शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

मुंबईतून पास दिल्याने गोंधळ सुरू झाल्याचे स्पष्ट; मुंबईहून माणसे येतातच कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 20:00 IST

एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे निश्चित आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया

समीर देशपांडे।कोल्हापूर : आम्ही दीड महिना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळले. आगाऊपणा केला म्हणून काठ्याही खाल्ल्या. गाडया जप्त करून घेतल्या. दंड भरला. हातावरचं पोट असूनही गाडा उघडला नाही. रिक्षा काढली नाही. सगळे नियम आमच्यासाठी; मग कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढवणारी पुणे, मुंबई येथून माणसं जिल्ह्यात येतात कशी? असा संतप्त सवाल नागरिक आता करीत आहेत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क न साधता पुणे, मुंबईतून पास दिले गेल्याने हा गोेंधळ सुरू झाला आहे.

जिल्ह्यात मुंबईहून आलेले तिघेजण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शुक्रवारी मध्यरात्री आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर पहिल्या १० दिवसांत ८० हजारांहून अधिक नागरिक पुण्या-मुंबईसह अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत; परंतु नंतर मुंबई आणि पुणे हे रेड झोन बनल्याने अशांना गावात येण्यास बंदी घातली.

गेल्या आठवडयात मराठवाडयातील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या शिफारशीवर कागल तालुक्यातील एका गावामध्ये चौघांना सोडण्यात आले. आजही शेकडो गाडया मुंबईहून गावाकडे येण्यासाठी मुंबईत तयार आहेत. एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे निश्चित आहे.

प्रशासनावर येणार ताण

मुंबईतील परिस्थिती बिघडत चालल्याने अनेकजण मुंबई, पुणे सोडून गावाकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. जर अशा मोठया संख्येने नागरिक गावोगावी येणार असतील तर त्याचा ताण प्रशासनावरच येणार आहे. अशा पद्धतीच्या कोणत्याही नागरिकांना जिल्ह्यातून परवानगी दिलेली नाही किंवा ती वरिष्ठ पातळीवरून देताना आम्हाला कोणी विचारले नाही, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

 

हा विषय मुख्य सचिवांपर्यंत

या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, मुंबई आणि पुणे या कँटोनमेंट एरियातील एकाही माणसाला आम्ही परवानगी दिलेली नाही. आमची परवानगी न घेता हे सर्व पास मुंबई आणि पुणे पोलिसांकडून दिले आहेत. यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आम्ही हा विषय मुख्य सचिवांपर्यंत नेला आहे. पालकमंत्री सतेज पाटील हेदेखील संबंधित यंत्रणेशी बोलले आहेत. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी