शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता राबवायची कशी?

By admin | Updated: December 25, 2015 00:48 IST

निवडणूक यंत्रणेची हतबलता : मतदार सहलीवर गेल्याचा पुरावा नाही विधान परिषदेचे रणांगण

प्रवीण देसाई -- कोल्हापूर --प्रसारमाध्यमांमधून मतदार सहलीवर गेल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याचा सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध नसल्याने आचारसंहिता भंगाची कारवाई करायची कशी असा पेच विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यान्वित केलेल्या यंत्रणेला पडला आहे. आचारसंहिता भंगाबद्दल कोणाकडूनही तक्रारही दाखल झालेली नाही. कारण महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील या दोन्हीही उमेदवारांकडून मतदार सहलीवर गेल्याची चर्चा असल्याने तक्रार करणार तरी कोण? कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील व अपक्ष म्हणून आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहे. दोन्हीकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष कोल्हापूरकडे लागून राहिले आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणाही गतिमान झाल्या आहेत. इतर निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत खर्च करण्यास मर्यादा नाही व हिशेब सादर करण्याची सक्ती नाही, असे असले तरी एकंदरीत प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. इतर निवडणुकांमध्ये जाहीर प्रचार, कोपरासभा, प्रचारसभा, पदयात्रा, रोड शो असा जाहीर स्वरूपाचा प्रचार असतो. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्यास उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यासंदर्भात विरोधी उमेदवाराविरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार करू शकतात. याउलट कोणताही जाहीर प्रचार न करता उमेदवारांकडून मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेतल्या जातात तसेच आचारसंहिता भंगसंदर्भातील तक्रारी या निवडणुकीतही दाखल केल्या जाऊ शकतात, असे असतानादेखील कोणाकडूनही निवडणूक यंत्रणेकडे तक्रार दाखल झाली नाही.मतदार सहलीवर नेणे हे एकप्रकारे आमिषच आहे; परंतु या सहलींबाबत भक्कम पुरावा मिळत नसल्याने निवडणूक यंत्रणेला थेट त्यांच्यावर आचारसंहितेची कोणतीही कारवाई करता येत नसल्याचे चित्र आहे. कारवाई कशी करायची आणि कोणावर, अशा पेचात निवडणूक यंत्रणा दिसत आहे. याशिवाय आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई करायची म्हटल्यावर त्याची कोणी तरी तक्रार देणे अपेक्षित आहे; परंतु ही तक्रार देणार कोण हा प्रश्न आहे.