शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कर्मचाºयांच्या तरतुदीविना जिल्हा बँकेचा ताळेबंद खरा कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:13 IST

कोल्हापूर : कर्मचाºयांच्या देणी रकमेची तरतूद न करता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने सभासदांना सादर केलेला ताळेबंद खरा कसा? असा सवाल करत कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत

ठळक मुद्देप्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेकर्मचाºयांचे लाखो रुपये बँकेकडे अडकून राहिले आहेतरोजंदारी कर्मचाºयांवरच बहुतांशी शाखांचा डोलारा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्मचाºयांच्या देणी रकमेची तरतूद न करता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने सभासदांना सादर केलेला ताळेबंद खरा कसा? असा सवाल करत कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केला.

अनुकंपाखालील कर्मचाºयांना सामावून घ्या, रोजंदारी कर्मचाºयांना नियमित करा यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचाºयांना मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दुसºया दिवशी विविध शाखांतील १६८ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी बँक प्रशासनावर सडकून टीका केली. कर्मचाºयांच्या फरकाची रक्कम गेली अनेक वर्षे बँकेने दिलेली नाही. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, कर्मचाºयांचे लाखो रुपये बँकेकडे अडकून राहिले आहेत; पण या रकमेची तरतूद बँकेने आपल्या ताळेबंदात केलेली नाही.

कर्मचाºयांच्या देणे रकमेची तरतूद न करता बँकेने चुकीचा ताळेबंद सभासदांसमोर सादर केल्याचा आरोप पाटील यांनी केला. गेले अनेक वर्षे कर्मचारी आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी प्रयत्न करत असताना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे; पण कर्मचाºयांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.यावेळी बँक एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे, दिलीप पवार, एस. डी. पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.प्रलंबित रकमेबाबत न्यायालयाचे आदेशकर्मचाºयांच्या देण्याबाबत औद्योगिक न्यायालयाने पाच-सहा दिवसांपूर्वी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या रकमेची ताळेबंदाला तरतूद करण्याबाबतचे आदेश न्यायालयाने दिल्याचेही भगवान पाटील यांनी सांगितले.रोजंदारीवर जबाबदारी कशी देता?बॅँकेत गेले नऊ-दहा वर्षांपासून शंभर कर्मचारी रोजंदारीवर काम करत आहेत. तब्बल २७ शाखांत केवळ दोन-दोन कर्मचारी काम करत आहेत. बँकेची गरज व कर्मचाºयांची संख्या पाहता रोजंदारी कर्मचाºयांवरच बहुतांशी शाखांचा डोलारा सुरू आहे. त्यांना नियमित करत नाहीत तर त्यांना जोखमीचे काम का देता? असा सवाल ही पाटील यांनी केला.विविध मागण्यांसाठी जिल्हा बँकेच्या कर्मचाºयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी विविध शाखांतील १६८ कर्मचाºयांनी सहभागी होऊन घोषणाबाजी केली.