शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

शासकीय छळछावणीत किती दिवस ?

By admin | Updated: March 29, 2015 00:18 IST

अभयारण्यग्रस्तांचा सवाल : ठिय्या आंदोलन सुरूच; कडाक्याचा उष्मा, वळवाचा तडाखा

भारत चव्हाण / कोल्हापूर ज्याला कोणी नाही, त्यांना शेवटी सरकार वाली असतं, असं म्हणतात; पण सरकारनंही जर वाऱ्यावर सोडलं तर? तर मग त्यांची काही खैर नाही. गोरगरीब, कष्टकऱ्यांना वाली नाही म्हणतात, तेच खरं. याचा अनुभव चांदोली अभयारण्यातील गोरगरीब, कष्टकरी जनता गेल्या १३ दिवसांपासून घेत आहे. कैक वर्षे सरळ मार्गाने न्याय-हक्कांसाठी लढा केला; पण कोणी दखल घेतली नाही. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचं दार ठोठावलं. त्यांनीही गांभीर्यानं घेतलं नाही. सरकार तर दूरच राहिले. कडाक्याचा उष्मा आणि वळवाचा पाऊस अंगावर झेलत, मिळेत तसं शिळंपाकं खाऊन हे कोमेजलेले अभयारण्यग्रस्त आणखी किती दिवस या शासकीय छळछावणीत मुक्काम ठोकायचा, असा संतप्त सवाल करत आहेत. चांदोली अभयारण्यातील सात गावांतील गरीब जनता योग्य पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. देय असलेल्या जमिनी त्यांना मिळालेल्या नाहीत. रोखीनं मोबदला मिळालेला नाही. विस्थापित ठिकाणी नागरी सुविधाही दिलेल्या नाहीत. त्यासाठी गेल्या १५-१६ वर्षांपासून लढा सुरू आहे. आता खूप झालं म्हणत अभयारण्यग्रस्तांनी १६ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे; पण अभयारण्यग्रस्तांनी आपली जिद्द सोडलेली नाही. जमीन व मोबदला मिळत नाही, तोपर्यंत जागचं हलायचं नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. सात गावांतील घरटी एक माणूस या ठिय्या आंदोलनात सहभागी झाला आहे. दोन दिवसाआड गावाकडून येणाऱ्या डब्यातील भाजी-भाकरी खाऊन आपला लढा सुरू ठेवला आहे. शिळंपाकं खायचं आता त्यांच्या अंगवळणी पडलंय. आंदोलकांपैकी काहीजण गावाकडं जातात, येताना जेवणाचे डबे घेऊन येतात. उन्हाळ्यात भाजी खराब होते, म्हणून काहींच्या डब्यात तर कांदा, चटणी, खरडा असले पदार्थ ठरलेले आहेत. रोज तेच ते खाऊन त्यांनाही कंटाळा आलायं; पण नाईलाज आहे. सरकार दाद लागू देईना आणि स्थानिक अधिकारी सहकार्य करेनात, अशी त्यांची गत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा म्हणून विनंत्या केल्या; पण कोणीही त्यांची दखल घेतलेली नाही. घासभर खाल्ल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी महावीर गार्डनचा परिसर पालथा घालावा लागतो. रात्रीची झोप, प्रातर्विधी, रोजची अंघोळ यांचं गणित आणि वेळ चुकली आहे. एकाच ठिकाणी बसल्यामुळे आंदोलकांच्या चेहऱ्यावरील हास्य कधीच लोप पावले आहे. आंदोलनाचं काय होणार, जमीन व मोबदला मिळणार की नाही, असे अनेक प्रश्न त्यांना सतावत असून, याचा तणाव अभयारण्यग्रस्तांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतोय. कोमेजलेले, चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त अभयारण्यग्रस्त, ‘आणखी किती दिवस या शासकीय छळछावणीत राहायचं’ असं विचारत आहेत.