शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून पास दिल्याने गोंधळ सुरू झाल्याचे स्पष्ट; मुंबईहून माणसे येतातच कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 20:00 IST

एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे निश्चित आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया

समीर देशपांडे।कोल्हापूर : आम्ही दीड महिना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळले. आगाऊपणा केला म्हणून काठ्याही खाल्ल्या. गाडया जप्त करून घेतल्या. दंड भरला. हातावरचं पोट असूनही गाडा उघडला नाही. रिक्षा काढली नाही. सगळे नियम आमच्यासाठी; मग कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढवणारी पुणे, मुंबई येथून माणसं जिल्ह्यात येतात कशी? असा संतप्त सवाल नागरिक आता करीत आहेत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क न साधता पुणे, मुंबईतून पास दिले गेल्याने हा गोेंधळ सुरू झाला आहे.

जिल्ह्यात मुंबईहून आलेले तिघेजण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शुक्रवारी मध्यरात्री आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर पहिल्या १० दिवसांत ८० हजारांहून अधिक नागरिक पुण्या-मुंबईसह अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत; परंतु नंतर मुंबई आणि पुणे हे रेड झोन बनल्याने अशांना गावात येण्यास बंदी घातली.

गेल्या आठवडयात मराठवाडयातील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या शिफारशीवर कागल तालुक्यातील एका गावामध्ये चौघांना सोडण्यात आले. आजही शेकडो गाडया मुंबईहून गावाकडे येण्यासाठी मुंबईत तयार आहेत. एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे निश्चित आहे.

प्रशासनावर येणार ताण

मुंबईतील परिस्थिती बिघडत चालल्याने अनेकजण मुंबई, पुणे सोडून गावाकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. जर अशा मोठया संख्येने नागरिक गावोगावी येणार असतील तर त्याचा ताण प्रशासनावरच येणार आहे. अशा पद्धतीच्या कोणत्याही नागरिकांना जिल्ह्यातून परवानगी दिलेली नाही किंवा ती वरिष्ठ पातळीवरून देताना आम्हाला कोणी विचारले नाही, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

 

हा विषय मुख्य सचिवांपर्यंत

या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, मुंबई आणि पुणे या कँटोनमेंट एरियातील एकाही माणसाला आम्ही परवानगी दिलेली नाही. आमची परवानगी न घेता हे सर्व पास मुंबई आणि पुणे पोलिसांकडून दिले आहेत. यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आम्ही हा विषय मुख्य सचिवांपर्यंत नेला आहे. पालकमंत्री सतेज पाटील हेदेखील संबंधित यंत्रणेशी बोलले आहेत. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी