शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

‘आजरा’साठी नेतेमंडळींच्या अस्तित्वाचा कस लागणार

By admin | Updated: May 5, 2016 00:51 IST

आजरा-श्रृंगारवाडी गट : मातब्बर परस्परविरोधात दंड थोपटणार

ज्योतीप्रसाद सावंत --आजरा  साखर कारखाना निवडणुकीत राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आजरा-श्रृंगारवाडी गटामध्ये उत्पादक गटातून मातब्बर नेतेमंडळी परस्परविरोधात दंड थोपटणार असल्याने प्रमुख नेतेमंडळींच्या राजकीय अस्तित्वाची लढाई याच गटातून होणार आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.मुळातच या गटात आजरा शहराचा समावेश असल्याने आणि सर्वच प्रमुख संस्थांचा कारभार आजऱ्यातून चालत असल्याने या गटामध्ये ज्या नेतेमंडळींना आपले वर्चस्व सिद्ध करता येते, ती मंडळी तालुक्याच्या राजकारणात वर्चस्व निर्माण करू शकतात हे इतिहासाने सिद्ध करून दाखविले आहे.स्व. वसंतराव देसाई शेतकरी विकास आघाडीने या गटातून आघाडीप्रमुख अशोकअण्णा चराटी, माजी साखर कारखाना उपाध्यक्ष दिगंबर देसाई आणि तालुका संघाचे माजी उपाध्यक्ष राजू होलम यांना संधी दिली आहे. विरोधी राष्ट्रवादी व समविचारी आघाडीकडून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, विद्यमान अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा व माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची उमेदवारी निश्चित आहे.या गटातून एकूण २९ उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असले तरी प्रमुख दोन आघाड्यांमधील उमेदवार निश्चित असल्याने उमेदवारीतून नाराज मंडळींच्या भूमिकेवरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. या गटात सर्वांत जास्त मतदान आजरा (१४३५), तर सर्वांत कमी मतदान भावेवाडी (५८) येथे आहे.सर्वच पक्ष व गटा-तटाचे राजकारण या गटामध्ये असल्याने प्रमुख उमेदवारांना मताधिक्याची निश्चित गणिते या गटात मांडता येत नाहीत हे वास्तव आहे. स्व. देसाई आघाडीतून ६५८ मतदार असणाऱ्या वाटंगी गावातून कोणालाही उमेदवारी दिलेली नाही, तर शिरसंगी या ६०८ मतदार असणाऱ्या गावातून राष्ट्रवादीची उमेदवारी अद्याप निश्चित नाही.जयवंतराव, मुकुंदराव, अशोकअण्णा, दिगंबर देसाई, अल्बर्ट डिसोझा व राजू होलम हे सर्वच मातब्बर या गटातून असल्याने अत्यंत चुरशीची लढत या मतदारसंघात होणार हे स्पष्ट आहे.