शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

इमारतीचा खर्च चार कोटी कसा?

By admin | Updated: April 30, 2015 00:43 IST

सचिन जाधव, एस. व्ही. पाटील यांची विचारणा : नेपाळ, तिरूपतीला सुकाणू समितीची बडदास्त कशासाठी ?

राजाराम लोंढे- कोल्हापूर -जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची टोलेजंग इमारत बांधल्याचा डांगोरा सत्तारूढ गटाचे नेते पिटत आहेत; पण इमारतीचे बजेट सव्वादोन कोटींवरून चार कोटी कसे झाले, गेले सहा वर्षे सुकाणू समितीची नेपाळ, तिरूपती, गोवा या ठिकाणी बडदास्त का ठेवली, हीच एम. आर. पाटील यांची पारदर्शकता काय? असा सवाल महालक्ष्मी विकास आघाडीचे नेते सचिन जाधव व एस. व्ही. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. सचिन जाधव व पाटील म्हणाले, ज्यांना शिक्षक बॅँकेत नाकारले त्यांनी आपल्या बगलबच्च्यांना पॅनेलमध्ये घुसविण्याचा प्रयत्न केला. सर्वच केडरमध्ये स्वार्थी वृत्तीने अंधारात ठेवून काम केल्याने निवडणूक बिनविरोध झाली नाही; पण त्याचे खापर आमच्यावर फोडण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. एम. आर. पाटील हे सुकाणू समितीच्या हातातील बाहुले आहेत, त्यांनी सहा वर्षांत संचालकांना विचारले नाही; पण सुकाणू समितीला जवळ केले. सुकाणू समितीला गोवा, नेपाळ, तिरूपतीसह चांगल्या हॉटेलमध्ये बडदास्त का राखली, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. कर्मचारी सोसायटीची केलेली प्रगती केवळ आपल्यामुळेच झाल्याचे एम. आर. पाटील सांगत आहेत. आम्ही संचालकांनी त्यांना साथ दिली नसती तर ते शक्य झाले असते काय? आम्ही त्यांना प्रामाणिकपणे साथ दिली; पण त्यांनी संचालकांना बाजूला करून सुकाणू समितीला हाताशी धरून कारभार केला. याला कंटाळून दोन वर्षांपूर्वी ११ संचालकांनी बंड करण्याचा निर्णय घेतला; पण संस्थेच्या हितासाठी असे होऊ दिले नाही. सहा वर्षे संचालकांना अंधारात ठेवून सुकाणू समितीमधील काहींना हाताशी धरून एम. आर. पाटील यांनी अनेक भानगडी केल्या आहेत. त्याचा पाढा सभासदांसमोर वाचला आहे. बिनविरोध करतो म्हणत संघटनांना खेळवीत ठेवण्याचे काम करणाऱ्यांच्या अंगावर खेळी उलटली आहे. संस्था इमारतीचे २.१० कोटींचे अंदाजपत्रक होते. तांत्रिक संवर्गातील अधिकारी असल्याने चेअरमन एम. आर. पाटील यांना इमारतीबाबतचे सर्वाधिकार दिले. त्यांनी इमारतीचा खर्च चार कोटींपर्यंत वाढविला. अंदाजपत्रकीय दरात जास्तीत जास्त ३० टक्के वाढ होऊ शकते. हा खर्च करतानाही संचालक मंडळाला माहिती दिली नाही. एवढा खर्च करून त्याचा सभासदांना फायदा होणार का? त्याचा भार सभासदांवर पडणार आहे. एवढ्या गुंतवणुकीतून उत्पन्न किती मिळणार आहे, याची उत्तरे सत्तारूढ मंडळींना द्यावी लागतील. इमारतीसाठी नवीन विद्युत साहित्य खरेदी करताना संबंधित कंपनीने ४० टक्के डिस्काऊंट दिला; पण बिले नियमित दरानेच दिली. ही डिस्काउंटची रक्कम कुणाच्या खिशात गेली, याचे उत्तर एम. आर. पाटील यांनी द्यावे, असे आवाहन जाधव व पाटील यांनी केले.चेअरमनपदाला विरोध केल्यानंतर एम. आर. पाटील यांनी ए. व्ही. कांबळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाच्याने मुदाळ तिठा शाखेत अफरातफर केल्याने कांबळे अडचणीत आले. म्हणूनच या दोघांनी गळ्यात गळे घातल्याचा आरोप सचिन जाधव यांनी केला.