शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कर्मचाºयांच्या तरतुदीविना जिल्हा बँकेचा ताळेबंद खरा कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:13 IST

कोल्हापूर : कर्मचाºयांच्या देणी रकमेची तरतूद न करता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने सभासदांना सादर केलेला ताळेबंद खरा कसा? असा सवाल करत कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत

ठळक मुद्देप्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेकर्मचाºयांचे लाखो रुपये बँकेकडे अडकून राहिले आहेतरोजंदारी कर्मचाºयांवरच बहुतांशी शाखांचा डोलारा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्मचाºयांच्या देणी रकमेची तरतूद न करता जिल्हा बँकेच्या प्रशासनाने सभासदांना सादर केलेला ताळेबंद खरा कसा? असा सवाल करत कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केला.

अनुकंपाखालील कर्मचाºयांना सामावून घ्या, रोजंदारी कर्मचाºयांना नियमित करा यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचाºयांना मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दुसºया दिवशी विविध शाखांतील १६८ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी बँक प्रशासनावर सडकून टीका केली. कर्मचाºयांच्या फरकाची रक्कम गेली अनेक वर्षे बँकेने दिलेली नाही. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, कर्मचाºयांचे लाखो रुपये बँकेकडे अडकून राहिले आहेत; पण या रकमेची तरतूद बँकेने आपल्या ताळेबंदात केलेली नाही.

कर्मचाºयांच्या देणे रकमेची तरतूद न करता बँकेने चुकीचा ताळेबंद सभासदांसमोर सादर केल्याचा आरोप पाटील यांनी केला. गेले अनेक वर्षे कर्मचारी आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी प्रयत्न करत असताना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे; पण कर्मचाºयांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले.यावेळी बँक एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे, दिलीप पवार, एस. डी. पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.प्रलंबित रकमेबाबत न्यायालयाचे आदेशकर्मचाºयांच्या देण्याबाबत औद्योगिक न्यायालयाने पाच-सहा दिवसांपूर्वी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या रकमेची ताळेबंदाला तरतूद करण्याबाबतचे आदेश न्यायालयाने दिल्याचेही भगवान पाटील यांनी सांगितले.रोजंदारीवर जबाबदारी कशी देता?बॅँकेत गेले नऊ-दहा वर्षांपासून शंभर कर्मचारी रोजंदारीवर काम करत आहेत. तब्बल २७ शाखांत केवळ दोन-दोन कर्मचारी काम करत आहेत. बँकेची गरज व कर्मचाºयांची संख्या पाहता रोजंदारी कर्मचाºयांवरच बहुतांशी शाखांचा डोलारा सुरू आहे. त्यांना नियमित करत नाहीत तर त्यांना जोखमीचे काम का देता? असा सवाल ही पाटील यांनी केला.विविध मागण्यांसाठी जिल्हा बँकेच्या कर्मचाºयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी विविध शाखांतील १६८ कर्मचाºयांनी सहभागी होऊन घोषणाबाजी केली.