शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे, तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST

कोल्हापूर : ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीची साधने आहेत, तेथे नेटवर्क उपलब्धतेची अडचण आहे. विशेषत: ती ग्रामीण भागात अधिक ...

कोल्हापूर : ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठीची साधने आहेत, तेथे नेटवर्क उपलब्धतेची अडचण आहे. विशेषत: ती ग्रामीण भागात अधिक जाणवत आहेत. वारंवार नेटवर्क खंडित होण्याने विद्यार्थ्यांचे शिक्षणात एकाग्रता राहत नाही. साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविताच येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे, तरी कसे? असा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसमोर आहे. एकूणच स्थिती पाहता ऑनलाईन शिक्षण निव्वळ औपचारिकता असल्याचे दिसत आहे.

कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडलेली असली, तरी आपल्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, त्याची अभ्यासाची सवय कायम राहावी, यासाठी पालकांनी १० ते १५ हजार रुपये खर्चून मुलांना स्मार्टफोन उपलब्ध करून दिले आहेत. स्मार्टफोन असले, तरी नेटवर्क उपलब्धता आणि ऑनलाईन शिक्षणाचे विद्यार्थ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आकलन होत नसल्याची पालकांची तक्रार आहे. ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती असते, मात्र १५ ते २० मिनिटांनंतर त्यांची एकाग्रता राहत नाही. वर्ग संपेपर्यंत साधारणत: ४५ टक्के विद्यार्थी उपस्थित असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे शिक्षण पोहोचविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून ऑफलाईन स्वरूपात वर्ग भरविण्याचा एकमेव पर्याय आहे. (उत्तरार्ध)

शिक्षक काय म्हणतात?

नेटवर्कबरोबर स्मार्टफोन नसणे, घरी असलेला एकच फोन वेळेत उपलब्ध न होणे, या तांत्रिक अडचणींचा आम्हाला ऑनलाईन शिक्षण देताना सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने शाळांना इंटरनेट सुविधा दिलेली नाही. त्यामुळे बहुतांश शिक्षक हे पदरमोड करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. त्याचा आणि विद्यार्थ्यांच्या अडचणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा.

-संतोष आयरे, राज्य कार्याध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ

स्मार्टफोन, इंटरनेट नसल्याने अनेक मुलांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. त्यात अधिकत्तर ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि मुलींचे प्रमाण आहे. ऑनलाईन पद्धतीने अध्यापन आणि अध्ययन हे समाधानकारक होत नाही. एकूणच पाहता ऑनलाईन पद्धतीमुळे सध्याच्या स्थितीत सार्वजनिक शिक्षण हे निव्वळ औपचारिकता बनले आहे.

-राजेश वरक, विभागीय उपाध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी

चौकट

कोरोना ड्यूटीमुळे नियोजन कोलमडले

गेल्या चार महिन्यांपासून प्राथमिक, माध्यमिक शिक्षक हे कोरोना ड्यूटी करत आहेत. त्यातील काहीजण ही ड्यूटी सांभाळून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झाला नसल्याने त्याची कोरोना ड्यूटी सुरूच आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आणि ब्रीज कोर्सचे नियोजन कोलमडले आहे.