शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आचारसंहिता राबवायची कशी?

By admin | Updated: December 25, 2015 00:48 IST

निवडणूक यंत्रणेची हतबलता : मतदार सहलीवर गेल्याचा पुरावा नाही विधान परिषदेचे रणांगण

प्रवीण देसाई -- कोल्हापूर --प्रसारमाध्यमांमधून मतदार सहलीवर गेल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याचा सकृतदर्शनी पुरावा उपलब्ध नसल्याने आचारसंहिता भंगाची कारवाई करायची कशी असा पेच विधान परिषद निवडणुकीसाठी कार्यान्वित केलेल्या यंत्रणेला पडला आहे. आचारसंहिता भंगाबद्दल कोणाकडूनही तक्रारही दाखल झालेली नाही. कारण महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील या दोन्हीही उमेदवारांकडून मतदार सहलीवर गेल्याची चर्चा असल्याने तक्रार करणार तरी कोण? कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील व अपक्ष म्हणून आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहे. दोन्हीकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष कोल्हापूरकडे लागून राहिले आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणाही गतिमान झाल्या आहेत. इतर निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत खर्च करण्यास मर्यादा नाही व हिशेब सादर करण्याची सक्ती नाही, असे असले तरी एकंदरीत प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहिता पथकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. इतर निवडणुकांमध्ये जाहीर प्रचार, कोपरासभा, प्रचारसभा, पदयात्रा, रोड शो असा जाहीर स्वरूपाचा प्रचार असतो. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्यास उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यासंदर्भात विरोधी उमेदवाराविरोधात निवडणूक विभागाकडे तक्रार करू शकतात. याउलट कोणताही जाहीर प्रचार न करता उमेदवारांकडून मतदारांच्या व्यक्तिगत भेटीगाठी घेतल्या जातात तसेच आचारसंहिता भंगसंदर्भातील तक्रारी या निवडणुकीतही दाखल केल्या जाऊ शकतात, असे असतानादेखील कोणाकडूनही निवडणूक यंत्रणेकडे तक्रार दाखल झाली नाही.मतदार सहलीवर नेणे हे एकप्रकारे आमिषच आहे; परंतु या सहलींबाबत भक्कम पुरावा मिळत नसल्याने निवडणूक यंत्रणेला थेट त्यांच्यावर आचारसंहितेची कोणतीही कारवाई करता येत नसल्याचे चित्र आहे. कारवाई कशी करायची आणि कोणावर, अशा पेचात निवडणूक यंत्रणा दिसत आहे. याशिवाय आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई करायची म्हटल्यावर त्याची कोणी तरी तक्रार देणे अपेक्षित आहे; परंतु ही तक्रार देणार कोण हा प्रश्न आहे.