शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे

By admin | Updated: May 1, 2017 01:14 IST

मराठा महासंघाची आमसभा : चंद्रकांतदादांची घोषणा; जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणार

कोल्हापूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत्या जूनपासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करणार असून, त्याची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आमसभेत जाहीर केले. दरम्यान, मराठा स्वराज्य भवनसाठी सरकारी जागा आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी यावेळी सांगितले.कोल्हापुरात मार्केट यार्डमधील राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात या मराठा आमसभेचे आयोजन केले होते. आमसभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक वसंतराव मोरे होते. प्रथम शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.आमसभेतील उपस्थितांची संख्या पाहून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कौतुक केले. ते म्हणाले, आमसभेच्या निमित्ताने वेगळ्या कल्पना पुढे येत आहेत. गेल्याच आठवड्यात गोलमेज परिषद झाली. त्यांनीही नेतृत्व ठरवून राज्य शासनाशी चर्चेची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही चर्चेसाठी तयार आहेत; पण मराठा आरक्षणाबाबत चर्चेला येताना राज्य शासनाने आतापर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा अभ्यास करून पुढे यावे. या योजनांतील त्रुटीही दाखवून द्याव्यात. सरकारच्या हातात जितके देता येतील तितके निर्णय सरकारने घेतलेले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी येत्या जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू करणार असून, त्याची घोषणा येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, या वसतिगृहासाठी ज्यांच्याकडे इमारती नाहीत, अशांनी भाडेतत्त्वावर इमारती घेऊन ती वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. २५० मुलांची, तर २५० मुलींची संख्या असणारी वसतिगृहे असतील, अशी कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा लढा आजच्या परिस्थितीत न्यायालयात अडकला आहे. त्यासाठी राज्य शासनाने दिग्गज वकील दिले आहेत; त्यामुळे शासन या प्रक्रियेत प्रामाणिकपणे आपला लढा देत आहे असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या संघर्षाला दाद दिली पाहिजे; कारण या संघर्षामुळे शासनाला जाग आली आहे. मराठा समाजाने शिक्षण, व्यवसाय,खेळ, आदींना प्राधान्य देऊन आचारसंहिता तयार करून त्याचे गावागावांत प्रबोधन करण्याची गरज आहे. मराठा भवन उभारणीच्या जागेबाबत मंत्री पाटील म्हणाले, ‘आदर्श’ प्रकरणानंतर सरकारी जागा खासगी वापरासाठी देणे महाकठीण काम झाले आहे. तरीही त्यासाठी आपण प्रयत्न करू. त्या जागांबाबत आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याबाबत पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले.यावेळी शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, डॉ. बी. एम. हिर्डेकर, माजी आमदार के. पी. पाटील, सुरेश साळोखे, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, चंद्रकांत जाधव, शैलेजा भोसले, अंजली समर्थ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुणात्मक आणि घटनात्मकरीत्या टिकणारेच आरक्षण हवे : कोंढरेआरक्षणासाठी देशात अनेक हिंसक आंदोलने झाली. त्यानंतर नऊ राज्यांत आरक्षणाचे निर्णय घेतले; परंतु नंतर त्यांना न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे न्यायालयातील लढाई ही तलवारीने नाही, तर गुणवत्तेवरच लढावी लागते. मराठा समाजासाठी गुणवत्ता आणि घटनात्मकरीत्या टिकेल असेच आरक्षण हवे आहे. त्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू व विचारवंतांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोेंढरे यांनी केले.