शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांची चौकशी सूडबुद्धीतून कशी?

By admin | Updated: September 23, 2015 00:16 IST

पालकमंत्र्यांचे प्रत्युत्तर : ‘कागलच्या श्रावणबाळा’चा शब्दकोशच वेगळा असल्याची टीका

कोल्हापूर : संस्था बुडविणे ही ज्यांची संस्कृती आहे, त्यांच्या तोंडी ‘सुसंस्कृत’ शब्द शोभत नाहीत, असा फटकारा लगावतानाच कागलच्या या ‘श्रावणबाळा’चा शब्दकोशच वेगळा असल्याची बोचरी टीका पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता केली. जिल्हा बँकेतील घोटाळ्यांची चौकशी ही सूडबुद्धीतून कशी? ठरते अशी विचारणाही पालकमंत्री पाटील यांनी केली आहे.जिल्हा बँकेची चौकशी पालकमंत्र्यांनी सुडबुध्दीतून नव्याने सुरू केल्याची टीका मुश्रीफ यांनी सोमवारी (दि. २१) पत्रकार परिषद घेऊन केली होती. त्याला पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक राहुल चिकोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या या पत्रकात म्हटले आहे, ‘कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक, राज्य सहकारी बॅँक, आदी संस्थांतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांची राज्य शासनाने सुरू केलेली चौकशी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारी आहे. कोल्हापूर जिल्हा बॅँकेत दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची चौकशी पूर्वीच्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या आदेशानेच सुरू आहे. ती चौकशी सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून पूर्ण करणे आणि घोटाळेबाजांच्या पदरात त्यांच्या भ्रष्टाचाराचे पाप बांधणे ही सूडबुद्धी कशी ठरते? जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळेच यांच्याच सरकारने बॅँकेवर १२ नोव्हेंबर २००९ रोजीच्या आदेशाने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमला. प्रशासकाच्या कारकिर्दीत बॅँकेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली, याचे आमच्या मित्रांना विस्मरण झालेले दिसते. अनेक घोटाळ्यांवर पांघरूण घालायच्या कार्यबाहुल्यामुळेच हे विस्मरण झाले असावे.जिल्हा बॅँकेच्या अनेक शाखांत गैरव्यवहार झाले. कागल शाखेत कोट्यवधींचा अपहार झाला. केंद्र सरकारच्या कर्जमाफीतही शंभर कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाला. संचालकांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे जिल्हा बॅँकेला १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी आघाडी सरकारनेच तक्रारींमुळे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशी सुरू केली. ती कायद्यानुसारच आहे. सार्वजनिक पैशांवर सामुदायिक हात मारल्याचे चौकशीत निदर्शनास आले. सहकारी संस्था लुटणाऱ्यांचे पाप त्यांच्या पदरात बांधणे माझे कर्तव्यच आहे. आघाडी सरकारच्या काळातील चुकीच्या धोरणामुळे देशातील साखर उद्योग अडचणीत आला. पंतप्रधानांनी या प्रकरणी स्वत:हून पुढाकार घेत ऊस उत्पादकांचे थकीत देणे देण्यासाठी तीन हजार कोटींचे कृषिकर्ज देण्याचा निर्णय घेतला व त्याची कार्यवाही सुरू केली. राज्य शासनाने विविध उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे ‘एफआरपी’ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू होईल. गळीत हंगाम केव्हा सुरू होईल, याविषयी ‘राष्ट्रवादी’च्या माजी मंत्र्यांनी उगीच डोक्याला ताप करून घेऊ नये. फुंडकर यांच्याविषयीमाझी राजकीय वाटचाल आणि फुंडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना जबाबदारी देण्याविषयी केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेतृत्व सक्षम आहे. त्याविषयी आमच्या मित्रांच्या सदिच्छांची गरज नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.खाई त्याला खवखवे...या घोटाळेबाजांचे कर्तृत्व चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद आहे. या प्रकरणी कायद्यानुसार चौकशी सुरू आहे. चौकशी केवळ एका-दुसऱ्या व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तर अनेक माजी संचालक व अधिकारी यांच्यावर या घोटाळाप्रकरणी ठपका ठेवला आहे. असे असताना या गृहस्थांना सूडबद्धी दिसते म्हणजे ‘खाई त्याला खवखवे’ असा प्रकार म्हणावा लागेल. आटापिटा यासाठी...मुश्रीफ पक्षनेतृत्वाच्या ‘गुडबुक’मध्ये राहावे या उद्देशानेच माझ्याविरोधात सातत्याने ऊठसूट खोटेनाटे वक्तव्य करीत असल्याची टीकाही पालकमंत्र्यांनी केली आहे.