शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

कोल्हापूरच्या माणुसकीमुळे पूर संकटाची तीव्रता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:53 IST

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे शहर आणि जिल्ह्यातील पुराच्या संकटाची तीव्रता कमी झाल्याच्या भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन ...

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे शहर आणि जिल्ह्यातील पुराच्या संकटाची तीव्रता कमी झाल्याच्या भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केल्या. या काळात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेनेही चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले.पूरसंकट संपल्यानंतर सध्या जिल्हाभर स्वच्छता आणि आरोग्यसेवा देण्यावर लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर मित्तल यांची भेट घेतली असता ते बोलत होते. ते म्हणाले, शहरासह जिल्ह्यातील सुमारे पावणेचारशे गावे बाधित झाली. या संकटाच्या काळात सगळ्यांमध्ये शहर आणि जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते यांनी जे काम केले आहे, त्याला तोड नाही; कारण एकीकडे प्रशासनाची यंत्रणा नागरिकांची सुटका करण्याकडे पूर्ण लक्ष देत असताना दुसरीकडे याच संस्था आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या राहण्याची, जेवणाची, नाश्ता, चहाची सर्व सोय केली; म्हणूनच आम्ही ‘रेस्क्यू’वर पूर्ण लक्ष देऊ शकलो.आम्ही सुरुवातीपासूनच महापुराबाबत गावागावांत आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देत होतोच; परंतु कमी कालावधीत पडलेल्या प्रचंड पावसामुळे सगळ्यांचेच अंदाज फोल ठरले. अशातच जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आल्याने तेथील सर्व यंत्रणा जिल्हा परिषदेतून कार्यरत झाली. सुदैवाने आमच्याकडील बहुतांश अधिकारी आणि आवश्यक विभागांचे कर्मचारी रोज कामावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाला आम्ही मोठी मदत करू शकलो. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद एकत्र आल्याने अनेक निर्णय गतीने घेता आले.महापूर ओसरल्यानंतर आता गावोगावी आम्ही स्वच्छतेचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले आहे. साडेचारशेहून अधिक पाणीयोजना सुरू करण्यात आल्या. गावागावांत फॉगिंग सुरू आहे. आणखी आठवडाभर हे काम सातत्याने करावे लागणार आहे. एकीकडे प्रचंड पूर आला असताना दुसरीकडे ग्रामीण भागात ३५ हून अधिक टॅँकर ग्रामस्थांना पाणीपुरवठा करीत होते.जि. प. पदाधिकारी, सदस्यांचे मोठे सहकार्यएकीकडे जि. प. अधिकारी, कर्मचारी कार्यरत असताना दुसरीकडे पदाधिकारी आणि सदस्यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे मित्तल यांनी सांगितले. ज्या ज्या ठिकाणी काही छोट्या-मोठ्या अडचणी आल्या, त्या त्या ठिकाणी आम्ही तेथील पदाधिकारी आणि सदस्यांशी संपर्क साधल्यानंतर त्या अडचणी तातडीने दूर करण्याची भूमिका या सर्वांनी घेतली; त्यामुळे आम्ही प्रभावीपणे काम करू शकलो.