शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

वडनेरे समितीने सुचविलेल्या किती उपाययोजना केल्या..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेल्या महापुरावर उपाययोजना म्हणून नदीतील गाळ, वाळू काढण्यासाठी समिती नेमण्याची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा ...

कोल्हापूर : पंचगंगा नदीला आलेल्या महापुरावर उपाययोजना म्हणून नदीतील गाळ, वाळू काढण्यासाठी समिती नेमण्याची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा ही जनतेच्या डोळ्यात फेकलेली धूळच ठरणार असल्याची टीका अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने उदय नारकर व अमोल नाईक यांनी केली आहे. वडनेरे समितीच्या अहवालातील आपल्याशी संबंधित किती उपाययोजना केल्या आहेत, याचा हिशेब कोल्हापूर महापालिकेने आणि शासनाने दिला पाहिजे. याबाबतीत पाठपुरावा करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, वडनेरे समितीने प्रामुख्याने नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकामे, शासनाचे रस्त्यांवरील अशास्त्रीय पद्धतीने बांधलेले पुलाचे भराव जबाबदार असल्याचे म्हटले आहे. वडनेरे समितीच्या शिफारशींकडे शासनाने गुन्हेगारी स्वरूपाचे दुर्लक्ष केले आहे. नदीत गावे वसवायची आणि पूर्वापार वसलेली गावे उठवायची, हा कसला कारभार आहे? बेसुमार बांधकामे करून पाणी तुंबवायचे आणि चिखलीसारखी गावे उठवा, म्हणून ओरड करायची, हा प्रकार थांबला पाहिजे. कोल्हापूर महानगरपालिकेने प्रथम आपल्या चुका पदरात घेऊन सुधारणा केल्या पाहिजेत. रस्त्याच्या नावाने बांधलेली जागोजागची ‘धरणे’ शासनाने काढून जनतेला बुडण्यापासून वाचविण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम राज्य शासनाने स्वीकारलेल्या जनतेने कोल्हापूर महापालिका आणि राज्य सरकारला याबाबतीत जागे करण्याच्या कामात साथ द्यावी, असे आवाहन सभेने केले आहे.