शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांमधील बांडगुळं किती वर्षे सांभाळायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST

इचलकरंजी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात दलाल, हमाल, राजकारणी व त्यांचे बगलबच्चे सामील झाले आहेत. वाहत्या गंगेत न्हाऊन घ्यायचा हा ...

इचलकरंजी : दिल्लीतील शेतकरी आंदोलनात दलाल, हमाल, राजकारणी व त्यांचे बगलबच्चे सामील झाले आहेत. वाहत्या गंगेत न्हाऊन घ्यायचा हा त्यांचा प्रकार आहे. तसेच बाजार समित्या राजकीय बगलबच्च्यांच ताब्यातच राहवीत असा काहींचा अट्टाहास आहे. मात्र, ही बांडगुळं शेतकऱ्यांनी किती वर्षे सांभाळायची ? असा सवाल माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकाला काहींची दृष्ट लागली आहे. त्यामुळे १४ डिसेंबर रोजी राज्यभरात विधेयकांवर दुग्धाभिषेक घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने यापूर्वीच मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कॉन्ट्रॅक्ट शेतीला सुरुवात केली आणि आता केंद्र सरकारने मंजूर केलेेले कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आव आणत आहेत. विधेयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार असून शेतीमध्ये गुंतवणूक वाढणार आहे. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार उपस्थित होते.

चौकट - राजू शेट्टींनी विद्यापीठ बदलले असेल. आमची सुरुवात शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांच्या विद्यापीठातून झाली आहे, परंतु कदाचित शेट्टींनी विद्यापीठ बदलून शरद पवार यांच्या विद्यापीठात प्रवेश घेतला असेल. त्यामुळे त्यांचा अभ्यासक्रम बदलल्याने ते शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या विधेयकाला विरोध करत असतील, असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.