शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे

By admin | Updated: May 1, 2017 01:14 IST

मराठा महासंघाची आमसभा : चंद्रकांतदादांची घोषणा; जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणार

कोल्हापूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत्या जूनपासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणार असून, त्याची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमसभेत जाहीर केले. दरम्यान, मराठा स्वराज्य भवनसाठी सरकारी जागा आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी यावेळी सांगितले.कोल्हापुरात मार्केट यार्डमधील राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात या मराठा आमसभेचे आयोजन केले होते. आमसभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक वसंतराव मोरे होते. प्रथम शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.आमसभेतील उपस्थितांची संख्या पाहून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कौतुक केले. ते म्हणाले, आमसभेच्या निमित्ताने वेगळ्या कल्पना पुढे येत आहेत. गेल्याच आठवड्यात गोलमेज परिषद झाली. त्यांनीही नेतृत्व ठरवून राज्य शासनाशी चर्चेची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चर्चेसाठी तयार आहेत; पण मराठा आरक्षणाबाबत चर्चेला येताना राज्य शासनाने आतापर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा अभ्यास करून पुढे यावे. या योजनांतील त्रुटीही दाखवून द्याव्यात. सरकारच्या हातात जितके देता येतील तितके निर्णय सरकारने घेतलेले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी येत्या जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू करणार असून, त्याची घोषणा येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, या वसतिगृहासाठी ज्यांच्याकडे इमारती नाहीत, अशांनी भाडेतत्त्वावर इमारती घेऊन ती वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. २५० मुलांची, तर २५० मुलींची संख्या असणारी वसतिगृहे असतील, अशी कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा लढा आजच्या परिस्थितीत न्यायालयात अडकला आहे. त्यासाठी राज्य शासनाने दिग्गज वकील दिले आहेत; त्यामुळे शासन या प्रक्रियेत प्रामाणिकपणे आपला लढा देत आहे असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या संघर्षाला दाद दिली पाहिजे; कारण या संघर्षामुळे शासनाला जाग आली आहे. मराठा समाजाने शिक्षण, व्यवसाय,खेळ, आदींना प्राधान्य देऊन आचारसंहिता तयार करून त्याचे गावागावांत प्रबोधन करण्याची गरज आहे. मराठा भवन उभारणीच्या जागेबाबत मंत्री पाटील म्हणाले, ‘आदर्श’ प्रकरणानंतर सरकारी जागा खासगी वापरासाठी देणे महाकठीण काम झाले आहे. तरीही त्यासाठी आपण प्रयत्न करू. त्या जागांबाबत आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबत पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले.यावेळी शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, डॉ. बी. एम. हिर्डेकर, माजी आमदार के. पी. पाटील, सुरेश साळोखे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, चंद्रकांत जाधव, शैलेजा भोसले, अंजली समर्थ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुणात्मक आणि घटनात्मकरीत्या टिकणारेच आरक्षण हवे : कोंढरेआरक्षणासाठी देशात अनेक हिंसक आंदोलने झाली. त्यानंतर नऊ राज्यांत आरक्षणाचे निर्णय घेतले; परंतु नंतर त्यांना न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे न्यायालयातील लढाई ही तलवारीने नाही, तर गुणवत्तेवरच लढावी लागते. मराठा समाजासाठी गुणवत्ता आणि घटनात्मकरीत्या टिकेल असेच आरक्षण हवे आहे. त्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू व विचारवंतांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोेंढरे यांनी केले.