शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

बैलगाडी शर्यतीबाबत आशा पल्लवित

By admin | Updated: January 30, 2017 23:50 IST

सरकारच्या निर्णयाकडे लक्ष : जलिकट्टीप्रमाणे महाराष्ट्रात परवानगी देण्याची मागणी

गणपती कोळी ल्ल कुरूंदवाडतमिळनाडूतील जलिकट्टू या बैलांच्या शर्यतीवरील शासनाने बंदी उठविल्याने महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यती शौकिनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जलिकट्टूप्रमाणे येथील बैलगाडी शर्यतींवरची बंदी उठवावी, यासाठी तरुणाई पुढे येत असून, भाजप सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे शर्यती शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.महाराष्ट्र विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागात बैलगाडी शर्यतीला विशेष महत्त्व आहे. पूर्वीपासून शेतातील औताची कामे करून वर्षातून गावच्या यात्रा, जत्रा, उरुसाच्या निमित्ताने शेतकरी केवळ हौस म्हणून बैलगाडी शर्यतीतून बैल पळवित असत. यात्रांचा समारोप आजही बैलगाडी शर्यतीनेच केला जातो. या पांरपरिक खेळाला आता व्यावसायिक स्वरूप आले आहे.केवळ विजेत्या झेंड्यासाठी पळविणाऱ्या मालकाला आता बक्षिसाच्या रकमेची हव्यास लागली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरामध्येही शर्यतीला गर्दी होऊ लागली आहे. शर्यत शौकिनांची संख्या वाढल्याने यात्रांच्या मर्यादित असलेल्या या शर्यतींकडे राजकीय लोकांचे लक्ष वेधल्याने शर्यतींसाठी पाच लाखांपाून पंधरा लाखांपर्यंत बक्षिसांची लयलूट होऊ लागली. त्यामुळे बैलगाडी शर्यतीला लोकोत्सवाचे स्वरूप आले होते. जिंकण्याची जिद्द व बक्षिसांच्या आमिषामुळे शर्यतीमध्ये बैलांना मारहाण करणे, खिळे टोचणे, शेपूट चावणे, याचबरोबर दुचाकी गाड्यांचा इलेक्ट्रिक शॉक देण्याचा प्रकार वाढला होता. शर्यतींमध्ये बैलांचा छळ होत असल्याने बैलगाडी प्राणिमित्र संघटनेच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने शर्यतींवर बंदी आणली आहे. त्यातच बैलांचा समावेश जंगली प्राणी म्हणून वर्गीकरण केल्याने गेल्या काही वर्षांपासून बैलगाडी शर्यतींवर बंदी आली आहे.शर्यती बंदीमुळे ग्रामीण भागातील यात्रा, जत्रातील उत्साह गेला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यती पुन्हा चालू होण्यासाठी बैलगाडी मालक, चालक व शर्यत शौकिनांची आंदोलने झाली. मात्र, त्याला यश आले नाही.तमिळनाडू जलिकट्टू या बैलांच्या जीवघेण्या खेळाला तेथील नागरिकांच्या आंदोलनामुळे राज्य शासनाने परवानगी दिली आहे. जलिकट्टू खेळाइतका जीवघेणा खेळ बैलगाडी शर्यत नक्कीच नाही, असे असतानाही जलिकट्टू खेळाला तमिळनाडू सरकारने बंदी आदेश उठविल्याने महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत शौकिनांचा आत्मविश्वास वाढला आहे. तमिळी जनतेप्रमाणे बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठी सरकार कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण शर्यत शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.