे हे पीकही शेतकऱ्याला घेता येत नाही.अगोदरच दुष्काळाच्या झळांशी शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यातच वन्यप्राण्यांच्या शिरकाव वाढल्याने शेतीतील पीक असून, नसल्यासारखे शेतकऱ्यांना झाले. वर्षभर मशागत करून शेवटी शेतकऱ्याला काहीच मिळाले नाही, अशी दयनीय अवस्था झाली आहे.नुकसानग्रस्त परिसरातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. प्राण्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मानवी वस्तीत या प्राण्यांचा हल्ला होऊ शकतो. रात्रीचे शेतातील जाणे शेतकऱ्यांनी बंद केले आहे.नासधूस अधिकवन्यप्राण्यांकडून पिके खाण्यापेक्षा नासधूस मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बांध पाडणे, झाडे पाडणे, आदी प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नुकसान वाढले आहे.मदत नको, बंदोबस्त कराशेतकऱ्यांना जुजबी मदत देण्यापेक्षा वनक्षेत्र मालकी क्षेत्र यामध्ये वनविभागाने मोठी चर मारावी. त्यामुळे वन्यप्राणी मालकी क्षेत्रात येणार नाहीत. तुमची मदत नको, मात्र बंदोबस्त करा, अशी मागणी चिमणे येथील महादेव आजगेकर यांनी केली आहे.