शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांतील वसतिगृहे अद्ययावत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

कोल्हापूर : राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांतून शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढे शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करतात. हे विद्यार्थी देश, राज्याचे ...

कोल्हापूर : राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांतून शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढे शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करतात. हे विद्यार्थी देश, राज्याचे भविष्य आहे. त्यांना चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या विद्यापीठे, महाविद्यालयांतील वसतिगृहांचा येत्या १५ दिवसांत आढावा घेऊन आवश्यक सुविधांसह ही वसतिगृहे अद्ययावत केली जातील, असे प्रतिपादन कृषिमंत्री आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती दादा भुसे यांनी रविवारी येथे केले.

येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात श्री भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीतून बांधलेल्या ‘राजमाता विजयाराजे सिंधिया विद्यार्थिनी वसतिगृहा’च्या नव्या इमारतीचे उ्दघाटन मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, महेश शिंदे, भास्कराचार्य प्रतिष्ठानचे स्थानिक अध्यक्ष प्रा. डॉ. भारत खराटे प्रमुख उपस्थित होते. सामाजिक भावनेतून चांगल्या सुविधा असलेल्या वसतिगृह कोल्हापुरात उभारले आहे. या वसतिगृहाच्या इमारतीचा आणखी एक मजला वाढविण्यासाठी निधी देण्यात येईल. कृषी अभ्यासक्रमासाठी सध्या ५२ टक्क्यांहून अधिक मुली प्रवेशित होत आहेत. त्यांना चांगल्या सुविधा, सुरक्षित कॅम्पस उपलब्ध करून दिल्या जातील, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. एखाद्या उपक्रमासाठी सरकारी निधी मिळवायचा असल्यास दोन-तीन वर्षे फाइल फिरवावी लागते. त्याचा विचार करून या कृषी महाविद्यालयातील वसतिगृह सीएसआर फंडातून करण्याचे ठरविले. त्यात भास्कराचार्य प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन ते पूर्ण केल्याने चांगली इमारत उभारली. राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी आयुष्यभर शिक्षणक्षेत्रासाठी योगदान दिले. त्यामुळे त्यांचे नाव या वसतिगृहाला दिले असल्याचे माजी मंत्री पाटील यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणाला बळ देण्याच्या सामाजिक भावनेतून या वसतिगृहासाठी भास्कराचार्य प्रतिष्ठानने मदतीचा हात दिल्याचे प्रा. खराटे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, प्रा. डॉ. नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव प्रमोद लहाळे, कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्ताजी उगले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले, बाळासाहेब यादव, आनंद पाटील, आदी उपस्थित होते. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी आभार मानले.