शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

सूतगिरण्यांचा वीजप्रश्न सुटण्याची आशा

By admin | Updated: October 12, 2015 00:38 IST

निर्णयाकडे लक्ष : संघटनेला शासन स्तरावर सकारात्मक प्रतिसाद

सांगली : राज्यातील सहकारी सूतगिरण्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू असून, सूतगिरण्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आशा त्यामुळे उंचावल्या आहेत. प्रश्न सुटला नाही, तर आंदोलनाच्या मुद्द्यावर पदाधिकारी ठाम आहेत. राज्यातील १६० सहकारी सूतगिरण्यांपैकी ५७ सूतगिरण्या सुरू व चांगल्या स्थितीत आहेत. त्यासुद्धा बंद पडण्याची चिन्हे दिसत असल्याने अडचणीत सापडलेल्या या सहकारी संस्थांनी एकत्र येऊन सप्टेंबर महिन्यात आंदोलन केले. त्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांना वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, दिलीपतात्या पाटील यांनी याप्रश्नी निवेदन दिले होते. सूतगिरण्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. सूतगिरण्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न वीजदराचा आहे. यापूर्वी वीज दरासाठी अनुदान मिळत होते. पाच ते साडेपाच रुपये प्रति युनिट असणारा विजेचा दर आता ७.४० रुपये ते ८.२० रुपये झाला आहे. २५ ते ३० टक्के वाढ झाल्याने सूतगिरण्यांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वीप्रमाणेच सहकारी सूतगिरण्यांना अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. ऊर्जा खात्याकडेही सूतगिरण्यांचा प्रश्न चर्चेला गेल्याने वस्त्रोद्योगमंत्री, ऊर्जामंत्र्यांची या प्रश्नावर चर्चा झाल्याने हा प्रश्न लवकरच सुटेल, असा आशावाद काही दिवसांपूर्वी दिलीपतात्या पाटील यांनी व्यक्त केला होता. प्रश्न सुटला नाही, तर आंदोलनाच्या भूमिकेवर सूतगिरण्यांचे पदाधिकारी ठाम आहेत. नवीन वस्त्रोद्योग धोरणाचाही फटका बसत आहे. वास्तविक सूतगिरण्यांच्या कर्जप्रकरणावर १० टक्के व्याजाची सवलत मिळावी किंवा व्याजातील सवलतीचे धोरण शासनाने स्वीकारले पाहिजे. सूतगिरण्या आधुनिकीकरणासाठीही प्रोत्साहनपर योजना शासनाने सुरू करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास सूतगिरण्यांना आधुनिकीकरणाचा चांगला फायदा होऊ शकतो. भारतीय कापूस निगम लिमिटेड शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्याच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध करते. हा सर्व कापूस बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून (एमएनसी) खरेदी केला जातो. त्यामुळे दरावर कोणतेही नियंत्रण नाही. सध्या सुताचे दर १५ ते २० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे या दरावरही शासनाचे नियंत्रण हवे. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनस्तरावर आता पाठपुराव्याची गरज आहे. तरीही वीजप्रश्न सुटला, तर सूतगिरण्यांचा सर्वात मोठा प्रश्न मार्गी लागणार असल्याने सूतगिरणी चालकांचे लक्ष ऊर्जा खात्याच्या निर्णयाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)