शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोल्हापूरच्या माणुसकीमुळे पूर संकटाची तीव्रता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:53 IST

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे शहर आणि जिल्ह्यातील पुराच्या संकटाची तीव्रता कमी झाल्याच्या भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन ...

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या माणुसकीमुळे शहर आणि जिल्ह्यातील पुराच्या संकटाची तीव्रता कमी झाल्याच्या भावना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी व्यक्त केल्या. या काळात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेनेही चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले.पूरसंकट संपल्यानंतर सध्या जिल्हाभर स्वच्छता आणि आरोग्यसेवा देण्यावर लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर मित्तल यांची भेट घेतली असता ते बोलत होते. ते म्हणाले, शहरासह जिल्ह्यातील सुमारे पावणेचारशे गावे बाधित झाली. या संकटाच्या काळात सगळ्यांमध्ये शहर आणि जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते यांनी जे काम केले आहे, त्याला तोड नाही; कारण एकीकडे प्रशासनाची यंत्रणा नागरिकांची सुटका करण्याकडे पूर्ण लक्ष देत असताना दुसरीकडे याच संस्था आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या राहण्याची, जेवणाची, नाश्ता, चहाची सर्व सोय केली; म्हणूनच आम्ही ‘रेस्क्यू’वर पूर्ण लक्ष देऊ शकलो.आम्ही सुरुवातीपासूनच महापुराबाबत गावागावांत आपत्ती व्यवस्थापनाची माहिती देत होतोच; परंतु कमी कालावधीत पडलेल्या प्रचंड पावसामुळे सगळ्यांचेच अंदाज फोल ठरले. अशातच जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी आल्याने तेथील सर्व यंत्रणा जिल्हा परिषदेतून कार्यरत झाली. सुदैवाने आमच्याकडील बहुतांश अधिकारी आणि आवश्यक विभागांचे कर्मचारी रोज कामावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाला आम्ही मोठी मदत करू शकलो. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद एकत्र आल्याने अनेक निर्णय गतीने घेता आले.महापूर ओसरल्यानंतर आता गावोगावी आम्ही स्वच्छतेचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले आहे. साडेचारशेहून अधिक पाणीयोजना सुरू करण्यात आल्या. गावागावांत फॉगिंग सुरू आहे. आणखी आठवडाभर हे काम सातत्याने करावे लागणार आहे. एकीकडे प्रचंड पूर आला असताना दुसरीकडे ग्रामीण भागात ३५ हून अधिक टॅँकर ग्रामस्थांना पाणीपुरवठा करीत होते.जि. प. पदाधिकारी, सदस्यांचे मोठे सहकार्यएकीकडे जि. प. अधिकारी, कर्मचारी कार्यरत असताना दुसरीकडे पदाधिकारी आणि सदस्यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे मित्तल यांनी सांगितले. ज्या ज्या ठिकाणी काही छोट्या-मोठ्या अडचणी आल्या, त्या त्या ठिकाणी आम्ही तेथील पदाधिकारी आणि सदस्यांशी संपर्क साधल्यानंतर त्या अडचणी तातडीने दूर करण्याची भूमिका या सर्वांनी घेतली; त्यामुळे आम्ही प्रभावीपणे काम करू शकलो.