शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करुळ, भुईबावडा किती सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:16 IST

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची ...

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची अवस्था अतिशय बिकट असून नजीकच्या कालावधीत जर या घाटाकडे प्राधान्याने लक्ष दिले नाही, तर हा घाट अस्तित्वहीन झाल्याशिवाय राहणार नाही.पन्नाशी ओलांडून गेलेल्या या दोन्ही घाटांची निर्मिती त्यावेळचे तत्कालीन आमदार वैभववाडी तालुक्यातील करूळ गावचे कै. ए. पी. सावंत यांच्या प्रयत्नाने सन १९६५ च्या दरम्यान एकाचवेळी गगनबावडा येथून खारेपाटण-राजापूर हा भाग जोडणारा भुईबावडा घाट तर विजयदुर्ग- मालवण-गोवा यांच्याशी संपर्क जोडणारा अशा दोन्ही घाटांची खुदाई सुरू झाली.तीन वर्षांच्या कालावधीनंतर या दोन्ही घाटांतून वाहतूक सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. साधारणता या पन्नास वर्षांच्या कालावधीत पावसाळी मौसम सुरू झाला की थोड्या फार प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार त्यामुळे वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडतच असतात.सन १९९४-९५च्या दरम्यान यापैकी करुळ घाटाने एक भीषण अपघात पाहिला. सेंट्रिंगचे सामान व मजूर घेऊन कुडाळाकडे जाणारा ट्रक घाटाच्या भीषण दरीत कोसळून या अपघातात २४ मजुरांचा अंत झाला व नेहमीप्रमाणेच मोठ्या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने तत्काळ संपूर्ण घाट रूंदीकरण्याचे काम हाती घेतले. त्यामुळेच रुंदीकरण झालेला हा घाट काहीसा सुरक्षित आहे, असे म्हणता येईल.भुईबावडा घाटाच्या तुलनेत काहीसा सुरक्षित असलेल्या या घाटातही संभाव्य धोकादायक ठिकाणेही आहेत. यात एक दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मध्यावर भेगा पडल्या आहेत तर काही ठिकाणी मोठे कडे कोसळण्याची स्थितीही आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोखंडी नेट लावून हे कडे थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या नेटने हे कडे पेलू शकतील का? याचे उत्तर नकारार्थीच असेल.निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या जणू हिरवी शाल लपटलेल्या या घाटात काही प्रमाणात हौशी तरूण पर्यटकांचा वावर होताना दिसत आहे. पर्यटन म्हणजे आजच्या तरुणांच्या समजुतीनुसार दारू पिणे व घाटात कोळणाऱ्या धबधब्याखाली भिजणे यानुसार अनेक तरूण तरुणी घाटात प्रवास करताना दिसतात. दारू पिऊन अर्धवट कपड्याात प्रवाशांना अडविणे. अर्वाच्च भाषा वापरणे यासारखे प्रकार वारंवार घडत असतात. यासाठी किमान रविवार वा सुटीच्या दिवसात तरी पोलिसांनी गस्त घालणे गरजेचे आहे.भुईबावडा घाटाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. खारेपाटण- राजापूर-पाचलला जोडणाºया या मार्गावर तुलनेत कमी वाहतूक असल्याने सा. बां. विभागाकडून दुर्लक्षित असलेल्या या घाटाचे रूंदीकरण प्रामुख्याने होणे आवश्यक आहे. अरूंद असलेल्या या घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचून भेगा पडत आहेत.संपूर्ण घाटात अनेक ठिकाणी या पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडू शकतात. या घाटाच्या दुरुस्तीस प्राधान्य देऊन संपूर्ण घाटाचे रुंदीकरण करावे लागेल तरच यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल. अन्यथा येणाºया पुढच्या पिढीस या ठिकाणी भुईबावडा घाट होता, असे सांगण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.अवजड वाहतुकीवर हवा लगामकरूळ घाटमार्गावरील वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवैध होणाºया वाहतुकीबरोबर अवजड वाहनांची रहदारी यामार्गे वाढली आहे. घाटरस्त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने यामार्गे होणाºया अवजड वाहनांबाबत योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यात पोलिसांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने घाटमार्गाला पर्यटकांनी दिलेली पसंती समाधानकारक असली तरी घाटमार्गावर रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहनांची होणारी वाहतूक तितकीच चिंतेची बाब बनली आहे. लोखंड तसेच इतर अवजड वस्तू भरलेल्या गाड्या या मार्गाने जात आहेत तसेच आकाराने लांब असलेली वाहने घाटमार्गातून जाताना अनेक अडचणी निर्माण होतात. अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचल्यास घाटमार्गच बंद पडण्याची भीती काही जाणकारांमधून व्यक्त होत आहे.