शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडी शर्यतीबाबत आशा पल्लवित

By admin | Updated: January 30, 2017 23:50 IST

सरकारच्या निर्णयाकडे लक्ष : जलिकट्टीप्रमाणे महाराष्ट्रात परवानगी देण्याची मागणी

गणपती कोळी ल्ल कुरूंदवाडतमिळनाडूतील जलिकट्टू या बैलांच्या शर्यतीवरील शासनाने बंदी उठविल्याने महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यती शौकिनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जलिकट्टूप्रमाणे येथील बैलगाडी शर्यतींवरची बंदी उठवावी, यासाठी तरुणाई पुढे येत असून, भाजप सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे शर्यती शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.महाराष्ट्र विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागात बैलगाडी शर्यतीला विशेष महत्त्व आहे. पूर्वीपासून शेतातील औताची कामे करून वर्षातून गावच्या यात्रा, जत्रा, उरुसाच्या निमित्ताने शेतकरी केवळ हौस म्हणून बैलगाडी शर्यतीतून बैल पळवित असत. यात्रांचा समारोप आजही बैलगाडी शर्यतीनेच केला जातो. या पांरपरिक खेळाला आता व्यावसायिक स्वरूप आले आहे.केवळ विजेत्या झेंड्यासाठी पळविणाऱ्या मालकाला आता बक्षिसाच्या रकमेची हव्यास लागली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरामध्येही शर्यतीला गर्दी होऊ लागली आहे. शर्यत शौकिनांची संख्या वाढल्याने यात्रांच्या मर्यादित असलेल्या या शर्यतींकडे राजकीय लोकांचे लक्ष वेधल्याने शर्यतींसाठी पाच लाखांपाून पंधरा लाखांपर्यंत बक्षिसांची लयलूट होऊ लागली. त्यामुळे बैलगाडी शर्यतीला लोकोत्सवाचे स्वरूप आले होते. जिंकण्याची जिद्द व बक्षिसांच्या आमिषामुळे शर्यतीमध्ये बैलांना मारहाण करणे, खिळे टोचणे, शेपूट चावणे, याचबरोबर दुचाकी गाड्यांचा इलेक्ट्रिक शॉक देण्याचा प्रकार वाढला होता. शर्यतींमध्ये बैलांचा छळ होत असल्याने बैलगाडी प्राणिमित्र संघटनेच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने शर्यतींवर बंदी आणली आहे. त्यातच बैलांचा समावेश जंगली प्राणी म्हणून वर्गीकरण केल्याने गेल्या काही वर्षांपासून बैलगाडी शर्यतींवर बंदी आली आहे.शर्यती बंदीमुळे ग्रामीण भागातील यात्रा, जत्रातील उत्साह गेला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यती पुन्हा चालू होण्यासाठी बैलगाडी मालक, चालक व शर्यत शौकिनांची आंदोलने झाली. मात्र, त्याला यश आले नाही.तमिळनाडू जलिकट्टू या बैलांच्या जीवघेण्या खेळाला तेथील नागरिकांच्या आंदोलनामुळे राज्य शासनाने परवानगी दिली आहे. जलिकट्टू खेळाइतका जीवघेणा खेळ बैलगाडी शर्यत नक्कीच नाही, असे असतानाही जलिकट्टू खेळाला तमिळनाडू सरकारने बंदी आदेश उठविल्याने महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत शौकिनांचा आत्मविश्वास वाढला आहे. तमिळी जनतेप्रमाणे बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठी सरकार कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण शर्यत शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.