शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

मुंबईतून पास दिल्याने गोंधळ सुरू झाल्याचे स्पष्ट; मुंबईहून माणसे येतातच कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 20:00 IST

एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे निश्चित आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया

समीर देशपांडे।कोल्हापूर : आम्ही दीड महिना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळले. आगाऊपणा केला म्हणून काठ्याही खाल्ल्या. गाडया जप्त करून घेतल्या. दंड भरला. हातावरचं पोट असूनही गाडा उघडला नाही. रिक्षा काढली नाही. सगळे नियम आमच्यासाठी; मग कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढवणारी पुणे, मुंबई येथून माणसं जिल्ह्यात येतात कशी? असा संतप्त सवाल नागरिक आता करीत आहेत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क न साधता पुणे, मुंबईतून पास दिले गेल्याने हा गोेंधळ सुरू झाला आहे.

जिल्ह्यात मुंबईहून आलेले तिघेजण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शुक्रवारी मध्यरात्री आल्यामुळे खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर पहिल्या १० दिवसांत ८० हजारांहून अधिक नागरिक पुण्या-मुंबईसह अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत; परंतु नंतर मुंबई आणि पुणे हे रेड झोन बनल्याने अशांना गावात येण्यास बंदी घातली.

गेल्या आठवडयात मराठवाडयातील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या शिफारशीवर कागल तालुक्यातील एका गावामध्ये चौघांना सोडण्यात आले. आजही शेकडो गाडया मुंबईहून गावाकडे येण्यासाठी मुंबईत तयार आहेत. एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या महिन्यात अशा शिफारस देणाºया लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाईचा इशारा दिला होता. आता बदललेल्या शासनाच्या भूमिकेनंतर प्रासंगिक कारणे पाहून जर पुणे, मुंबईतून माणसे थेट येणार असतील तर ग्रामीण भागात वाद होणार हे निश्चित आहे.

प्रशासनावर येणार ताण

मुंबईतील परिस्थिती बिघडत चालल्याने अनेकजण मुंबई, पुणे सोडून गावाकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. जर अशा मोठया संख्येने नागरिक गावोगावी येणार असतील तर त्याचा ताण प्रशासनावरच येणार आहे. अशा पद्धतीच्या कोणत्याही नागरिकांना जिल्ह्यातून परवानगी दिलेली नाही किंवा ती वरिष्ठ पातळीवरून देताना आम्हाला कोणी विचारले नाही, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

 

हा विषय मुख्य सचिवांपर्यंत

या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, मुंबई आणि पुणे या कँटोनमेंट एरियातील एकाही माणसाला आम्ही परवानगी दिलेली नाही. आमची परवानगी न घेता हे सर्व पास मुंबई आणि पुणे पोलिसांकडून दिले आहेत. यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आम्ही हा विषय मुख्य सचिवांपर्यंत नेला आहे. पालकमंत्री सतेज पाटील हेदेखील संबंधित यंत्रणेशी बोलले आहेत. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी