शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांसाठीही दिसली माणुसकी ; घरी, गोठ्यात जाऊन केले जाताहेत उपचार, शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:44 IST

कोरोनाच्या धास्तीने सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मानवी जग विस्कळीत झाले आहे. त्याचा काही अंशी फटका पाळीव जनावरांनाही बसत आहे. रस्ते बंद, औषधांची वेळेत उपलब्धता होईल याची खात्री नाही, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास वाहनाची सोयदेखील करता येत नाही, अशी परिस्थिती चोहोबाजूंना आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्येही मुक्या जनावरांवर गोठ्यात जाऊन उपचारडॉक्टरांची सुरक्षा किटचा पुरवठा: जिल्ह्यातील १४०७ जनावरांवर शस्त्रक्रिया

कोल्हापूर : लॉकडाऊन असतानाही मुक्या जनावरांवर न थकता थेट गोठ्यात जाऊन उपचार सुरू करण्याचे दिव्य पशुवैद्यकांकडून पार पाडले जात आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही योग्य ती खबरदारी घेऊन उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या लॉकडाऊनच्या काळात तब्बल ८० हजार पाळीव जनावरांवर यशस्वी उपचार केले आहेत. यात १४०७ लहानमोठ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया आहेत.

कोरोनाच्या धास्तीने सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मानवी जग विस्कळीत झाले आहे. त्याचा काही अंशी फटका पाळीव जनावरांनाही बसत आहे. रस्ते बंद, औषधांची वेळेत उपलब्धता होईल याची खात्री नाही, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास वाहनाची सोयदेखील करता येत नाही, अशी परिस्थिती चोहोबाजूंना आहे. अशा परिस्थितीत मुक्या जनावरांची उपचाराविना तडफड होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग राबत आहे. पशुवैद्यकीय केंद्रावर जनावर आणता येत नसेल तर थेट गोठ्यात जाऊनच उपचार केले जात आहे.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ८० हजार ५०० जनावरांवर यशस्वी उपचार झाले आहेत. यात औषधोपचार झालेले ५२ हजार ७१५, कृत्रिम रेतनाचे ९ हजार १३९, गर्भतपासणी केलेले ११ हजार ३३६, वांझ तपासणी पाच हजार ८८३, शस्त्रक्रिया १४०७ यात मोठ्या ११९, लहान १२८८ अशा पशुधनावर उपचार झाले आहेत.

मुळात जिल्हा परिषदेकडे अपुरी यंत्रणा आहे. केवळ २८ डॉक्टर, ६७ पशुधन पर्यवेक्षक, १६ साहाय्यक पशुविकास अधिकारी यांच्या जिवावर जिल्ह्यातील १८ लाख पशुधनावर ती उपचाराचे काम करीत आहे. एकेका डॉक्टराकडे तीन ते चार गावांची जबाबदारी देऊन त्यांच्याकडून उपचार करवून घेतले जात आहेत.

आता उन्हाळा असल्यामुळे दुभती, पाळीव जनावरे आजारी पडण्याचे प्रमाणही जास्त असते. त्यांच्या आहार आणि विहाराबरोबरच वेळच्या वेळी तपासण्यांकडे काटेकोर लक्ष द्यावे लागते. लॉकडाऊनमुळे यावर मर्यादा आल्या असल्या तरी यातूनही मार्ग काढण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या सरकारी प्रयत्नांना खासगी दूध संघाचेही सहकार्य लाभत असल्याने या सेवा देणे अधिक सुलभ झाले आहे..

रस्ते बंद असतानाही अत्यावश्यक सेवेचे पास देऊन, हॅँडग्लोव्हज, मास्क, सॅनिटायझरसारखे सुरक्षा किट पुरवून पशुधन वाचविण्यासाठी धडपडणाऱ्यांची खबरदारी पशुसंवर्धन विभागाकडून घेतली जात आहे.- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

 

 

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरoperation all outऑपरेशन ऑल आऊट