शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

करुळ, भुईबावडा किती सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:16 IST

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची ...

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची अवस्था अतिशय बिकट असून नजीकच्या कालावधीत जर या घाटाकडे प्राधान्याने लक्ष दिले नाही, तर हा घाट अस्तित्वहीन झाल्याशिवाय राहणार नाही.पन्नाशी ओलांडून गेलेल्या या दोन्ही घाटांची निर्मिती त्यावेळचे तत्कालीन आमदार वैभववाडी तालुक्यातील करूळ गावचे कै. ए. पी. सावंत यांच्या प्रयत्नाने सन १९६५ च्या दरम्यान एकाचवेळी गगनबावडा येथून खारेपाटण-राजापूर हा भाग जोडणारा भुईबावडा घाट तर विजयदुर्ग- मालवण-गोवा यांच्याशी संपर्क जोडणारा अशा दोन्ही घाटांची खुदाई सुरू झाली.तीन वर्षांच्या कालावधीनंतर या दोन्ही घाटांतून वाहतूक सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. साधारणता या पन्नास वर्षांच्या कालावधीत पावसाळी मौसम सुरू झाला की थोड्या फार प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार त्यामुळे वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडतच असतात.सन १९९४-९५च्या दरम्यान यापैकी करुळ घाटाने एक भीषण अपघात पाहिला. सेंट्रिंगचे सामान व मजूर घेऊन कुडाळाकडे जाणारा ट्रक घाटाच्या भीषण दरीत कोसळून या अपघातात २४ मजुरांचा अंत झाला व नेहमीप्रमाणेच मोठ्या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने तत्काळ संपूर्ण घाट रूंदीकरण्याचे काम हाती घेतले. त्यामुळेच रुंदीकरण झालेला हा घाट काहीसा सुरक्षित आहे, असे म्हणता येईल.भुईबावडा घाटाच्या तुलनेत काहीसा सुरक्षित असलेल्या या घाटातही संभाव्य धोकादायक ठिकाणेही आहेत. यात एक दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मध्यावर भेगा पडल्या आहेत तर काही ठिकाणी मोठे कडे कोसळण्याची स्थितीही आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोखंडी नेट लावून हे कडे थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या नेटने हे कडे पेलू शकतील का? याचे उत्तर नकारार्थीच असेल.निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या जणू हिरवी शाल लपटलेल्या या घाटात काही प्रमाणात हौशी तरूण पर्यटकांचा वावर होताना दिसत आहे. पर्यटन म्हणजे आजच्या तरुणांच्या समजुतीनुसार दारू पिणे व घाटात कोळणाऱ्या धबधब्याखाली भिजणे यानुसार अनेक तरूण तरुणी घाटात प्रवास करताना दिसतात. दारू पिऊन अर्धवट कपड्याात प्रवाशांना अडविणे. अर्वाच्च भाषा वापरणे यासारखे प्रकार वारंवार घडत असतात. यासाठी किमान रविवार वा सुटीच्या दिवसात तरी पोलिसांनी गस्त घालणे गरजेचे आहे.भुईबावडा घाटाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. खारेपाटण- राजापूर-पाचलला जोडणाºया या मार्गावर तुलनेत कमी वाहतूक असल्याने सा. बां. विभागाकडून दुर्लक्षित असलेल्या या घाटाचे रूंदीकरण प्रामुख्याने होणे आवश्यक आहे. अरूंद असलेल्या या घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचून भेगा पडत आहेत.संपूर्ण घाटात अनेक ठिकाणी या पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडू शकतात. या घाटाच्या दुरुस्तीस प्राधान्य देऊन संपूर्ण घाटाचे रुंदीकरण करावे लागेल तरच यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल. अन्यथा येणाºया पुढच्या पिढीस या ठिकाणी भुईबावडा घाट होता, असे सांगण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.अवजड वाहतुकीवर हवा लगामकरूळ घाटमार्गावरील वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवैध होणाºया वाहतुकीबरोबर अवजड वाहनांची रहदारी यामार्गे वाढली आहे. घाटरस्त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने यामार्गे होणाºया अवजड वाहनांबाबत योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यात पोलिसांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने घाटमार्गाला पर्यटकांनी दिलेली पसंती समाधानकारक असली तरी घाटमार्गावर रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहनांची होणारी वाहतूक तितकीच चिंतेची बाब बनली आहे. लोखंड तसेच इतर अवजड वस्तू भरलेल्या गाड्या या मार्गाने जात आहेत तसेच आकाराने लांब असलेली वाहने घाटमार्गातून जाताना अनेक अडचणी निर्माण होतात. अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचल्यास घाटमार्गच बंद पडण्याची भीती काही जाणकारांमधून व्यक्त होत आहे.