शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

बाजार समित्यांमधील बांडगुळं किती वर्षे सांभाळायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST

इचलकरंजी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात दलाल, हमाल, राजकारणी व त्यांचे बगलबच्चे सामील झाले आहेत. वाहत्या गंगेत न्हाऊन घ्यायचा हा ...

इचलकरंजी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात दलाल, हमाल, राजकारणी व त्यांचे बगलबच्चे सामील झाले आहेत. वाहत्या गंगेत न्हाऊन घ्यायचा हा त्यांचा प्रकार आहे. तसेच बाजार समित्या राजकीय बगलबच्च्यांच ताब्यातच राहवीत असा काहींचा अट्टाहास आहे. मात्र, ही बांडगुळं शेतकऱ्यांनी किती वर्षे सांभाळायची ? असा सवाल माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकाला काहींची दृष्ट लागली आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजी राज्यभरात विधेयकांवर दुग्धाभिषेक घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने यापूर्वीच मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कॉन्ट्रॅक्ट शेतीला सुरुवात केली आणि आता केंद्र सरकारने मंजूर केलेेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आव आणत आहेत. विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार असून शेतीमध्ये गुंतवणूक वाढणार आहे. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार उपस्थित होते.

चौकट - राजू शेट्टींनी विद्यापीठ बदलले असेल. आमची सुरुवात शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्या विद्यापीठातून झाली आहे, परंतु कदाचित शेट्टींनी विद्यापीठ बदलून शरद पवार यांच्या विद्यापीठात प्रवेश घेतला असेल. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम बदलल्याने ते शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असतील, असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.