शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी यशवंत घरकूल योजनेतील घरे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:17 IST

मोहन सातपुते उचगाव : धनगर व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण घरकूल योजनेतून करवीर पंचायत समितीकडून ८० लाभार्थ्यांसाठी ...

मोहन सातपुते

उचगाव : धनगर व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण घरकूल योजनेतून करवीर पंचायत समितीकडून ८० लाभार्थ्यांसाठी घरे मंजूर केली खरी, पण निधीच नसल्यामुळे या सर्व लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न अधांतरी राहिले आहे. विशेष म्हणजे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर काहींनी निधी मिळेल या आशेवर कर्ज काढून घराचे काम सुरू केले आहे. मात्र, अद्यापही निधी न मिळाल्याने हे लाभार्थी हवालदिल झाले आहेत. यशवंतराव चव्हाण घरकूल योजनेसाठी करवीर पंचायत समितीकडे ११० हून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ८० अर्ज मंजूर झाले असून उर्वरित अर्ज काही किरकोळ त्रुटीअभावी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रचंड गाजावाजा करून जाहीर केलेली यशवंत घरकूल योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना आणखीन किती दिवस वाट पाहावी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या योजनेतून घरे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी पैसे न मिळाल्याने आपली घरबांधणी पुढे ढकलली आहे तर काहींनी व्याजदराने कर्ज काढून घर बांधणी सुरू केली आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी कोरोनामुळे गोठवण्यात आल्याचे सांगितले जात असून या योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी धनगर समाजाच्यावतीने करण्यात येत आहे. या योजनेसाठी एका लाभार्थ्याला दीड लाखापर्यंत निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत प्रत्येक लाभार्थ्यास ५ हजार चौरस फूट जागा निवास व स्वयंरोजगारासाठी दिली जाते. यासाठी भटक्या जाती, विमुक्त जमाती या घटकातील व्यक्तींना घरकुल योजनेत लाभ घेता येतो. त्यासाठी लाभ घेण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. दरम्यान निधी नसताना या योजनेसाठी प्रस्तावाची घाई का केली, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

येत्या जुलै महिन्यापर्यंत लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही तर अनेक संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

चौकट : अजूनही ग्रामीण व शहरी भागातील धनगर व भटक्या जमातीतील लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. त्यांनाही या योजनेचा लाभ शासनाने त्वरित मिळवून द्यावा.

डॉ. संदीप हजारे, कोल्हापूर जिल्हा यशवंत सेना जिल्हा संपर्क प्रमुख

कोट: लोकप्रिय योजनांची फक्त घोषणा करून अर्ज मागवणे व त्यासाठी निधीची तरतूदच न करणे म्हणजे वंचित आणि उपेक्षित समाजाची घोर फसवणूक करण्याचा प्रकार आहे. यासाठी तातडीने निधी उपलब्ध करावा अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात येतील.

बबन रानगे, सरसेनापती, मल्हार सेना.

कोट : या योजनेसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर निधीचे वितरण करण्यात येत आहे. ज्या गरजू व्यक्तींना योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांना आपले अर्ज कार्यालयात सादर करावेत.

बी. एस. जगताप, विस्तार अधिकारी, सांख्यिकी व घरकुल विभाग पंचायत समिती करवीर

कोअ : यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी अनेक प्रस्ताव दाखल झाले असून यातील बहुतांश प्रस्ताव मंजूर झाले आहेत. निधी नसल्याने अडचणी निर्माण झाली आहे. योजनेच्या निधीसाठी शिष्टमंडळाद्वारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून मागणी केली आहे. मुश्रीफ यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले आहे.

कृष्णात पुजारी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भटक्या विमुक्त जाती.

फोटो : यशवंतराव चव्हाण घरकूल योजना