शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

माणुसकीचा झरा...

By admin | Updated: March 16, 2017 00:21 IST

माणुसकीचा झरा...

आजकाल एक सार्वत्रिक ओरड ऐकायला मिळते ती म्हणजे समाजातील माणुसकी कमी होत आहे. प्रामाणिकपणा कमी झाला आहे. जो तो स्वत:च्या स्वार्थाच्या मागे लागला आहे. हे काहीअंशी खरे असेलही; पण समाजात आजही माणुसकी जिवंत आहे. प्रामाणिकपणाही कायम आहे, हे दाखवून देणारे अनेक प्रसंग पाहायला, ऐकायला, वाचायला मिळत असतात. गेल्या काही दिवसांत या बाबी प्रकर्षाने जाणवून देणाऱ्या दोन घटना घडल्या. कोल्हापूरचा रंगकर्मी सागर चौगुले यांचे पुण्यात ‘अग्निदिव्य’ हे नाटक सादर करीत असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू नाट्य चळवळीलाच हादरा देणारा होता. यापेक्षा मोठा धक्का सागर यांच्या कुटुंबीयांना होता. सागरचा आधार हरपल्याने त्यांच्या कुटुंबीयाचे झालेले नुकसान कशानेही भरून न येणारे आहे. त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. हे लक्षात घेऊन रंगकर्मी आणि मित्रमंडळींनी कोल्हापुरात एक बैठक घेऊन सागर यांच्या कुटुंबाला भरीव निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निधी संकलनही सुरू केले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सागरच्या मुलीच्या नावे पाच लाखांची ठेव ठेवण्याचा व पत्नीला शासकीय नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय स्थानिक आमदारांच्या फाऊंडेशननेही दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. याचबरोबर व्यक्ती, संस्थाही मदतीसाठी पुढे आल्या. ही झाली समाजातील माणुसकीचा झरा दर्शविणारी पहिली घटना.दुसरी घटना आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याबाबतची आहे. सांगली जिल्ह्यातील एका आंतरधर्मीय प्रेमीयुगुलाने वर्षभरापूर्वी घरच्यांचा विरोध डावलून पळून जाऊन लग्न केले. यामुळे घरच्यांचा आधार तुटलेला. पती रंगारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. आपल्या पत्नीला त्याने कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. तिला काविळीचीही लागण झालेली. त्यामुळे तिची प्रकृती नाजूक बनली होती; मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून तिची सुखरूप प्रसूती केली. कावीळही बरी केली. या दाम्पत्याला गोंडस मुलगी झाली. त्याचा आनंद एका बाजूला असतानाच रुग्णालयाचे बिल कसे भागवायचे, याची चिंता त्या पतीला लागली होती. ‘पैशाअभावी डिस्चार्ज थांबला होता’, याबाबतची बातमी ‘लोकमत’ने दिली व पुन्हा एकदा माणुसकीचा झरा पाहायला, अनुभवण्यास मिळाला. आंतरधर्मीय विवाह संस्थेच्या डॉ. मेघा पानसरे, महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर, ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. संबंधित डॉक्टरांची भेट घेऊन बिल देण्याची लेखी हमी दिली. पतीनेही आपल्याजवळचे १५ हजार रुपये दिले. रुग्णालयाने त्या मातेला डिस्चार्ज दिला. खासदार धनंजय महाडिक, मेडिकल असोसिएशन, लिंगायत बिझनेस फोरम, माजी आमदार नानासाहेब माने, मिलिंद धोंड, शाहू साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे. आदींनी या मातेचे बिल भागविण्यासाठी हातभार लावला. केवळ एका बातमीवर माणुसकीच्या झऱ्यातून आर्थिक ओघ आला अन् या दाम्पत्याची रुग्णालयातून सुटका झाली.कोल्हापुरातच नव्हे, तर सगळीकडेच समाजात अनेक संस्था, व्यक्ती असतात की ज्या गोरगरिबांच्या अडीअडचणीला धावून जात असतात. मग ती अडचण कोणतीही असो. फक्त तिची माहिती योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचायला हवी. अलीकडे प्रेमविवाहाचे प्रमाण वाढत आहे. त्यात आंतरजातीय , आंतरधर्मीय विवाहांची संख्याही लक्षणीय असते; मात्र आपला समाज आजही प्रेमविवाह त्यातही आंतरजातीय विवाह स्वीकारायला तयार नसतो. त्यामुळे असे विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आंतरजातीय विवाहांना समाजाची मोठ्या प्रमाणात मान्यता मिळू लागली, तर जातिभेदही संपुष्टात येऊ लागतील. - चंद्रकांत कित्तुरे