शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांच्या सत्तेत ५० टक्के भागीदार कसे?

By admin | Updated: May 19, 2017 00:12 IST

दरोडेखोरांच्या सत्तेत५० टक्के भागीदार कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कसावंतवाडी : आताचे भाजप सरकार संवेदनाशून्य असून या सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा सुरू केली आहे. शिवसेना भाजपला दरोडेखोरांचे सरकार म्हणते, मग शिवसेना सत्तेत ५० टक्के भागीदार कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्गमधील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले असून, पालकमंत्र्यांना नुकसानग्रस्तांना साधा धीरही द्यायला वेळ नाही, अशी टीका केली.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, कवाडे गट यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप गुरूवारी सावंतवाडीत झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, नितेश राणे, राजेश टोपे, सुनिल केदार, जयराम शिदे, आमदार हस्राबानू खलिफे, माजी मंत्री प्रविण भोसले, जिल्हा परीषद अध्यक्ष रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिकटर डॉन्टस, जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, अबिद नाईक, विकास सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, विशाल परब, सुधीर आडिवरेकर, राजू मसूरकर आदि उपस्थीत होते.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदीवर टिका केली ५६ इंच छाती असणारे पतप्रंधान हे जवानाचे नातेवाईक आंदोलन करताना गप्प का बसले, एक सैनिक मारला तर पाकिस्तानचे दहा सैनिकाचे धड मारून आणू असे सांगत होते. पण आता यातील काही दिसत नाही, खोटे बोलून हे सरकार सत्तेवर आले आहे. कोकणातील दहा आमदार, खासदार राज्यात व केंद्रात मंत्री पदावर आहे. मग कोकणचा विकास का झाला नाही असा सवाल करीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू झाल्यावर झपाट्याने कोकण रेल्वेचा विकास झाला पाहिजे होता. पण रेल्वेचे वाटोळे करण्याचे काम प्रभंूनी केले आहे. प्रत्येक राज्यातील रेल्वेमंत्री झाले तेथील विकास बघा आणि प्रभू रेल्वेमंत्री झाल्यावर काय विकास झाला तो बघा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.यावेळी माजी मंत्री जंयत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार नितेश राणे आदींनी विचार मांडले. तर संवाद यात्रेचा समारोप उपस्थितांना हात उंचावून अभिवादन करून करण्यात आला.सर्वात असंवेदनशिल सरकार : राणेयावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले, राज्यातील आता पर्यंतच्या माझ्या कारर्किदीत बघितलेले सर्वात असवेंदनशील सरकार आहे. राज्यावर आपत्ती आली कि सर्वजण एक होतात मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात तर शिवसेना भाजप एक होऊन त्यावर मार्ग का काढत नाही, कर्ज माफी का देत नाही? असा सवाल त्यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा यापूर्वी टँकरमुक्त केला तसेच प्रत्येक गावात गुरे जातात, त्या ठिकाणीही रस्ते झाले, पण आताचे सरकार नियोजनशुन्य आहे. प्रशासनाचा नियोजनशुन्य कारभार आहे. आघाडी सरकार सत्तेत असताना सर्व काही दिले पण आता हे सरकार कोकणातील बागयतदाराला वाऱ्यावर सोडून देण्याचे काम करीत आहे, अशी टिकाही राणे यांनी केली.तहसिलदार, प्रांताधिकारी अवकाळीग्रस्तांना भेटले नाहीसिंधुदुर्गमध्ये बांदा डेगवे येथे अवकाळी पाउस झाला यात शेतकऱ्यांचे मोठे नूकसान झाले मात्र पालकमंत्री येथे तूर घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : पृथ्वीराज चव्हाणमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात यावेळी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले, मात्र शासनाला तूर उत्पादन किती झाले यांची माहितीच नाही ही शोकांतिका आहे.तूर आयात करण्याची गरज नव्हती, निर्यात झाली पाहिजे होती पण सरकारला आपले धोरणच ठरवता आले नाही, त्यामुळेच मुख्यमंत्री हे तूरमध्ये चारशे कोटींचा घोटाळा झाला असे सांगतात. जर घोटाळा झाला असेल तर राज्यातील यंत्रेणेऐवजी सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी चव्हाण यांनी केली. तसेच यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या होत नव्हत्या, पण आता पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या होत आहेत. शिवाय अगोदर शेतकरी आत्महत्या करत होत; पण आता त्यांची मुले आत्महत्या करायला लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली.