शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

करुळ, भुईबावडा किती सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:16 IST

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची ...

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची अवस्था अतिशय बिकट असून नजीकच्या कालावधीत जर या घाटाकडे प्राधान्याने लक्ष दिले नाही, तर हा घाट अस्तित्वहीन झाल्याशिवाय राहणार नाही.पन्नाशी ओलांडून गेलेल्या या दोन्ही घाटांची निर्मिती त्यावेळचे तत्कालीन आमदार वैभववाडी तालुक्यातील करूळ गावचे कै. ए. पी. सावंत यांच्या प्रयत्नाने सन १९६५ च्या दरम्यान एकाचवेळी गगनबावडा येथून खारेपाटण-राजापूर हा भाग जोडणारा भुईबावडा घाट तर विजयदुर्ग- मालवण-गोवा यांच्याशी संपर्क जोडणारा अशा दोन्ही घाटांची खुदाई सुरू झाली.तीन वर्षांच्या कालावधीनंतर या दोन्ही घाटांतून वाहतूक सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. साधारणता या पन्नास वर्षांच्या कालावधीत पावसाळी मौसम सुरू झाला की थोड्या फार प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार त्यामुळे वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडतच असतात.सन १९९४-९५च्या दरम्यान यापैकी करुळ घाटाने एक भीषण अपघात पाहिला. सेंट्रिंगचे सामान व मजूर घेऊन कुडाळाकडे जाणारा ट्रक घाटाच्या भीषण दरीत कोसळून या अपघातात २४ मजुरांचा अंत झाला व नेहमीप्रमाणेच मोठ्या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने तत्काळ संपूर्ण घाट रूंदीकरण्याचे काम हाती घेतले. त्यामुळेच रुंदीकरण झालेला हा घाट काहीसा सुरक्षित आहे, असे म्हणता येईल.भुईबावडा घाटाच्या तुलनेत काहीसा सुरक्षित असलेल्या या घाटातही संभाव्य धोकादायक ठिकाणेही आहेत. यात एक दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मध्यावर भेगा पडल्या आहेत तर काही ठिकाणी मोठे कडे कोसळण्याची स्थितीही आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोखंडी नेट लावून हे कडे थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या नेटने हे कडे पेलू शकतील का? याचे उत्तर नकारार्थीच असेल.निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या जणू हिरवी शाल लपटलेल्या या घाटात काही प्रमाणात हौशी तरूण पर्यटकांचा वावर होताना दिसत आहे. पर्यटन म्हणजे आजच्या तरुणांच्या समजुतीनुसार दारू पिणे व घाटात कोळणाऱ्या धबधब्याखाली भिजणे यानुसार अनेक तरूण तरुणी घाटात प्रवास करताना दिसतात. दारू पिऊन अर्धवट कपड्याात प्रवाशांना अडविणे. अर्वाच्च भाषा वापरणे यासारखे प्रकार वारंवार घडत असतात. यासाठी किमान रविवार वा सुटीच्या दिवसात तरी पोलिसांनी गस्त घालणे गरजेचे आहे.भुईबावडा घाटाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. खारेपाटण- राजापूर-पाचलला जोडणाºया या मार्गावर तुलनेत कमी वाहतूक असल्याने सा. बां. विभागाकडून दुर्लक्षित असलेल्या या घाटाचे रूंदीकरण प्रामुख्याने होणे आवश्यक आहे. अरूंद असलेल्या या घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचून भेगा पडत आहेत.संपूर्ण घाटात अनेक ठिकाणी या पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडू शकतात. या घाटाच्या दुरुस्तीस प्राधान्य देऊन संपूर्ण घाटाचे रुंदीकरण करावे लागेल तरच यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल. अन्यथा येणाºया पुढच्या पिढीस या ठिकाणी भुईबावडा घाट होता, असे सांगण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.अवजड वाहतुकीवर हवा लगामकरूळ घाटमार्गावरील वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवैध होणाºया वाहतुकीबरोबर अवजड वाहनांची रहदारी यामार्गे वाढली आहे. घाटरस्त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने यामार्गे होणाºया अवजड वाहनांबाबत योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यात पोलिसांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने घाटमार्गाला पर्यटकांनी दिलेली पसंती समाधानकारक असली तरी घाटमार्गावर रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहनांची होणारी वाहतूक तितकीच चिंतेची बाब बनली आहे. लोखंड तसेच इतर अवजड वस्तू भरलेल्या गाड्या या मार्गाने जात आहेत तसेच आकाराने लांब असलेली वाहने घाटमार्गातून जाताना अनेक अडचणी निर्माण होतात. अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचल्यास घाटमार्गच बंद पडण्याची भीती काही जाणकारांमधून व्यक्त होत आहे.