शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

करुळ, भुईबावडा किती सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:16 IST

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची ...

चंद्रकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कगगनबावडा : पावसाळा सुरू झाला की विषय मुख्यत्वे ऐरणीवर येतो तो घाटरस्त्यांचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने मुक्तहस्ते उधळण केलेल्या घाटरस्त्यांतील अनेक ठिकाणे, छोटे- मोठे कोसळणारे धबधबे हे उत्साही तरुणवर्गाचे, आठवडा सहलीचे थांबे झाल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. परिसरात करूळ घाट व भुईबावडा घाट आहेत; परंतु भुईबावडा घाटाची अवस्था अतिशय बिकट असून नजीकच्या कालावधीत जर या घाटाकडे प्राधान्याने लक्ष दिले नाही, तर हा घाट अस्तित्वहीन झाल्याशिवाय राहणार नाही.पन्नाशी ओलांडून गेलेल्या या दोन्ही घाटांची निर्मिती त्यावेळचे तत्कालीन आमदार वैभववाडी तालुक्यातील करूळ गावचे कै. ए. पी. सावंत यांच्या प्रयत्नाने सन १९६५ च्या दरम्यान एकाचवेळी गगनबावडा येथून खारेपाटण-राजापूर हा भाग जोडणारा भुईबावडा घाट तर विजयदुर्ग- मालवण-गोवा यांच्याशी संपर्क जोडणारा अशा दोन्ही घाटांची खुदाई सुरू झाली.तीन वर्षांच्या कालावधीनंतर या दोन्ही घाटांतून वाहतूक सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. साधारणता या पन्नास वर्षांच्या कालावधीत पावसाळी मौसम सुरू झाला की थोड्या फार प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार त्यामुळे वाहतूक खंडित होण्याचे प्रकार घडतच असतात.सन १९९४-९५च्या दरम्यान यापैकी करुळ घाटाने एक भीषण अपघात पाहिला. सेंट्रिंगचे सामान व मजूर घेऊन कुडाळाकडे जाणारा ट्रक घाटाच्या भीषण दरीत कोसळून या अपघातात २४ मजुरांचा अंत झाला व नेहमीप्रमाणेच मोठ्या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारी यंत्रणेने तत्काळ संपूर्ण घाट रूंदीकरण्याचे काम हाती घेतले. त्यामुळेच रुंदीकरण झालेला हा घाट काहीसा सुरक्षित आहे, असे म्हणता येईल.भुईबावडा घाटाच्या तुलनेत काहीसा सुरक्षित असलेल्या या घाटातही संभाव्य धोकादायक ठिकाणेही आहेत. यात एक दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता खचण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मध्यावर भेगा पडल्या आहेत तर काही ठिकाणी मोठे कडे कोसळण्याची स्थितीही आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोखंडी नेट लावून हे कडे थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या नेटने हे कडे पेलू शकतील का? याचे उत्तर नकारार्थीच असेल.निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या जणू हिरवी शाल लपटलेल्या या घाटात काही प्रमाणात हौशी तरूण पर्यटकांचा वावर होताना दिसत आहे. पर्यटन म्हणजे आजच्या तरुणांच्या समजुतीनुसार दारू पिणे व घाटात कोळणाऱ्या धबधब्याखाली भिजणे यानुसार अनेक तरूण तरुणी घाटात प्रवास करताना दिसतात. दारू पिऊन अर्धवट कपड्याात प्रवाशांना अडविणे. अर्वाच्च भाषा वापरणे यासारखे प्रकार वारंवार घडत असतात. यासाठी किमान रविवार वा सुटीच्या दिवसात तरी पोलिसांनी गस्त घालणे गरजेचे आहे.भुईबावडा घाटाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. खारेपाटण- राजापूर-पाचलला जोडणाºया या मार्गावर तुलनेत कमी वाहतूक असल्याने सा. बां. विभागाकडून दुर्लक्षित असलेल्या या घाटाचे रूंदीकरण प्रामुख्याने होणे आवश्यक आहे. अरूंद असलेल्या या घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचून भेगा पडत आहेत.संपूर्ण घाटात अनेक ठिकाणी या पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडू शकतात. या घाटाच्या दुरुस्तीस प्राधान्य देऊन संपूर्ण घाटाचे रुंदीकरण करावे लागेल तरच यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल. अन्यथा येणाºया पुढच्या पिढीस या ठिकाणी भुईबावडा घाट होता, असे सांगण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.अवजड वाहतुकीवर हवा लगामकरूळ घाटमार्गावरील वाहतुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अवैध होणाºया वाहतुकीबरोबर अवजड वाहनांची रहदारी यामार्गे वाढली आहे. घाटरस्त्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने यामार्गे होणाºया अवजड वाहनांबाबत योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यात पोलिसांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने घाटमार्गाला पर्यटकांनी दिलेली पसंती समाधानकारक असली तरी घाटमार्गावर रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहनांची होणारी वाहतूक तितकीच चिंतेची बाब बनली आहे. लोखंड तसेच इतर अवजड वस्तू भरलेल्या गाड्या या मार्गाने जात आहेत तसेच आकाराने लांब असलेली वाहने घाटमार्गातून जाताना अनेक अडचणी निर्माण होतात. अवजड वाहतुकीमुळे रस्ता खचल्यास घाटमार्गच बंद पडण्याची भीती काही जाणकारांमधून व्यक्त होत आहे.